शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एसटी कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी प्रकरणे निलंबन आढावा समितीसमोर ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 14:17 IST

State transport Sangli: एसटीच्या सेवेतून निलंबित केलेले कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ९० दिवसांच्या आता दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहेत. बेकायदेशीर कृत्य केल्यानंतरही दोषारोपपत्र लवकर दाखल होत नसल्याने बिनधास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे या आदेशामुळे दणाणले आहे.

ठळक मुद्देएसटी कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी प्रकरणे निलंबन आढावा समितीसमोर ठेवणारबिनधास्त कर्मचाऱ्यांचे धाबे आदेशामुळे दणाणले

संतोष भिसेसांगली : एसटीच्या सेवेतून निलंबित केलेले कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ९० दिवसांच्या आता दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहेत. बेकायदेशीर कृत्य केल्यानंतरही दोषारोपपत्र लवकर दाखल होत नसल्याने बिनधास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे या आदेशामुळे दणाणले आहे.एसटीच्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कारणांखाली गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एसटीविषयक गुन्ह्यांबरोबरच व्यक्तीगत बेकायदेशीर कृत्यांचाही समावेश आहे. बेहिशेबी मालमत्ता, चोरी, खून किंवा खुनाचा प्रयत्न, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, बलात्कार, महामंडळाची फसवणूक आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

गुन्हेगारी कृत्यांमुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर एसटीने निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन कालावधी संपल्याने परत एसटीच्या सेवेत रुजूदेखील झाले आहेत. त्यांच्यावर दोषारोपपत्र वेळेत दाखल होत नसल्याने गुन्हे वर्षानुवर्षे रखडतात. गुन्हेगारीला आळा घालण्याचा हेतू यामुळे पूर्णत: सफल होत नाही.महाव्यवस्थापकांनी याविषयी काढलेल्या आदेशात म्हंटले आहे की, पोलीस किंवा लाचलुचपत खात्याकडून अनेकदा अपेक्षित कालावधीत दोषारोपपत्र दाखल केले जात नाही. अशी प्रकरणे एसटीच्या निलंबन आढावा समितीसमोर सादर करावयाची आहेत. त्यामुळे संबंधितविभागीय नियंत्रकांनी आपल्या विभागातील अशी गुन्हेगारी प्रकरणे कमाल ७५ दिवसांपर्यंत मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावीत.

टॅग्स :state transportएसटीSangliसांगली