शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : धर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील मूलभूत ढाचा सारखाच आहे. कारण एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती झाली आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतनमध्ये आयोजित विचारमंथन संमेलनातील पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना मोरे बोलत होते.ते म्हणाले की, धर्मांच्या निर्मितीचा अभ्यास केला, तर सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : धर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील मूलभूत ढाचा सारखाच आहे. कारण एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती झाली आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतनमध्ये आयोजित विचारमंथन संमेलनातील पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना मोरे बोलत होते.ते म्हणाले की, धर्मांच्या निर्मितीचा अभ्यास केला, तर सर्व धर्मांचे सांस्कृतिक धागे जोडल्याचे दिसून येते. धर्माला पूर्वी कोणतेही नाव नव्हते. यज्ञ व कर्मकांड करण्यास धर्म मानले जात होते. वैदिक हा शब्द या तत्त्वाला विरोध झाल्यानंतर निर्माण झाला. त्यामुळे एकाच संस्कृतीतून वेगवेगळे धर्म जन्माला आले. कालांतराने धर्मांचा एकमेकांवर प्रभाव पडत गेला आणि काही गोष्टींची देवाण-घेवाणही झाली. भारतीय इतिहास पाहिला, तर औरंगजेब, अकबर यांच्या दरबारात बहुतांश हिंदू सरदार आणि हिंदू राजांच्या दरबारी असलेले मुस्लिम सरदार, असे चित्र होते. संगीत क्षेत्रात आजवर अनेक मुस्लिम गायकांनी काळ गाजविला. इब्राहीम अदिलशाह (द्वितीय) या राजाने शास्त्रीय गायनातून हिंदू देवांचा उल्लेखही स्वीकारला होता. त्यामुळे तेव्हाचा संघर्ष आणि लढा हा धर्मांचा होता की राजांमधील होता, याची चिकित्सा प्रत्येकाने करावी.जगातील धर्मांनी आत्म्याच्या मरणोत्तर अस्तित्वावर विश्वास ठेवल्याचे दिसून येते. त्याचबरोबर धर्मांनी अलौकिक गोष्टींवरही विश्वास ठेवला. कबिरांनी एकाचवेळी हिंदू आणि मुस्लिम धर्मातील चुकीच्या तत्त्वांवर प्रहार केल्याचे दिसून येते. एकमेकांशी संघर्ष करणारे, स्वतंत्र परंपरा पाळणारे हे धर्म आहेत. तरीही त्यांचा एकमेकांवर प्रभाव दिसून येतो. भारतातील समाधानकारक बाब म्हणजे, याठिकाणी कधीही धर्मयुद्ध झालेले नाही. अन्य देशांमध्ये अशी धर्मयुद्धे नोंदली गेली आहेत. संत एकनाथांनी ‘हिंदू-तुर्क संवाद’ या नावाने एक भारुड रचले होते. हिंदू-मुस्लिम लोकांमधील युक्तिवाद आणि शेवटी एकमेकांच्या धर्मांचा आदर, अशी त्याची रचना होती. त्यामुळे संतांनीही वेगवेगळ्या पद्धतीने धर्मचिकित्सा केल्याचे दिसून येते. मार्क्स, गांधी आणि आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या विचारात मतभेद होते. तत्त्वाने ते भांडत होते, म्हणून त्यांच्या अनुयायांनीही भांडायलाच हवे का? विचारांचा वारसा घ्यायचा की भांडणाचा, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे ते म्हणाले.दुसºया सत्रात ‘मार्क्सची धर्मकल्पना’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र कांगो म्हणाले की, माणूस धर्माला घडवितो, धर्म माणसाला नव्हे.देशात आता पुन्हा जातीच्या नावाने लोक एकत्र येत आहेत. जातीव्यवस्थांचे पुनरुज्जीवन का होत आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे भांडवलशाही व्यवस्थाच हृदयशून्य जग निर्माण करू पाहत असते. त्यासाठी धर्माला दावणीला बांधले जाते. सारासार विवेकबुद्धी काढून घेण्याचे काम धर्म करीत असतो. धार्मिक भावना आणि उन्माद यात फरक करायला हवा. हिंदू हा धर्म आहे, तर हिंदुत्व हे राजकारण आहे. सध्या ही रचना संघामार्फत केली जात आहे. धर्म-जातींमधील सामंजस्यपणा कमी करणाºया शक्ती बळावत आहेत. धर्माच्या नावावरील अधर्म थांबविला पाहिजे, असेही ते म्हणाले.ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या भाषणाने समारोप झाला. यावेळी प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. सुभाष दगडे, दादासाहेब ढेरे, संयोजक गौतम पाटील, फोरमचे सचिव बी. आर. थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून पुरोगामी कार्यकर्ते आले होते.