शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचे धोरण - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:58 IST

शिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त देशाचा जसा नारा दिला, त्याचपद्धतीने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाबाबत वेगळी भूमिका मांडली असली तरी आमच्या पक्षात विरोधाभास नाही, असे मत भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, आम्ही केवळ मोदींच्या धोरणानुसार चालत आहोत. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ भाजपचेच अस्तित्व दिसेल, यासाठी काम करायचे आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. याठिकाणी पक्ष मजबूत आहेच, मात्र ज्याठिकाणी काही कमतरता जाणवेल त्याठिकाणी आवश्यकतेनुसार राजकीय व्हिटॅमिन देण्याचा प्रयत्न आम्ही करु. गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले. त्याचपद्धतीचे राजकारण मला करायचे आहे. या दोन्ही जिल्ह्यांत त्यांनी जोडलेली असंख्य माणसे असल्याने मला याठिकाणी चांगले काम करता येईल.महाराष्ट्रातील कारभार सध्या अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे. मंत्रिमंडळातील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे कारवाई झाल्यानंतरही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारविषयी शंका आहे.न्यायालयांचे आदेश सूर्यप्रकाशासारखेईडीसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. या यंत्रणांच्या कारवाईविरोधात अनेकजण न्यायालयात गेले आहेत. न्यायालयांचे निकाल तर सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहेत, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.‘म्हैसाळ’ भ्रूणहत्येवर आवाज उठविणारमुंडे म्हणाल्या की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे पाच वर्षांपूर्वी भ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस आले होते. पाच वर्षानंतरही विशेष सरकारी वकील का नियुक्त झाला नाही, याची चौकशी करून आवाज उठवू. पुण्यातील किडनी रॅकेटबाबतही भाजप विधानसभेत आवाज उठवेल.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारमुळेराज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण झाला आहे. न्यायालयात ओबीसींना न्याय मिळावा म्हणून मी देवाला साकडे घालते, असे मुंडे यांनी सांगितले.नाईकांबद्दल आदरचशिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेcongressकाँग्रेस