शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

सांगली जिल्ह्यात १४७ गावांमध्ये दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 7:07 PM

सांगली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात १४७ गावांमध्ये दूषित पाणीग्रामपंचायतींना बजावल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नोटिसा

सांगली : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.

पाण्यात वापरण्यात येणाऱ्या ४३१ ठिकाणची टीसीएलचीही तपासणी करण्यात आली असून चौदा ठिकाणी ते निकृष्ट आढळून आले आहे. या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणाºया टीसीएलची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील १८२७ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १४७ पाणी नमुने दूषित आढळले. यामध्ये तासगाव तालुक्यात सर्वाधिक ३०, जत तालुक्यात २८, कडेगाव तालुक्यात २६, शिराळा १५, आटपाडी ६, कवठेमहांकाळ ३, मिरज १३, पलूस ६, वाळवा ११, खानापूर ९ इतके पाणी नमुने दूषित आढळले आहेत. टीसीएलचे ४३१ नमुने तपासण्यात आले, त्यापैकी १४ नमुने दूषित आढळले. क्लोरिनचे प्रमाण २० टक्केपेक्षा कमी असणारे टीसीएल निकृष्ट असते. त्यानुसार १४ ठिकाणचे टीसीएल निकृष्ट असल्याचे समोर आले. ११७ ठिकाणी टीसीएलमध्ये क्लोरिनचे प्रमाण २० ते ३० टक्के आढळले असून ३०० ठिकाणी क्लोरिनचे प्रमाण ३० टक्केहून अधिक म्हणजे योग्य असल्याचे समोर आले आहे. मिरज तालुक्यातील तानंग, कान्हरवाडी, पाटगाव, तासगाव तालुक्यातील वाघापूर, शिराळा तालुक्यातील बेलेवाडी, कणदूर, वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड, कुंडलवाडी, जत तालुक्यातील हळ्ळी, उटगी, निगडी बुद्रुक, सोनलगी व उमदी या ठिकाणी निकृष्ट टीसीएल आढळले आहे.दुष्काळात जनता होरपळत असताना, पुन्हा या नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्यामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांना विचारले असता ते म्हणाले की, दुष्काळी गावांना पाणी पुरवठा करणाºया टँकरमधील पाणी तपासणी करूनच नागरिकांना पाणी दिले जात आहे. दूषित पाणी आढळल्यास तो टँकर नागरिकांना पिण्यासाठी पाठविला जात नाही.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणSangliसांगलीzpजिल्हा परिषद