शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : धर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील मूलभूत ढाचा सारखाच आहे. कारण एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती झाली आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतनमध्ये आयोजित विचारमंथन संमेलनातील पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना मोरे बोलत होते.ते म्हणाले की, धर्मांच्या निर्मितीचा अभ्यास केला, तर सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : धर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील मूलभूत ढाचा सारखाच आहे. कारण एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती झाली आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतनमध्ये आयोजित विचारमंथन संमेलनातील पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना मोरे बोलत होते.ते म्हणाले की, धर्मांच्या निर्मितीचा अभ्यास केला, तर सर्व धर्मांचे सांस्कृतिक धागे जोडल्याचे दिसून येते. धर्माला पूर्वी कोणतेही नाव नव्हते. यज्ञ व कर्मकांड करण्यास धर्म मानले जात होते. वैदिक हा शब्द या तत्त्वाला विरोध झाल्यानंतर निर्माण झाला. त्यामुळे एकाच संस्कृतीतून वेगवेगळे धर्म जन्माला आले. कालांतराने धर्मांचा एकमेकांवर प्रभाव पडत गेला आणि काही गोष्टींची देवाण-घेवाणही झाली. भारतीय इतिहास पाहिला, तर औरंगजेब, अकबर यांच्या दरबारात बहुतांश हिंदू सरदार आणि हिंदू राजांच्या दरबारी असलेले मुस्लिम सरदार, असे चित्र होते. संगीत क्षेत्रात आजवर अनेक मुस्लिम गायकांनी काळ गाजविला. इब्राहीम अदिलशाह (द्वितीय) या राजाने शास्त्रीय गायनातून हिंदू देवांचा उल्लेखही स्वीकारला होता. त्यामुळे तेव्हाचा संघर्ष आणि लढा हा धर्मांचा होता की राजांमधील होता, याची चिकित्सा प्रत्येकाने करावी.जगातील धर्मांनी आत्म्याच्या मरणोत्तर अस्तित्वावर विश्वास ठेवल्याचे दिसून येते. त्याचबरोबर धर्मांनी अलौकिक गोष्टींवरही विश्वास ठेवला. कबिरांनी एकाचवेळी हिंदू आणि मुस्लिम धर्मातील चुकीच्या तत्त्वांवर प्रहार केल्याचे दिसून येते. एकमेकांशी संघर्ष करणारे, स्वतंत्र परंपरा पाळणारे हे धर्म आहेत. तरीही त्यांचा एकमेकांवर प्रभाव दिसून येतो. भारतातील समाधानकारक बाब म्हणजे, याठिकाणी कधीही धर्मयुद्ध झालेले नाही. अन्य देशांमध्ये अशी धर्मयुद्धे नोंदली गेली आहेत. संत एकनाथांनी ‘हिंदू-तुर्क संवाद’ या नावाने एक भारुड रचले होते. हिंदू-मुस्लिम लोकांमधील युक्तिवाद आणि शेवटी एकमेकांच्या धर्मांचा आदर, अशी त्याची रचना होती. त्यामुळे संतांनीही वेगवेगळ्या पद्धतीने धर्मचिकित्सा केल्याचे दिसून येते. मार्क्स, गांधी आणि आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या विचारात मतभेद होते. तत्त्वाने ते भांडत होते, म्हणून त्यांच्या अनुयायांनीही भांडायलाच हवे का? विचारांचा वारसा घ्यायचा की भांडणाचा, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे ते म्हणाले.दुसºया सत्रात ‘मार्क्सची धर्मकल्पना’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र कांगो म्हणाले की, माणूस धर्माला घडवितो, धर्म माणसाला नव्हे.देशात आता पुन्हा जातीच्या नावाने लोक एकत्र येत आहेत. जातीव्यवस्थांचे पुनरुज्जीवन का होत आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे भांडवलशाही व्यवस्थाच हृदयशून्य जग निर्माण करू पाहत असते. त्यासाठी धर्माला दावणीला बांधले जाते. सारासार विवेकबुद्धी काढून घेण्याचे काम धर्म करीत असतो. धार्मिक भावना आणि उन्माद यात फरक करायला हवा. हिंदू हा धर्म आहे, तर हिंदुत्व हे राजकारण आहे. सध्या ही रचना संघामार्फत केली जात आहे. धर्म-जातींमधील सामंजस्यपणा कमी करणाºया शक्ती बळावत आहेत. धर्माच्या नावावरील अधर्म थांबविला पाहिजे, असेही ते म्हणाले.ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या भाषणाने समारोप झाला. यावेळी प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. सुभाष दगडे, दादासाहेब ढेरे, संयोजक गौतम पाटील, फोरमचे सचिव बी. आर. थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून पुरोगामी कार्यकर्ते आले होते.