शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

बालचमू रमले कथा, कविता, नाट्यछटांमध्ये!

By admin | Updated: January 3, 2017 22:03 IST

गप्पा, गाणी, कथा, कविता आणि नाट्यछटांमध्ये मंगळवारी महापालिकेच्या शाळांमधील बालचमू रमले. निमित्त होते बालकुमार साहित्य संमेलनाचे

 ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 3 - गप्पा, गाणी, कथा, कविता आणि नाट्यछटांमध्ये मंगळवारी महापालिकेच्या शाळांमधील बालचमू रमले. निमित्त होते बालकुमार साहित्य संमेलनाचे! सांगलीतील आमराई उद्यान संमेलनामुळे जणू काही बालमयच झाले होते. ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांनी नकला सादर करीत बालरसिकांची मने जिंकली. सकाळी ग्रंथदिंडीतील अस्सल पारंपरिकताही मुलांनी अगदी मनापासून जपली.महापालिका व प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आमराईत बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महापालिकेपासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. सजविलेल्या पालखीत ज्ञानेश्वरी ठेवली. आयुक्त रवींद्र खेबूडकर, महापौर हारुण शिकलगार, स्थायी समितीचे सभापती संगीता हारगे, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, गोविंद गोडबोले यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी शाळा क्र. २० ची विद्यार्थिनी आदर्शा मोगणे होती. ग्रंथदिंडीत ५० शाळा सहभागी झाल्या होत्या. धनगरी ढोलनृत्य, लेझिम, झांजपथक होते. मुली-मुले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती. ग्रंथदिंडी आमराईमधील मुक्तांगण साहित्यनगरीत आल्यानंतर उद्घाटन झाले. यावेळी आयुक्त खेबूडकर म्हणाले की, महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत यापुढेही सतत असे अभिनव उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सतत हसत, खेळत राहावे, यादृष्टीने साहित्य संमेलनाची कल्पना आली. या मुलांनाही बालसाहित्यिकांना भेटता यावे, बालकथा, कविता, नाट्यछटा यांची माहिती व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.बालसाहित्यिक गोडबोले यांनी लहानपणीच्या आठवणी, विनोदी किस्से सांगितले. यावेळी लहान मुलाचा रडण्याचा आवाज, रेल्वेचा आवाज, असे आवाज त्यांनी काढून दाखविले. पपेट शो सादर करण्यात आला. उपायुक्त स्मृती पाटील यांनीही मार्गदर्शनकेले. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांनी स्वागत केले. राकेश कांबळे यांनी आभार मानले. वेदिका देवके, मिसबाह मगदूम, फातिमा सज्जाद, वैष्णवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ज्ञानरचनावादाप्रमाणे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचेही आयोजन केले होते. ह्यअंकुरह्ण या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची मुलाखत, तसेच वसंत हंकारे यांचे व्याख्यान झाले.ग्रंथदिंडीत शाळेतील मुलांनी सर्व राष्ट्रपुरुषांची वेशभूषा केली होती. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम , झाशीची राणी लक्ष्मीबाई, बालशिवाजी, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत मुले सहभागी झाली होती. सातवीमधील दिव्यांग विद्यार्थी तुषार मगदूम यानेही कविता, कथा सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली.