शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

corona virus -‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे काव्यमय आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:10 IST

वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे सांगलीतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी अनोखे आवाहन केले आहे. त्यांची कविता सोशल मिडियावरून व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे काव्यमय आवाहन कविता सोशल मिडियावरून व्हायरल

सांगली : वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे सांगलीतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी अनोखे आवाहन केले आहे. त्यांची कविता सोशल मिडियावरून व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस उतरली आहे.कवितेत त्यांनी लोकांना सतर्कतेचे आवाहन करतानाच आधुनिक युगात हरवलेली माणुसकी, आरोग्याबाबतचा गाफिलपणा, अस्वच्छता, बेशिस्तपणा, हरवलेले स्वत्व या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहे. साहित्य, सामाजिक चळवळीत सातत्याने ते सहभागी असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या या अनोख्या काव्यत्मक आवाहनास पसंती मिळत आहे.माणसांनो, बदला आता !माणसांनो बदला आता, बदल अटळ आहेअन्यथा सर्वांचं मरण अटळ आहे.अन्यथा सर्वांचं सरण अटळ आहे.हवा गढुळली, तशी माणसंही...जमीन भेगाळली, आणि माणसंही ,पाणी आटलं..., माणसांचंही तेच झालं .कितीही खणलं तरी , माणसांना पाझर फुटत नाही .'फवारणी' सुरूच आहे ..फळं अकाली पिकवून, 'माणूस' अकाली गळू लागलाय .हे गळणं अटळ आहे...माणसानो बदला आता, अन्यथा सर्वांचं मरण अटळ आहे.जमिनीत साखर पेरताय, तिथं मीठ उगवतंय .माणसांत साखर पेरताय, तिथं कॅन्सर उगवतोय .माणसांनो, आता 'वेळ' भरत आलीय...काळ बदलतोय,लक्षात ठेवा,माणसाला मीठ फुटलं तरी चालेल ,पण जमिनीला कॅन्सर होता कामा नये...जमीन मरता कामा नये. तिचं जगणं अटळ आहे .माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे ,अन्यथा मरण अटळ आहे.फेसबुक, वॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम...जळमट जायला हवं .इमोजीचं स्माईल ओरिजिनल चेहऱ्यावर यायला हवं .'हळवं मन' आता डिलिट व्हायला लागलंय...त्याला पुन्हा माणसांत आणायला हवं .मोबाईलवरची बोटं पुन्हा मातीत आली,तरच जगणं सुखद आहे. माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे,अन्यथा मरण अटळ आहे.माणसाचं खूप झालं, आता प्राण्यांना आरक्षण हवं .वाघ, सिंह, हत्ती, चिमणी, पाखरं ...त्यांना केवळ पोटाला हवं .झाडांच्या पानांतून दिसणारा बिबट्या...केवळ पोटासाठी ....शेताशेतांतून, रानारानांतून आणि हो...हल्ली वर्तमानपत्राच्या पानांपानांतूनही दिसतो .करायचंच असेल तर,माणसातल्या ...मोकाट जनावरांना करा जेरबंद दिसताक्षणी.धरणीवरच्या त्या जिवांचं असणं 'अटळ' आहे .माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे ,अन्यथा मरण अटळ आहे .माणसांनो ... बदलाच आता !असे मारत सुटलात सा?्यांना..झाडांना, वेलींना आणि मुक्या प्राण्यांना...,तर ...शापातून सुटका नाही .एक दिवस...तुमच्यातही रुजणार नाही बीज .उजाड होऊन जाल या मातीसारखे .तडफडून मराल चिमण्या-पाखरांसारखे .किंवा....धावत सुटाल बेभान, जिवाच्या आकांताने,माणसांच्या कळपात सापडलेल्या बिबट्यासारखे ,आणि .......आणि....विषाणूंची अदृश्य फौज जाळी लावून बसली असेल ...तुमच्यासाठी ....एक दिवस.हा शाप अटळ आहे ,माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे .अन्यथा मरण अटळ आहेअन्यथा सरण अटळ आहे.- डॉ. अनिल मडके

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcultureसांस्कृतिक