शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

Rain: एकीकडे दमदार तर दुसरीकडे दुष्काळ, जत तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 13:44 IST

कडक ऊन पडत असल्याने कोवळी पिके कोजमली जात आहेत

जत : यंदाच्या वर्षी पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्यानंतर जत पूर्व भागातील शेतकऱ्यांनी अल्प ओलीवर पेरण्या करून घेतल्या आहेत. झालेल्या पेरणीनंतर अधून-मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने या पावसावरच पिकांची उगवण झाली; परंतु गेल्या दहा दिवसांपासून दिवसभर पावसाचे वातावरण तयार होते; परंतु सुसाट वाऱ्याने ढग गायब होतात. पाऊस पडतच नाही. असेच वातावरण राहिल्यास शेतकऱ्यांसमाेर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

जमिनीतील ओल पावसाअभावी संपल्याने जत परिसरातील पिके सुकू लागली आहेत. जत परिसरात पावसाळा सुरू झाल्यापासून एकही दमदार पाऊस झालेला नाही. ओढे, नाल्याला पाणी आलेले नाही. त्यामुळे अजूनही विहिरी कोरड्याच आहेत. पाणीच नसल्याने सिंचनाची सोय असूनही शेतकरी हतबल आहेत.

जून महिन्यात केवळ एकच दमदार पाऊस झाला. या पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, तूर, बाजरी, सोयाबीन, मूग, ज्वारी पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर अधूनमधून पावसाच्या बारीक सरी दाखल होत आहेत; परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होते; परंतु सुसाट वाऱ्याने पाऊस गायब होताे. या सुसाट वाऱ्यामुळे जमिनीतील ओलही कमी हाेत आहे. कडक ऊन पडत असल्याने कोवळी पिके कोजमली जात आहेत.

ज्या भागात पाऊस नव्हता, त्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची पेरणी सुरू आहे; परंतु पेरणीनंतर गेल्या आठ दिवसांपासून अधूनमधून येणारा हलकसा पाऊसही सुसाट वाऱ्याने गायब होत आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवसांत पाऊस नाही झाला तर जत परिसरातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी