शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: काँग्रेस नेते पाहताहेत ढासळणारा किल्ला; पक्ष वाढवण्याबाबत नेते, पदाधिकाऱ्यांत उदासीनता

By अशोक डोंबाळे | Updated: June 18, 2025 17:10 IST

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बांधणीच नाही

अशोक डोंबाळेसांगली : सांगली जिल्हा हा कधीकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. पण, या बालेकिल्ल्याला भाजपने शिरकाव केल्यापासून पडझडीचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. आता तर राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनाच भाजपमध्ये घेऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पण, या धक्क्यानंतर ही काँग्रेस नेत्यांना जाग आल्याचे दिसत नाही. काँग्रेस नेत्यांनी असेच मौन धारण केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा इतिहास खूप जुना आहे आणि जिल्ह्याच्या राजकीय जीवनात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्याला एक स्वतंत्र संस्थानाचा इतिहास आहे आणि स्वातंत्र्यानंतर या जिल्ह्याची राजकीय वाटचाल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल वसंतदादा पाटील होते. वसंतदादा आणि त्यानंतरही अनेक दिवस सांगली जिल्ह्यातून राज्यातील काँग्रेसच्या घडामोडी होत होत्या. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समित्या आणि महापालिका या संस्थांवर ही काँग्रेस आघाडीचे वर्चस्व होते. पण, गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात काँग्रेसची पडझड सुरु झाल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली. पक्षाची बांधणी करण्याकडे नेत्यांकडून दुर्लक्ष होत गेले. यातूनच जिल्ह्यात दिवसेंदिवस काँग्रेसचा टक्का घसरत आहे. यात भरीस भर म्हणून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसला रामराम करुन भाजपचे कमळ हाती घेतले. महापालिका क्षेत्रात दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांचा गट मोठा आहे. जयश्रीताईंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिका क्षेत्रात काँग्रेसला मोठा फटका बसला आहेच. उलट भाजपला एक हाती सत्ता मिळण्याची संधी आहे. काँग्रेसचे सहयोग खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते व पलूस-कडेगाव आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्याकडून काँग्रेसची गळीत रोखण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काँग्रेस नेत्यांनी असेच दुर्लक्ष केल्यास आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व काय असेल, हे सांगायला भविष्य व्यत्ययाची गरज नाही.

काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी डॉ. विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी मनापासून प्रयत्न केल्यास जिल्ह्यात वेगळं चित्र दिसेल. पण, या दोन्ही नेत्यांकडून पक्ष बांधणीला प्राधान्य दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून होताना दिसत आहे. तरुण नेतृत्व असूनही ते काँग्रेसच्या गडाची पडझड रोखण्यात अपयशी ठरत असल्याचेही दिसत आहे.