शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

Sangli: शक्तिपीठविरोधात मणेराजुरी येथे येत्या सोमवारी चक्का जाम आंदोलन, विधिमंडळावर मोर्चाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:31 IST

कवलापूर येथील बैठकीत निर्णय, बायका-मुलांसह मोर्चा काढणार

सांगली : शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्गसांगली जिल्ह्यातून रद्दच करावा यासाठी सोमवारी (दि. १६) विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मणेराजुरी (ता. तासगाव) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी केले.महामार्गासंदर्भात कवलापूर (ता. मिरज) येथे रविवारी सायंकाळी बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी घनश्याम नलावडे, शरद पवार गव्हाण, भूषण गुरव, विष्णू सावंत, गजानन सावंत, वामन कदम, शिवाजी शिंदे, राहुल जमदाडे, शेरखान पठाण, विकास मोरे, दत्तात्रय बेडगे, प्रकाश टाकले, मधुकर नलावडे, बाळासाहेब लांडगे, सोनू कुंभार, आदी शेतकरी उपस्थित होते. कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत पावसाळी अधिवेशनात बोलताना मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेअंतीच निर्णय घेऊ, असे विधान केले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळीही शक्तिपीठ लादणार नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. पण, आता निवडणुका संपताच पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाला सांगलीपर्यंत विरोध नसल्याचा दावा केला आहे. पण, त्यांची माहिती चुकीची आहे. शक्तिपीठविरोधी लढ्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातूनच झाली आहे. सध्या पूर्ण झालेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अत्यंत तुरळक वाहतूक असताना नव्याने समांतर महामार्गाची गरज नसल्याचे आम्ही वारंवार सांगत आहोत. महामार्गामुळे हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. नदीकाठावरील गावांवर महापुराचे संकट गडद होणार आहे. महामार्ग उंचावरून जाणार असल्याने भराव पडेल, त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून कित्येक एकर शेती नापीक होणार आहे. त्याामुळे आम्ही महामार्ग होऊ देणार नाही.

बायकामुलांसह मोर्चा काढणारदिगंबर कांबळे म्हणाले, महामार्गबाधित शेतकरी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली बायका-मुलांसह विधिमंडळावर मोर्चा काढतील. तसा निर्णय कवलापूर येथील बैठकीत झाला.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन