शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरासाठी प्राधिकरण निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:25 AM

सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला तीन वेळा मोठ्या महापुरांचा तडाखा सोसावा लागला. अब्जावधी रुपयांच्या हानीला तोंड द्यावे लागले. तीन महापुरांत दोन्ही जिल्ह्यांचे सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सांगली : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी स्वतंत्र महापूर प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केली. धरणांतील पाणीसाठ्याविषयी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शिकेचे पालन न झाल्यानेच पुराला सामोरे जावे लागल्याची भूमिका समितीच्या सदस्यांनी मांडली.

सांगलीत रविवारी समितीची बैठक झाली. यावेळी निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, वि.द. बर्वे, हणमंतराव पवार, सर्जेराव पाटील, सुकुमार पाटील, अजित पाटील, प्रशांत मजलेकर, संजय कोरे, डी.टी. पवार, प्रकाश पाटील, नीलेश पवार, स्वप्निल कोळी आदी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील सततचे महापूर, कारणे व उपाय या विषयांवर चर्चा झाली. दिवाण म्हणाले की, धरणात पावसाळ्यात पाणीसाठा किती असावा, याचे निश्चित निर्देश केंद्रीय जल आयोगाने दिले आहेत. कोयनेपासून अलमट्टीपर्यंतच्या सर्वच धरणांत त्याचे पालन झाले नाही. त्यामुळेच तीन वेळा मोठ्या महापुरांचा तडाखा सोसावा लागला. अब्जावधी रुपयांच्या हानीला तोंड द्यावे लागले. तीन महापुरांत दोन्ही जिल्ह्यांचे सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

केंगार म्हणाले की, धरणांत अति पाणी साठविण्याच्या हव्यासापोटी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले. अशी संकटे टाळण्यासाठी कृती समिती सक्षमपणे काम करेल. सुकुमार पाटील म्हणाले, महापुरावरील उपायांसाठी केंद्र व राज्य शासनांकडे पाठपुरावा करावा लागेल. लोकप्रतिनिधींना निवेदने द्यावी लागतील.

दरम्यान, महापुराच्या संकटावर लढ्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीची स्थापना करण्यात आली. तिच्यामार्फत व्यापक लढा उभारण्याचा निर्णय झाला. निवेदन, आंदोलन व प्रसंगी न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून संघर्ष करण्याचा ठराव झाला.

ठराव असे

सांगली, कोल्हापुरातील महापुराविषयी शासनाने स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावे. त्यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून तज्ज्ञ व अभ्यासूंचा समावेश करावा. सर्व धरणांतील पाण्याचे व्यवस्थापन समन्वयाने करावे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वीजनिर्मितीचा पाणीसाठा कमी करावा.

टॅग्स :Sangliसांगली