शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचे धोरण - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:58 IST

शिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त देशाचा जसा नारा दिला, त्याचपद्धतीने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाबाबत वेगळी भूमिका मांडली असली तरी आमच्या पक्षात विरोधाभास नाही, असे मत भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, आम्ही केवळ मोदींच्या धोरणानुसार चालत आहोत. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ भाजपचेच अस्तित्व दिसेल, यासाठी काम करायचे आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. याठिकाणी पक्ष मजबूत आहेच, मात्र ज्याठिकाणी काही कमतरता जाणवेल त्याठिकाणी आवश्यकतेनुसार राजकीय व्हिटॅमिन देण्याचा प्रयत्न आम्ही करु. गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले. त्याचपद्धतीचे राजकारण मला करायचे आहे. या दोन्ही जिल्ह्यांत त्यांनी जोडलेली असंख्य माणसे असल्याने मला याठिकाणी चांगले काम करता येईल.महाराष्ट्रातील कारभार सध्या अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे. मंत्रिमंडळातील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे कारवाई झाल्यानंतरही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारविषयी शंका आहे.न्यायालयांचे आदेश सूर्यप्रकाशासारखेईडीसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. या यंत्रणांच्या कारवाईविरोधात अनेकजण न्यायालयात गेले आहेत. न्यायालयांचे निकाल तर सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहेत, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.‘म्हैसाळ’ भ्रूणहत्येवर आवाज उठविणारमुंडे म्हणाल्या की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे पाच वर्षांपूर्वी भ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस आले होते. पाच वर्षानंतरही विशेष सरकारी वकील का नियुक्त झाला नाही, याची चौकशी करून आवाज उठवू. पुण्यातील किडनी रॅकेटबाबतही भाजप विधानसभेत आवाज उठवेल.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारमुळेराज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण झाला आहे. न्यायालयात ओबीसींना न्याय मिळावा म्हणून मी देवाला साकडे घालते, असे मुंडे यांनी सांगितले.नाईकांबद्दल आदरचशिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेcongressकाँग्रेस