शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

लोकहित सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:33 PM

शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे.

ठळक मुद्देभाजपवरील टीका सेनाप्रमुख विसरले का?

इस्लामपूर : शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे.आ. पाटील हे अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत भारतीय प्रश्नावर व्याख्यान देण्यासाठी गेले आहेत. तेथून त्यांनी हे ट्विट करीत शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

आ. पाटील म्हणाले, शिवसेनेने गेल्या चार वर्षात मोदी सरकार व भाजपवर जहरी टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दै. सामनाच्या संपादकीयमधून मोदी सरकार व भाजपची लक्तरे काढली आहेत. शिवसेनेने मोदी सरकारची ‘जुलमी ब्रिटिश राजवटी’शी तुलना करून या सरकारला झोपाळू ‘कुंभकर्ण’ अशी उपमा दिली आहे. प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करण्यापर्यंत मजल मारल्याचे राज्यातील, देशातील जनतेने पाहिले, ऐकले आहे.

युती गेली खड्ड्यात. आधी शेतकºयांच्या कर्जमाफीचे बोला, भाजपाच्या राजवटीतील महागाईने सामान्य जनता होरपळून गेली आहे, भाजपची नोटाबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचा कट आहे, पहले मंदिर फिर सरकार, गुजरात मॉडेल म्हणजे प्रसिध्दीचा स्टंट असल्याची टीका करीत भाजपच्या गुजरातमधील काठावरील विजयावर, चार राज्यांतील पराभवावर तुटून पडत युवा नेता हार्दिक पटेलचे कौतुक करणारी शिवसेना कशी बदलली? उध्दवजीनी दिलेल्या ‘स्वबळा’च्या नाºयाचे काय झाले? शिवसेनेने गेल्या चार वर्षात मोदी सरकार व भाजपाविरोधी घेतलेली भूमिका विसरली काय? का हा केवळ पब्लिसिटी स्टंट होता? असे सवाल जयंत पाटील यांंनी ट्विटद्वारे केले आहेत.शिवसेना भूमिका विसरली का?जयंत पाटील यांनी या माध्यमातून शिवसेना आणि भाजपमधील गत चार वर्षातील टोकाच्या संघर्षाचा धागा पकडून शरसंधान साधले. उद्धव ठाकरे यांंनी स्वबळाची भाषा करूनही भाजपसोबत युती केली. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने युतीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यांनी लोकहितापेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे त्यांची सत्तेसाठीची इच्छा दडून राहिली नाही. गेल्या चार वर्षात शिवसेनेने मोदी सरकार व भाजपविरोधी घेतलेली भूमिका विसरली का? असा सवाल पाटील यांंनी टष्ट्वीटद्वारे केला आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणSangliसांगली