शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेचं गणित सुटणार का? खाडेंना दणका बसणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 13:56 IST

श्रीनिवास नागे मिरजेचं गणित भल्याभल्यांना कळलं नाही, पण भाजपचे आमदार सुरेश खाडेंनी मात्र ते गणित सोडवलंय. सलग तीनदा विधानसभेला ...

श्रीनिवास नागे

मिरजेचं गणित भल्याभल्यांना कळलं नाही, पण भाजपचे आमदार सुरेश खाडेंनी मात्र ते गणित सोडवलंय. सलग तीनदा विधानसभेला बाजी मारलीय. निवडून आल्यानंतर ते गायब होतात आणि पुढच्या निवडणुकीआधी वर्षभर ते हात सैल सोडतात, असं तोंडसुख त्यांच्यावर घेतलं जातं. पण, विरोधकांत एकमत नसतं आणि त्यांचे उमेदवार हात सैल सोडण्यात फारच ढिले असतात, हेही खरं. एकास एक लढत झाली तर खाडेंना घाम फुटू शकतो, हे मागच्यावेळी दिसलंय. त्यामुळं काँग्रेसला पद्धतशीर बाजूला करून राष्ट्रवादीनं मिरज काबीज करण्याच्या हालचाली सुरू केल्यात.

विधानसभेच्या २००९ मधील निवडणुकीवेळी मिरज मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि २००४ मध्ये जतमधून निवडून आलेले सुरेश खाडे मिरजेकडं वळले. त्यांच्या रूपानं मिरजेत भाजपला सढळ हाताचा उमेदवार मिळाला. रिपब्लिकन पक्ष ते भाजप असा त्यांचा प्रवास, पण ‘आपण म्हणजेच पक्ष’ आणि ‘मनी पाॅवरवर कुणालाही झुकवता येतं’ हे त्यांचं सूत्र असल्याचं खुद्द भाजपवालेच सांगतात. पक्षापेक्षा आपलं बस्तान बसवण्याकडंच त्यांचं जास्त लक्ष असल्यामुळं जिल्हाध्यक्षांपासून खासदारांपर्यंतचे काही नेते त्यांच्यापासून फटकून असतात.

खाडे मात्र निवडणुकीआधी या सगळ्यांना ओंजारतात-गोंजारतात. गल्लीबोळातली तरुण मंडळं याच काळात भरभराटीला येतात. गावागावांत समाजमंदिरांना निधी पुरवला जातो. त्या-त्या समाजाच्या नेत्यांचे हात ओले होतात. भल्याभल्यांना पाणी दाखवणारे ‘मिरज पॅटर्न’चे नेतेही हात धुऊन घेतात. खाडेंचे निवडून येण्याचे रस्ते सुकर होतात.

दुसरीकडं विरोधकांत एकीपेक्षा बेकीच जास्त. २००९ मध्ये खाडेंना ९६,३६९ मतं मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब होनमोरे ४२,०२६ मतांवर थांबले होते. सगळ्या विरोधकांची बेरीज ७० हजारांपर्यंत जात होती. २०१४ मध्ये खाडेंनी ९३,७९५ मतं घेतली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेसकट चौघा विरोधकांत विरोधी मतांची विभागणी झाली. ती ८० हजारांपर्यंत होती. त्यावेळी राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपनं खाडेंना शेवटची दीड वर्षं कॅबिनेट मंत्रीपद दिलं.

२०१९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या एका गटानं ‘गेम’ केली. आघाडीचं तिकीट काँग्रेसमधल्या वसंतदादा गटाला जाऊ नये, यासाठी मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आला. ‘स्वाभिमानी’कडं उमेदवार नव्हता. त्यामुळं २००९ मध्ये काँग्रेसकडून, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीकडून लढलेल्या बाळासाहेब होनमोरेंच्याच गळ्यात ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारीची माळ पडली. ते तसे वसंतदादा गटाचे. पण, राष्ट्रवादीनं त्यांना आपल्याकडं घेऊन जिल्हा बँकेत संचालक केलेलं. विधानसभेला त्यांना दादा गटानंही हात दिला. त्यांनी तब्बल ६५,९७१ मतांपर्यंत मजल मारली. स्वत:चं ‘पॉकेट’ कायम राखणाऱ्या खाडेंना ९६,३६९ मतं मिळाली.

ऐनवेळी दिलेला उमेदवार, त्यात पक्षाचं चिन्ह नाही, तरीही खाडेंना घाम फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आलं. आताचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तेव्हाच भविष्यातली समीकरणं ओळखली आणि खेळी रचली. २०१९ मध्ये ‘स्वाभिमानी’ला तिकीट देऊन वसंतदादा गटाला शह देतानाच २०२४ मधील काँग्रेसच्या उमेदवारीचा दावा कमकुवत करून ठेवला. त्यानंतर, मिरज पूर्वभागातली मदनभाऊ-वसंतदादा गटातली नेतेमंडळी आपल्याकडं वळवली. आता म्हैसाळ योजनेचं पाणी वंचित गावांना दिलंय.

विकासकामांचा धुरळा उडवलाय. होनमोरेंसोबत नवे चेहरे मतदारसंघात फिरवायला सुरुवात केलीय. मिरज शहरातल्या भाजपच्या नगरसेवकांत कळ लावलीय. काहींना चुचकारलंय. ते कधीही पलटी मारतील, अशी फूस लावलीय. महापालिकेतल्या महाआघाडीच्या प्रयोगाचा अनुभव त्यांना आहेच. शिवाय आता राज्यात आणि महापालिकेत सत्ताही आहे...

...आणि काँग्रेस मात्र नेहमीसारखी चाचपडतेय.

जाता-जाता : महाविकास आघाडीतल्या काँग्रेस-शिवसेनेकडं खाडेंना टक्कर देणारा उमेदवार सध्यातरी नाही. त्यातच सुरेश खाडेंनी पुढच्यावेळी हातकणंगले राखीव मतदारसंघातून लढण्याच्या हालचाली सुरू केल्याची कुजबुज मोहीम सुरू झालीय. मिरजेत म्हणे भाजपची उमेदवारी महिलेला दिली जाईल. कोण असेल या मोहिमेमागं?

आधी जिल्हा परिषद, आता पंचायत समिती

राष्ट्रवादीची तयारी विधानसभेची असली, तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत. मिरज तालुका एकेकाळचा काँग्रेसचा गड. या गडाला कधीच सुरुंग लागलाय. जिल्हा परिषदेच्या इथल्या जागा भाजपनं बळकावल्यात. पंचायत समितीवर कब्जा केलाय. पण, भाजपमध्ये कुरबुरी आहेत. लोकसभेला खासदार संजयकाका पाटील यांना, तर विधानसभेला खाडेविरोधकांना उचलून घेण्याचा पायंडा पडलाय. त्यामुळं आधी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नंतर विधानसभा, हे राष्ट्रवादीचं लक्ष्य नसेल तरच नवल!

शंभर कोटींच्या रस्त्याचं काय झालं?

मिरजेतल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचं घोंगडं पाच वर्षे भिजत पडलंय. हा शहरातला मुख्य रस्ता. तो महामार्गाला जोडण्यासाठी आणि अंतर्गत रस्त्यांसाठी १०० कोटी आणल्याचे दावे दहावेळा करून झाले. खुद्द खाडेंनी या रस्त्याच्या कामाबाबत घोषणांचा पाऊस पाडला, दोन वर्षांत बैठकाच बैठका घेतल्या. पण, रस्त्याचं काम पुढं सरकेना! स्वत:च्या केंद्रीय मंत्र्यांकडून निधी मिळूनही, महापालिकेत सत्ता असतानाही (आणि आता नसतानाही) भाजपला म्हणजे आमदार खाडेंना काम मार्गी लावता आलेलं नाही.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस