शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Sangli: कृष्णेच्या पवित्र पाण्यात विष कालवले कुणी?, देशातील चौथी मोठी नदी 

By अविनाश कोळी | Updated: April 19, 2023 12:41 IST

दररोज मिसळतंय ८६.६० दशलक्ष लिटर सांडपाणी

अविनाश कोळीसांगली : देशातील चौथी मोठी नदी असलेल्या कृष्णेचा उगम पश्चिम घाटात झाला असला तरी याच उगमस्थानापासून काही अंतरापर्यंतच तिची शुद्धता जिवंत राहते. त्यानंतर नदीकाठची शेकडो गावे, साखर कारखाने, औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक उद्योग यांच्या माध्यमातून या पाण्यात विष कालवले जाते. केंद्रीय तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध अभ्यास गट, संस्थांनी तयार केलेल्या आजवरच्या अहवालात कृष्णा नदीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली असतानाही त्याबाबत गांभीर्य दाखविले जात नाही.

कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून उगम पावल्यानंतर १६० किलोमीटर अंतर कापून सांगली जिल्ह्यात येते. सांगली जिल्ह्यात ती १३० किलोमीटर वाहत कर्नाटकात जाते. सांगली जिल्ह्यातील १३० किलोमीटर अंतरातच १०४ गावे, एक महापालिका व औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी या नदीत सोडण्यात येते. प्रदूषणातून नदीच्या नरडीचा घोट घेताना त्याचे दुष्परिणाम नागरिकांनाही भोगावे लागत आहेत. गेल्या चाळीस वर्षांत प्रदूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण कृष्णाकाठी वाढल्याचा निष्कर्षही एका अहवालातून पुढे आला आहे. तरीही शासन व प्रशासन निद्रावस्थेत आहे.

दररोज मिसळतंय ८६.६० दशलक्ष लिटर सांडपाणीकृष्णा, वारणा नदीपात्रात तब्बल १६० गावांचे दररोज सुमारे ३०.३५ दशलक्ष लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे. कृष्णा नदीत सांडपाणी सोडणाऱ्या गावांची संख्या १०४ च्या घरात आहे. जिल्ह्यातील १६० गावांमधून जेवढे सांडपाणी दररोज नदीत मिसळते, त्याहून अधिक सांडपाणी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातून कृष्णा नदीत मिसळते. महापालिका क्षेत्रातून तब्बल ५६.२५ दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज नदीत मिसळत आहे.

नदीत सांडपाणी सोडणारे कारखानेसातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात रेड, ऑरेंज व ग्रीन अशा गटांतील ११ हजार ८९४ कारखान्यांचे १ लाख ३३ हजार ५८१ क्युबिक मीटर सांडपाणी दररोज नदीत मिसळते.

रसायनयुक्त शेतीचाही परिणामसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा खोऱ्यात १० लाख २१ हजार ९७९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून तिन्ही जिल्ह्यांत ५ लाख ८३ हजार ७८४ टन खतांची विक्री होते. प्रतिहेक्टर सरासरी १.७५ टन रासायनिक खतांचा वापर होतो, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.

पाण्याची अवस्था अन् वाढलेले आजारकृष्णेच्या पाण्यातील जैविक ऑक्सिजन म्हणजेच बीओडी, बॅक्टेरिया, क्षारता यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी कॉलरा, डायरिया, गॅस्ट्रो, कावीळ व पाण्यातून होणाऱ्या अन्य आजारांचे प्रमाणही वाढत आहे.

प्रदूषणात महाराष्ट्र आघाडीवरकेंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कृष्णा नदीच्या क्षेत्रफळाचा विचार केल्यास कर्नाटकात सर्वाधिक ४४ टक्के, आंध्र प्रदेश, तेलंगणात २९ टक्के तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळ २७ टक्के आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळ कमी असूनही प्रदूषणातील महाराष्ट्राचा वाटा अन्य राज्यांपेक्षा अधिक आहे.

कृष्णा खोऱ्यातील गावे, शहरेजिल्हा - गावेसातारा - १२०७सांगली - ४७६कोल्हापूर - ८५३(कोल्हापुरातील संख्या पंचगंगाकाठची आहे) 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण