शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नुकसान आठ लाखांचे, भरपाई अठरा हजारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 5:44 PM

हेक्टरी आठ ते दहा लाखांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. उत्पन्नापासून वंचित राहावे लागलेच, मात्र घातलेल्या खर्चाचा भुर्दंडही सोसावा लागला आहे. शासनाकडून भरीव मदत मिळेल, या आशेवर द्राक्ष बागायतदार होते. मात्र खर्च आणि नुकसानीच्या तुलनेत केवळ मदतीची पाने तोंडाला पुसण्यात आल्याने द्राक्ष उत्पादक कर्जाच्या खाईत लोटले आहेत.

दत्ता पाटील ।तासगाव : परतीच्या पावसाने द्राक्षबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पंचनाम्यांनंतर राज्यपालांकडून तुटपुंजी रक्कम जाहीर करण्यात आली. त्यामुळे नुकसान अन् कर्जाच्या खाईत गेलेल्या द्राक्ष बागायतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. नुकसान आठ लाखांचे अन् भरपाई अठरा हजारांची, असेच चित्र असून भरपाईची रक्कम ही शेतकºयांच्या एक दिवसाच्या औषध खर्चापेक्षाही कमी आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करून सरसकट पीककर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे.

नेहमीच दुष्काळाच्या सावटात असणाºया द्राक्षबागांना यंदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. परतीच्या पावसाने सलग आठ दिवस झोडपून काढल्याने, तालुक्यातील पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला. ऐन हंगामात पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांनी मोठ्या जिद्दीने द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड सुरु केली. द्राक्षबागा वाचतील या आशेने आठ दिवसांत केवळ औषध फवारणीसाठी लाखभर रुपये खर्च केले. मात्र इतके करूनही द्राक्षबागा वाचल्या नाहीत.

द्राक्ष उत्पादनासाठी वर्षभर कष्ट करून, खते, औषधे, मजुरीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. वर्षभर राबल्यानंतर एकरी तीन ते आठ लाखापर्यंत उत्पन्न मिळते. मात्र   यावर्षी पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यातील बहुतांश द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाच्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील ८ हजार ६०० हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान   झाले आहे. हेक्टरी आठ ते दहा लाखांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. उत्पन्नापासून वंचित राहावे लागलेच, मात्र घातलेल्या खर्चाचा भुर्दंडही सोसावा लागला आहे.

शासनाकडून भरीव मदत मिळेल, या आशेवर द्राक्ष बागायतदार होते. मात्र खर्च आणि नुकसानीच्या तुलनेत केवळ मदतीची पाने तोंडाला पुसण्यात आल्याने द्राक्ष उत्पादक कर्जाच्या खाईत लोटले आहेत.द्राक्ष बागायतदारांना मदतीचा हात देण्यासाठी सरसकट पीककर्ज माफ करून भरीव मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी