शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Sangli: संतोष कदम खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, दोघे संशयित अद्याप पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:16 IST

संशयिताविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चे कलम

सांगली : येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याच्या खूनप्रकरणी संशयित नीतेश वराळे, सूरज जाधव, तुषार भिसे आणि पसार असलेल्या सिद्धार्थ चिपरीकर व शाहरूख शेख या पाचजणांविरुद्ध जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. संतोष कदमच्या खून प्रकरणात ‘ॲट्रॉसिटी’चे कलम लावण्यात आले आहे.सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा खून ७ फेब्रुवारी रोजी कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावर झाला होता. आदल्या दिवशी तो कुरूंदवाड येथे जातो म्हणून तिघांसमवेत मोटारीतून गेला होता. रात्री उशिरा तो परतला नाही. त्यामुळे दि. ७ रोजी पत्नीने शहर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुपारीच त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. माहिती अधिकार कार्यकर्ता संतोषच्या खुनामुळे राज्यभर खळबळ उडाली.संतोष यांनी शासकीय कार्यालयातील काही गैरप्रकार बाहेर काढले होते. महापालिकेतील घोटाळ्यांविरुद्ध आवाज उठवला होता. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी तो महापालिकेवर मोर्चा काढणार होता. मोर्चाची परवानगीही मिळाली होती. दि. ७ रोजी तो मोर्चा काढणार होता. तत्पूर्वीच त्याच्या खुनाची बातमी पुढे आली. या खूनप्रकरणी मोटारीतून गेलेले नितेश वराळे, सूरज जाधव, तुषार भिसे या तिघांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली; तर चिपरीकर व शेख हे दोघे अद्याप पसार आहेत. या खूनप्रकरणात माजी नगरसेवकाचा हात असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. त्यानुसार चौकशीही झाली; परंतु पुरावा नसल्याचे सांगत पोलिसांनी कारवाई केली नाही.पोलिसांनी ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले आहे. संशयितांविरोधात ॲट्रॉसिटीचे कलम वाढविण्यात आले आहे. दोघे संशयित पसार असल्यामुळे पोलिसांचा तपास अद्यापही सुरूच आहे. पोलिसांनी तपासात आर्थिक कारणातून खून झाल्याचे सांगितले आहे. मात्र खुनाचे खरे कारण वेगळेच असल्याचा नातेवाइकांचा संशय कायम आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस