शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

सांगलीतील तिन्ही उमेदवारांना स्वकीयांचा धोका, सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

By अविनाश कोळी | Updated: April 17, 2024 18:54 IST

पक्षाचे ऐकायचे की नेत्यांचे?

अविनाश कोळीसांगली : लोकसभेच्या निवडणुकीत सांगली मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना स्वकीयांचीच चिंता सतावत आहे. महाविकास आघाडी व महायुतीअंतर्गत मित्रपक्षांमध्ये समन्वयाचा गोंधळ असतानाच उमेदवारांना त्यांच्याच पक्षातील किंवा मित्रपक्षातील नाराजी, गटबाजीचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचारावरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.भाजपतर्फे खासदार संजय पाटील, उद्धवसेनेतर्फे चंद्रहार पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील, असे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात असतील. चंद्रहार पाटील यांना मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या बंडखोरीची चिंता सतावत आहे. सांगलीच्या जागेवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद अजूनही कायम आहे.महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यावर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बहिष्कार टाकला. काँग्रेस व उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत. घटक पक्ष असूनही त्यांचे सूर बिघडले आहेत. आघाडीच्या मेळाव्यातही चंद्रहार पाटील यांनी भाजपपेक्षा काँग्रेसच्या भूमिकेवर अधिक टीका केली. काँग्रेसचे नेतेही भाजपपेक्षा उद्धवसेनेवर अधिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर आता त्यांनाही चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळे मतविभागणीची चिंता वाटत आहे. पक्षांतर्गत काही अडचणी नसल्या, तरी महाविकास आघाडीअंतर्गत त्यांच्यासाठी चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.राष्ट्रवादीही आघाडीचे कर्तव्य म्हणून उद्धवसेनेसोबत दिसत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी ‘वेट ॲंड वॉच’च्या भूमिकेत होती. आता राष्ट्रवादी व उद्धवसेना एकत्रित असून, काँग्रेस नेत्यांनाही आघाडीच्या कर्तव्य भावनेतून त्यांच्यासोबत राहावे लागू शकते. अशावेळी विशाल पाटील यांना त्यांच्या स्वकीयांचीही साथ लाभेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

भाजप उमेदवाराला स्वकीयांचा त्रासभाजपचे उमेदवार संजय पाटील यांनाही स्वकीयांचा त्रास जाणवत आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप व माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर टीका केली. आता जगतापांनी पक्ष साेडला आहे. देशमुख पक्षात असूनही नाराज आहेत. मिरजेतील भाजपच्या माजी नगरसेवकांनीही विशाल पाटील यांच्याशी सलगी केली आहे.

पक्षाचे ऐकायचे की नेत्यांचे?भाजपच्या राज्य स्तरावरील नेत्यांकडून कधी ऑफलाइन तर कधी ऑनलाइन बैठका घेतल्या जात आहेत. भाजपसाठी प्रामाणिक प्रचार करण्याच्या सूचना ते देत आहेत. दुसरीकडे पक्षातील नाराज नेते उमेदवाराच्या प्रचारापासून कार्यकर्त्यांना परावृत्त करताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षाचे ऐकायचे की नेत्यांचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjaykaka patilसंजयकाका पाटीलchandrahar patilचंद्रहार पाटीलvishal patilविशाल पाटील