शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

काँग्रेसकडे राष्ट्रवादीपेक्षा अधिक इच्छुक, सांगली जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रासाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:30 IST

सांगली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया संपली असून, आघाडीअंतर्गत सर्वाधिक २0 अर्ज काँग्रेसकडे दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीकडे १४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून त्यात सर्वाधिक अर्ज मिरज व जतसाठी आले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसकडे राष्ट्रवादीपेक्षा अधिक इच्छुक सांगली जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रासाठी तयारी

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया संपली असून, आघाडीअंतर्गत सर्वाधिक २0 अर्ज काँग्रेसकडे दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीकडे १४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून त्यात सर्वाधिक अर्ज मिरज व जतसाठी आले आहेत.सांगली जिल्ह्यातील एकूण आठ मतदारसंघांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्ज मागविण्यासाठी ५ जुलैपर्यंत मुदत दिली होती. मुदतीत आलेल्या अर्जांची छाननी करून प्रदेश कार्यकारिणीकडे अहवाल पाठविण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे.सोमवारी काँग्रेसने त्यांच्याकडील इच्छुकांची यादी जाहीर केली. दाखल झालेल्या एकूण २0 अर्जांपैकी १0 अर्ज हे एकट्या मिरज मतदारसंघातून दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून सर्वाधिक अर्ज हे मिरजेतून दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक अर्ज मिरज व जत मतदारसंघातून आले आहेत.सांगली विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सुभाष खोत, संतोष बाबूराव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहेत. मिरज मतदारसंघासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंदा डावरे, काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे सदाशिव वाघमारे, डॉ. नामदेव कस्तुरे, सिद्धार्थ जाधव, नंदादेवी कोलप, अरुण धोत्रे, धनराज सातपुते, हेमराज सातपुते, सदाशिव खाडे, विनय कांबळे यांनी, पलूस-कडेगाव मतदार संघातून आ. विश्वजित कदम यांनी, शिराळा मतदारसंघातून सत्यजित देशमुख, खानापूर-आटपाडीमधून राजाराम देशमुख, तासगाव - कवठेमहांकाळमधून अविराजे शिंदे, जतमधून विक्रम सावंत, चंद्रकांत सांगलीकर यांचे अर्ज दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीकडे आलेल्या अर्जांमध्ये जत विधानसभा मतदारसंघासाठी नगरसेवक विष्णू माने, माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नाप्पा होर्तीकर, सुरेश शिंदे, रमेश पाटील यांनी, मिरजेतून जिल्हा बँक संचालक बाळासाहेब होनमोरे, प्रमोद इनामदार, उत्तम कांबळे यांनी, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून आ. सुमनताई पाटील आणि शिराळा मतदारसंघातून माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातून शरद लाड यांनी, तर खानापूर-आटपाडी मतदारसंघातून बाबासाहेब मुळीक, हणमंतराव देशमुख आणि रावसाहेब पाटील इच्छुक आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगलीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक