शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यात पाण्यासाठी दाहीदिशा

By admin | Updated: May 19, 2017 00:36 IST

आटपाडी तालुक्यात पाण्यासाठी दाहीदिशा

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : आटपाडी तालुक्यात सध्या २१ टॅँकरने ५१ खेपा करून पाणी टंचाईवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टॅँकर सुरु असणाऱ्या अनेक गावात १० ते १२ दिवसांतून नागरिकांना पाणी मिळत आहे. उन्हामुळे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरु आहे. दिवसेंदिवस टॅँकरच्या मागणीत वाढच होत आहे.तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामात ५० पैशांपेक्षा जास्त आणेवारी जाहीर करुन प्रशासनाने कागदोपत्री दुष्काळ संपुष्टात आणला आहे. प्रत्यक्षात मात्र ३ फेब्रुवारीपासून तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरु करावे लागले आहेत. आणेवारी जादा असल्याने टंचाई जाहीर झाली नाही आणि त्यामुळे टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांऐवजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर राहिले. त्यामुळे सुरुवातीला टॅँकर मंजुरी लाल फितीत अडकून पडली.सध्या कौठुळी, देशमुखवाडी, भिंगेवाडी, उंबरगाव, पिंपरी बुद्रुक, पुजारवाडी (दिघंची), आवळाई, शेटेवाडी, दिघंची, पिंपरी खुर्द, माडगुळे, खोजानवाडी, बनपुरी, करगणी, बोंबेवाडी, झरे, विभुतवाडी, कुरुंदवाडी, आटपाडी (वाड्या-वस्त्या), आपटे मळा, आंबेवाडी, विठलापूर, मुंढेवाडी, निंबवडे (वाड्या-वस्त्या), लेंगरेवाडी, तडवळे, चिंचोळे, आवळाई वाड्या-वस्त्यांवर २१ टॅँकरच्या दररोज ५१.७५ खेपा कागदोपत्री तरी होत आहेत. तालुक्यातील ३४ हजार ९६८ एवढी लोकसंख्या टॅँकरची वाट पाहत, पाणी टंचाईच्या झळा सोसत कसेबसे दिवस ढकलीत आहे.दररोज एका नागरिकाला २० लिटर याप्रमाणे हिशेब करुन टॅँकर मंजूर केले जातात. प्रत्यक्षात कुटुंबाला याप्रमाणे पाणी देणे शक्य नसल्याने, टॅँकरचे पाणी १० ते १२ दिवस साठवून लोकांना प्यावे लागत आहे. काही गावात टॅँकरचे पाणी इंजिनने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत चढविले जाते. त्यामुळे वितरण योग्य होत असले तरी, लोकांना अनेक दिवसांनंतर पाणी मिळते. टॅँकरच्या पाण्यावरुन अनेक गावात दररोज किरकोळ वादावादीचे आणि हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. यावर मात करण्यासाठी लोक पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. वळीव पावसानेही तालुक्याला हुलकावणी दिली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. टॅँकरवाले आणि टग्यांची चंगळ!सध्या सुरू असलेले टॅँकर हे त्या-त्या गावापासून किमान ८ ते तब्बल २५ कि. मी. अंतरावरुन पाणी आणत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी बिघाडाच्या नावाखाली खेपा चुकविल्या जात आहेत. प्रत्यक्षात दररोज १०० टक्के टॅँकर दाखविले जातात. त्यात गावच्या सरपंचांसह सरकारीबांबूचे टॅँकरवाले हात ओले करुन टॅँकरच्या निधीवर डल्ला मारत असल्याचा आरोप केला जातोय. याशिवाय जवळच्या अंतरावरुन खेपा टाकून लांबचे अंतर दाखवून टॅँकरवाले मालामाल होत असल्याची चर्चा आहे.