शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, पावसाअभावी वाढ खुंटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:47 IST

केवळ ३८ हजार हेक्टरवर झाल्या पेरण्या

सांगली : यंदा जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून, त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी केवळ ३७ हजार ८०१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पेरा भाताचा तर सर्वांत कमी कडधान्ये, बाजरी, ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिकांची उगवण खुंटली असल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी मध्यावर आल्या आहेत. मात्र, जून महिन्यापासून पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरणीला गतीच मिळाली नाही. पुरेशी ओलच झाली नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर असून, ३७ हजार ८०१ हेक्टरवर म्हणजे १४ टक्के इतकाच पेरा पूर्ण झाला आहे. कडधान्य, ज्वारी, बाजरी ही पिके दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांत प्रामुख्याने घेतली जातात; परंतु या तालुक्यात या पिकांच्या पेरणीसाठी पाऊसच झाला नसल्याने या पिकांची पेरणी अत्यल्प झाली आहे.शिराळा तालुक्यात ११ हजार १७० हेक्टरवर धूळवाफेवर भाताची पेरणी झाली असून, उगवण चांगली आहे; परंतु रोप लागणीची कामे खोळंबली आहे. जिल्ह्यात मक्याचे सरासरी क्षेत्र ४० हजार ७५३ हेक्टर इतके आहे. चार हजार ९५ हेक्टरवर लागवड झाली आहे. पेरणीनंतर पाऊस नसल्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. पीक जगविण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटल्यामुळे तेथे दुबार पेरणी करावी लागेल, असे चित्र दिसत आहे.

मक्यावर लष्करी अळीचा फैलावसध्या वातावरणातील बदलामुळे मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्करी आळीचा फैलाव असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना औषध फवारणीच्या सूचना दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)तालुका - क्षेत्रशिराळा १९,१३३जत  २,६१९वाळवा ४,६७९तासगाव ३,३५९क.महांकाळ २,५६५मिरज १,२२१खानापूर ३३८आटपाडी १,४४५पलूस १,०४६कडेगाव १,३९५एकूण ३७,८०१

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी