शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

सांगली जिल्ह्यात १४७ गावांमध्ये दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:09 IST

सांगली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात १४७ गावांमध्ये दूषित पाणीग्रामपंचायतींना बजावल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नोटिसा

सांगली : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.

पाण्यात वापरण्यात येणाऱ्या ४३१ ठिकाणची टीसीएलचीही तपासणी करण्यात आली असून चौदा ठिकाणी ते निकृष्ट आढळून आले आहे. या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणाºया टीसीएलची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील १८२७ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १४७ पाणी नमुने दूषित आढळले. यामध्ये तासगाव तालुक्यात सर्वाधिक ३०, जत तालुक्यात २८, कडेगाव तालुक्यात २६, शिराळा १५, आटपाडी ६, कवठेमहांकाळ ३, मिरज १३, पलूस ६, वाळवा ११, खानापूर ९ इतके पाणी नमुने दूषित आढळले आहेत. टीसीएलचे ४३१ नमुने तपासण्यात आले, त्यापैकी १४ नमुने दूषित आढळले. क्लोरिनचे प्रमाण २० टक्केपेक्षा कमी असणारे टीसीएल निकृष्ट असते. त्यानुसार १४ ठिकाणचे टीसीएल निकृष्ट असल्याचे समोर आले. ११७ ठिकाणी टीसीएलमध्ये क्लोरिनचे प्रमाण २० ते ३० टक्के आढळले असून ३०० ठिकाणी क्लोरिनचे प्रमाण ३० टक्केहून अधिक म्हणजे योग्य असल्याचे समोर आले आहे. मिरज तालुक्यातील तानंग, कान्हरवाडी, पाटगाव, तासगाव तालुक्यातील वाघापूर, शिराळा तालुक्यातील बेलेवाडी, कणदूर, वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड, कुंडलवाडी, जत तालुक्यातील हळ्ळी, उटगी, निगडी बुद्रुक, सोनलगी व उमदी या ठिकाणी निकृष्ट टीसीएल आढळले आहे.दुष्काळात जनता होरपळत असताना, पुन्हा या नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्यामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांना विचारले असता ते म्हणाले की, दुष्काळी गावांना पाणी पुरवठा करणाºया टँकरमधील पाणी तपासणी करूनच नागरिकांना पाणी दिले जात आहे. दूषित पाणी आढळल्यास तो टँकर नागरिकांना पिण्यासाठी पाठविला जात नाही.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणSangliसांगलीzpजिल्हा परिषद