शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

Sangli: कृष्णेच्या पवित्र पाण्यात विष कालवले कुणी?, देशातील चौथी मोठी नदी 

By अविनाश कोळी | Updated: April 19, 2023 12:41 IST

दररोज मिसळतंय ८६.६० दशलक्ष लिटर सांडपाणी

अविनाश कोळीसांगली : देशातील चौथी मोठी नदी असलेल्या कृष्णेचा उगम पश्चिम घाटात झाला असला तरी याच उगमस्थानापासून काही अंतरापर्यंतच तिची शुद्धता जिवंत राहते. त्यानंतर नदीकाठची शेकडो गावे, साखर कारखाने, औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक उद्योग यांच्या माध्यमातून या पाण्यात विष कालवले जाते. केंद्रीय तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध अभ्यास गट, संस्थांनी तयार केलेल्या आजवरच्या अहवालात कृष्णा नदीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली असतानाही त्याबाबत गांभीर्य दाखविले जात नाही.

कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून उगम पावल्यानंतर १६० किलोमीटर अंतर कापून सांगली जिल्ह्यात येते. सांगली जिल्ह्यात ती १३० किलोमीटर वाहत कर्नाटकात जाते. सांगली जिल्ह्यातील १३० किलोमीटर अंतरातच १०४ गावे, एक महापालिका व औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी या नदीत सोडण्यात येते. प्रदूषणातून नदीच्या नरडीचा घोट घेताना त्याचे दुष्परिणाम नागरिकांनाही भोगावे लागत आहेत. गेल्या चाळीस वर्षांत प्रदूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण कृष्णाकाठी वाढल्याचा निष्कर्षही एका अहवालातून पुढे आला आहे. तरीही शासन व प्रशासन निद्रावस्थेत आहे.

दररोज मिसळतंय ८६.६० दशलक्ष लिटर सांडपाणीकृष्णा, वारणा नदीपात्रात तब्बल १६० गावांचे दररोज सुमारे ३०.३५ दशलक्ष लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे. कृष्णा नदीत सांडपाणी सोडणाऱ्या गावांची संख्या १०४ च्या घरात आहे. जिल्ह्यातील १६० गावांमधून जेवढे सांडपाणी दररोज नदीत मिसळते, त्याहून अधिक सांडपाणी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातून कृष्णा नदीत मिसळते. महापालिका क्षेत्रातून तब्बल ५६.२५ दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज नदीत मिसळत आहे.

नदीत सांडपाणी सोडणारे कारखानेसातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात रेड, ऑरेंज व ग्रीन अशा गटांतील ११ हजार ८९४ कारखान्यांचे १ लाख ३३ हजार ५८१ क्युबिक मीटर सांडपाणी दररोज नदीत मिसळते.

रसायनयुक्त शेतीचाही परिणामसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा खोऱ्यात १० लाख २१ हजार ९७९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून तिन्ही जिल्ह्यांत ५ लाख ८३ हजार ७८४ टन खतांची विक्री होते. प्रतिहेक्टर सरासरी १.७५ टन रासायनिक खतांचा वापर होतो, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.

पाण्याची अवस्था अन् वाढलेले आजारकृष्णेच्या पाण्यातील जैविक ऑक्सिजन म्हणजेच बीओडी, बॅक्टेरिया, क्षारता यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी कॉलरा, डायरिया, गॅस्ट्रो, कावीळ व पाण्यातून होणाऱ्या अन्य आजारांचे प्रमाणही वाढत आहे.

प्रदूषणात महाराष्ट्र आघाडीवरकेंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कृष्णा नदीच्या क्षेत्रफळाचा विचार केल्यास कर्नाटकात सर्वाधिक ४४ टक्के, आंध्र प्रदेश, तेलंगणात २९ टक्के तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळ २७ टक्के आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळ कमी असूनही प्रदूषणातील महाराष्ट्राचा वाटा अन्य राज्यांपेक्षा अधिक आहे.

कृष्णा खोऱ्यातील गावे, शहरेजिल्हा - गावेसातारा - १२०७सांगली - ४७६कोल्हापूर - ८५३(कोल्हापुरातील संख्या पंचगंगाकाठची आहे) 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण