शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Rain: एकीकडे दमदार तर दुसरीकडे दुष्काळ, जत तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 13:44 IST

कडक ऊन पडत असल्याने कोवळी पिके कोजमली जात आहेत

जत : यंदाच्या वर्षी पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्यानंतर जत पूर्व भागातील शेतकऱ्यांनी अल्प ओलीवर पेरण्या करून घेतल्या आहेत. झालेल्या पेरणीनंतर अधून-मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने या पावसावरच पिकांची उगवण झाली; परंतु गेल्या दहा दिवसांपासून दिवसभर पावसाचे वातावरण तयार होते; परंतु सुसाट वाऱ्याने ढग गायब होतात. पाऊस पडतच नाही. असेच वातावरण राहिल्यास शेतकऱ्यांसमाेर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

जमिनीतील ओल पावसाअभावी संपल्याने जत परिसरातील पिके सुकू लागली आहेत. जत परिसरात पावसाळा सुरू झाल्यापासून एकही दमदार पाऊस झालेला नाही. ओढे, नाल्याला पाणी आलेले नाही. त्यामुळे अजूनही विहिरी कोरड्याच आहेत. पाणीच नसल्याने सिंचनाची सोय असूनही शेतकरी हतबल आहेत.

जून महिन्यात केवळ एकच दमदार पाऊस झाला. या पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, तूर, बाजरी, सोयाबीन, मूग, ज्वारी पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर अधूनमधून पावसाच्या बारीक सरी दाखल होत आहेत; परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होते; परंतु सुसाट वाऱ्याने पाऊस गायब होताे. या सुसाट वाऱ्यामुळे जमिनीतील ओलही कमी हाेत आहे. कडक ऊन पडत असल्याने कोवळी पिके कोजमली जात आहेत.

ज्या भागात पाऊस नव्हता, त्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची पेरणी सुरू आहे; परंतु पेरणीनंतर गेल्या आठ दिवसांपासून अधूनमधून येणारा हलकसा पाऊसही सुसाट वाऱ्याने गायब होत आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवसांत पाऊस नाही झाला तर जत परिसरातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी