शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सांगलीत काँग्रेसमध्ये ‘एकी’चे नारे, तर भाजपमध्ये ‘बेकी’चेच वारे; लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 16:21 IST

राष्ट्रवादीसमोरही अडचणींचे बांध

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील रंग बदलत आहेत. काँग्रेसमधील युवा नेत्यांनी एकीचा निर्धार करीत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे. दुसरीकडे विरोधी भाजपमध्ये गटबाजीचा अध्याय छुप्या पद्धतीने लिहिला जात आहे. काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी व ठाकरे गटातील पक्षांतर्गत वातावरणही फारसे चांगले नाही.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत सांगलीत मोठा मेळावा घेऊन काँग्रेसने रणशिंग फुंकल्याने पक्षांतर्गत वातावरण बदलले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील यांच्या पश्चात कार्यकर्ते खचले होते. या प्रमुख नेत्यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. माजी मंत्री विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील अशी काँग्रेस नेत्यांची युवा फळी आता निवडणुकांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सरसावली आहे. या सर्वांनी एकीची मूठ आवळल्याने पक्षातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या यशामुळेही सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे.जिल्हा व तालुकास्तरावर पक्षीय निवडणूक प्रमुख नियुक्त करुन काँग्रेसच्या अगोदरच भाजपने लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला, मात्र पक्षांत गटबजीचे वारे वाहू लागले आहे. भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याशी अनेक नेत्यांचे राजकीय वैर जिल्ह्याला माहीत आहे. याशिवाय भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. काँग्रेसने उघडपणे एकसंधतेचा नारा दिला. पक्षांतर्गत वातावरणही त्याप्रमाणे बदलवले जात आहे. तसा नारा भाजप नेत्यांना देता आला नाही किंवा पक्षातील वातावरण बदलता आलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची वाट सध्या बिकट असल्याचे दिसत आहे.राष्ट्रवादीसमोरही अडचणींचे बांधराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे एकमुखी नेतृत्व पक्षात एकसंधपणा टिकविण्यासाठी कारणीभूत ठरत असले तरी महापालिका क्षेत्रात या गोष्टीचा प्रभाव दिसत नाही. महापालिका क्षेत्रातील नेत्यांमध्ये मोठी गटबाजी दिसून येते. त्याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना बसू शकतो.ठाकरे गटासमोर अस्तित्वाची लढाईशिवसेनेच्या ठाकरे गटाला जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या मित्रपक्षांची त्यांना साथ मिळणार असली तरी पक्षसंघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर राहणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक