शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

पावसाचा थांबेना फेरा, वाया गेला खरीप हंगामाचा पेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:46 IST

पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अंदाजे पंचवीस हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांचे नुकसान

तासगाव : तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अंदाजे पंचवीस हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. उरल्या-सुरल्या पिकांतून उत्पादन मिळेल, याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे उत्पादन दूरच, घातलेला खर्चही वाया गेला आहे. नुकसानीचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तासगाव तालुक्यात खरिपाचे ३३ हजार १२८ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे त्यापैकी ३० हजार २४९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सुरुवातीला पाऊस उशिरा आल्याने, पेरा उशिरा झाला. मात्र पेरणी झाल्यानंतर सुरू झालेला पाऊस थांबता थांबला नाही. काही दिवसांचा अपवाद सोडला तर तालुक्यात संततधार कायम होती. उघडीप मिळाली तरी सूर्यदर्शन हाेत नव्हते. त्यामुळे पेरा वाया गेला. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागात ज्वारी, बाजरीसह कडधान्याची पिके वाया गेली आहेत.

पेरणीसाठी खते, औषधे, बियाणे, मेहनतीसाठी कराव्या लागलेल्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. शासनाकडून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी नुकसानभरपाई जाहीर केली आहे; मात्र तासगाव तालुक्यातील अतिवृष्टीची नोंद शासन दरबारी नाही. त्यामुळे भरपाई मिळणार नाही. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानीची झळ सहन करावी लागली आहे.

अतिवृष्टी नाही; नुकसानभरपाई नाही

सततच्या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, भुईमूग आणि मका पिकाचा अपवाद सोडला तर अन्य पिकांच्या बाबतीत उत्पादन नाही. शासन दरबारी अतिवृष्टीसाठीच भरपाई जाहीर केली आहे. तालुक्यात अतिवृष्टीची नोंदच नसल्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत.

तालुक्यातील पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) :

  • खरीप ज्वारी : १५ हजार ७५५
  • मका : १ जार ८८१
  • इतर तृणधान्य : ७०
  • तूर : ४९२
  • मूग : ३०७
  • उडीद : ८६२
  • इतर कडधान्य : ४१५
  • भुईमूग : चार हजार ७०५
  • सोयाबीन : पाच हजार ७५२

तासगाव तालुक्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यायला हवी. शेतीला पाणी लागल्याने शेती धोक्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणायला हव्यात. - संजय पाटील, माजी सभापती, पंचायत समिती, तासगाव

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस