शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सांगलीत काँग्रेसमध्ये ‘एकी’चे नारे, तर भाजपमध्ये ‘बेकी’चेच वारे; लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 16:21 IST

राष्ट्रवादीसमोरही अडचणींचे बांध

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील रंग बदलत आहेत. काँग्रेसमधील युवा नेत्यांनी एकीचा निर्धार करीत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे. दुसरीकडे विरोधी भाजपमध्ये गटबाजीचा अध्याय छुप्या पद्धतीने लिहिला जात आहे. काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी व ठाकरे गटातील पक्षांतर्गत वातावरणही फारसे चांगले नाही.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत सांगलीत मोठा मेळावा घेऊन काँग्रेसने रणशिंग फुंकल्याने पक्षांतर्गत वातावरण बदलले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील यांच्या पश्चात कार्यकर्ते खचले होते. या प्रमुख नेत्यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. माजी मंत्री विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील अशी काँग्रेस नेत्यांची युवा फळी आता निवडणुकांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सरसावली आहे. या सर्वांनी एकीची मूठ आवळल्याने पक्षातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या यशामुळेही सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे.जिल्हा व तालुकास्तरावर पक्षीय निवडणूक प्रमुख नियुक्त करुन काँग्रेसच्या अगोदरच भाजपने लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला, मात्र पक्षांत गटबजीचे वारे वाहू लागले आहे. भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याशी अनेक नेत्यांचे राजकीय वैर जिल्ह्याला माहीत आहे. याशिवाय भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. काँग्रेसने उघडपणे एकसंधतेचा नारा दिला. पक्षांतर्गत वातावरणही त्याप्रमाणे बदलवले जात आहे. तसा नारा भाजप नेत्यांना देता आला नाही किंवा पक्षातील वातावरण बदलता आलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची वाट सध्या बिकट असल्याचे दिसत आहे.राष्ट्रवादीसमोरही अडचणींचे बांधराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे एकमुखी नेतृत्व पक्षात एकसंधपणा टिकविण्यासाठी कारणीभूत ठरत असले तरी महापालिका क्षेत्रात या गोष्टीचा प्रभाव दिसत नाही. महापालिका क्षेत्रातील नेत्यांमध्ये मोठी गटबाजी दिसून येते. त्याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना बसू शकतो.ठाकरे गटासमोर अस्तित्वाची लढाईशिवसेनेच्या ठाकरे गटाला जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या मित्रपक्षांची त्यांना साथ मिळणार असली तरी पक्षसंघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर राहणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक