शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, पावसाअभावी वाढ खुंटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:47 IST

केवळ ३८ हजार हेक्टरवर झाल्या पेरण्या

सांगली : यंदा जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून, त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी केवळ ३७ हजार ८०१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पेरा भाताचा तर सर्वांत कमी कडधान्ये, बाजरी, ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिकांची उगवण खुंटली असल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी मध्यावर आल्या आहेत. मात्र, जून महिन्यापासून पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरणीला गतीच मिळाली नाही. पुरेशी ओलच झाली नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर असून, ३७ हजार ८०१ हेक्टरवर म्हणजे १४ टक्के इतकाच पेरा पूर्ण झाला आहे. कडधान्य, ज्वारी, बाजरी ही पिके दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांत प्रामुख्याने घेतली जातात; परंतु या तालुक्यात या पिकांच्या पेरणीसाठी पाऊसच झाला नसल्याने या पिकांची पेरणी अत्यल्प झाली आहे.शिराळा तालुक्यात ११ हजार १७० हेक्टरवर धूळवाफेवर भाताची पेरणी झाली असून, उगवण चांगली आहे; परंतु रोप लागणीची कामे खोळंबली आहे. जिल्ह्यात मक्याचे सरासरी क्षेत्र ४० हजार ७५३ हेक्टर इतके आहे. चार हजार ९५ हेक्टरवर लागवड झाली आहे. पेरणीनंतर पाऊस नसल्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. पीक जगविण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटल्यामुळे तेथे दुबार पेरणी करावी लागेल, असे चित्र दिसत आहे.

मक्यावर लष्करी अळीचा फैलावसध्या वातावरणातील बदलामुळे मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्करी आळीचा फैलाव असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना औषध फवारणीच्या सूचना दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)तालुका - क्षेत्रशिराळा १९,१३३जत  २,६१९वाळवा ४,६७९तासगाव ३,३५९क.महांकाळ २,५६५मिरज १,२२१खानापूर ३३८आटपाडी १,४४५पलूस १,०४६कडेगाव १,३९५एकूण ३७,८०१

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी