शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा थांबेना फेरा, वाया गेला खरीप हंगामाचा पेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:46 IST

पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अंदाजे पंचवीस हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांचे नुकसान

तासगाव : तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अंदाजे पंचवीस हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. उरल्या-सुरल्या पिकांतून उत्पादन मिळेल, याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे उत्पादन दूरच, घातलेला खर्चही वाया गेला आहे. नुकसानीचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तासगाव तालुक्यात खरिपाचे ३३ हजार १२८ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे त्यापैकी ३० हजार २४९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सुरुवातीला पाऊस उशिरा आल्याने, पेरा उशिरा झाला. मात्र पेरणी झाल्यानंतर सुरू झालेला पाऊस थांबता थांबला नाही. काही दिवसांचा अपवाद सोडला तर तालुक्यात संततधार कायम होती. उघडीप मिळाली तरी सूर्यदर्शन हाेत नव्हते. त्यामुळे पेरा वाया गेला. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागात ज्वारी, बाजरीसह कडधान्याची पिके वाया गेली आहेत.

पेरणीसाठी खते, औषधे, बियाणे, मेहनतीसाठी कराव्या लागलेल्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. शासनाकडून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी नुकसानभरपाई जाहीर केली आहे; मात्र तासगाव तालुक्यातील अतिवृष्टीची नोंद शासन दरबारी नाही. त्यामुळे भरपाई मिळणार नाही. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानीची झळ सहन करावी लागली आहे.

अतिवृष्टी नाही; नुकसानभरपाई नाही

सततच्या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, भुईमूग आणि मका पिकाचा अपवाद सोडला तर अन्य पिकांच्या बाबतीत उत्पादन नाही. शासन दरबारी अतिवृष्टीसाठीच भरपाई जाहीर केली आहे. तालुक्यात अतिवृष्टीची नोंदच नसल्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत.

तालुक्यातील पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) :

  • खरीप ज्वारी : १५ हजार ७५५
  • मका : १ जार ८८१
  • इतर तृणधान्य : ७०
  • तूर : ४९२
  • मूग : ३०७
  • उडीद : ८६२
  • इतर कडधान्य : ४१५
  • भुईमूग : चार हजार ७०५
  • सोयाबीन : पाच हजार ७५२

तासगाव तालुक्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यायला हवी. शेतीला पाणी लागल्याने शेती धोक्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणायला हव्यात. - संजय पाटील, माजी सभापती, पंचायत समिती, तासगाव

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस