शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचे धोरण - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:58 IST

शिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त देशाचा जसा नारा दिला, त्याचपद्धतीने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाबाबत वेगळी भूमिका मांडली असली तरी आमच्या पक्षात विरोधाभास नाही, असे मत भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, आम्ही केवळ मोदींच्या धोरणानुसार चालत आहोत. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ भाजपचेच अस्तित्व दिसेल, यासाठी काम करायचे आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. याठिकाणी पक्ष मजबूत आहेच, मात्र ज्याठिकाणी काही कमतरता जाणवेल त्याठिकाणी आवश्यकतेनुसार राजकीय व्हिटॅमिन देण्याचा प्रयत्न आम्ही करु. गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले. त्याचपद्धतीचे राजकारण मला करायचे आहे. या दोन्ही जिल्ह्यांत त्यांनी जोडलेली असंख्य माणसे असल्याने मला याठिकाणी चांगले काम करता येईल.महाराष्ट्रातील कारभार सध्या अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे. मंत्रिमंडळातील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे कारवाई झाल्यानंतरही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारविषयी शंका आहे.न्यायालयांचे आदेश सूर्यप्रकाशासारखेईडीसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. या यंत्रणांच्या कारवाईविरोधात अनेकजण न्यायालयात गेले आहेत. न्यायालयांचे निकाल तर सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहेत, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.‘म्हैसाळ’ भ्रूणहत्येवर आवाज उठविणारमुंडे म्हणाल्या की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे पाच वर्षांपूर्वी भ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस आले होते. पाच वर्षानंतरही विशेष सरकारी वकील का नियुक्त झाला नाही, याची चौकशी करून आवाज उठवू. पुण्यातील किडनी रॅकेटबाबतही भाजप विधानसभेत आवाज उठवेल.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारमुळेराज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण झाला आहे. न्यायालयात ओबीसींना न्याय मिळावा म्हणून मी देवाला साकडे घालते, असे मुंडे यांनी सांगितले.नाईकांबद्दल आदरचशिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेcongressकाँग्रेस