शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

मिरजेचं गणित सुटणार का? खाडेंना दणका बसणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 13:56 IST

श्रीनिवास नागे मिरजेचं गणित भल्याभल्यांना कळलं नाही, पण भाजपचे आमदार सुरेश खाडेंनी मात्र ते गणित सोडवलंय. सलग तीनदा विधानसभेला ...

श्रीनिवास नागे

मिरजेचं गणित भल्याभल्यांना कळलं नाही, पण भाजपचे आमदार सुरेश खाडेंनी मात्र ते गणित सोडवलंय. सलग तीनदा विधानसभेला बाजी मारलीय. निवडून आल्यानंतर ते गायब होतात आणि पुढच्या निवडणुकीआधी वर्षभर ते हात सैल सोडतात, असं तोंडसुख त्यांच्यावर घेतलं जातं. पण, विरोधकांत एकमत नसतं आणि त्यांचे उमेदवार हात सैल सोडण्यात फारच ढिले असतात, हेही खरं. एकास एक लढत झाली तर खाडेंना घाम फुटू शकतो, हे मागच्यावेळी दिसलंय. त्यामुळं काँग्रेसला पद्धतशीर बाजूला करून राष्ट्रवादीनं मिरज काबीज करण्याच्या हालचाली सुरू केल्यात.

विधानसभेच्या २००९ मधील निवडणुकीवेळी मिरज मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि २००४ मध्ये जतमधून निवडून आलेले सुरेश खाडे मिरजेकडं वळले. त्यांच्या रूपानं मिरजेत भाजपला सढळ हाताचा उमेदवार मिळाला. रिपब्लिकन पक्ष ते भाजप असा त्यांचा प्रवास, पण ‘आपण म्हणजेच पक्ष’ आणि ‘मनी पाॅवरवर कुणालाही झुकवता येतं’ हे त्यांचं सूत्र असल्याचं खुद्द भाजपवालेच सांगतात. पक्षापेक्षा आपलं बस्तान बसवण्याकडंच त्यांचं जास्त लक्ष असल्यामुळं जिल्हाध्यक्षांपासून खासदारांपर्यंतचे काही नेते त्यांच्यापासून फटकून असतात.

खाडे मात्र निवडणुकीआधी या सगळ्यांना ओंजारतात-गोंजारतात. गल्लीबोळातली तरुण मंडळं याच काळात भरभराटीला येतात. गावागावांत समाजमंदिरांना निधी पुरवला जातो. त्या-त्या समाजाच्या नेत्यांचे हात ओले होतात. भल्याभल्यांना पाणी दाखवणारे ‘मिरज पॅटर्न’चे नेतेही हात धुऊन घेतात. खाडेंचे निवडून येण्याचे रस्ते सुकर होतात.

दुसरीकडं विरोधकांत एकीपेक्षा बेकीच जास्त. २००९ मध्ये खाडेंना ९६,३६९ मतं मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब होनमोरे ४२,०२६ मतांवर थांबले होते. सगळ्या विरोधकांची बेरीज ७० हजारांपर्यंत जात होती. २०१४ मध्ये खाडेंनी ९३,७९५ मतं घेतली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेसकट चौघा विरोधकांत विरोधी मतांची विभागणी झाली. ती ८० हजारांपर्यंत होती. त्यावेळी राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपनं खाडेंना शेवटची दीड वर्षं कॅबिनेट मंत्रीपद दिलं.

२०१९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या एका गटानं ‘गेम’ केली. आघाडीचं तिकीट काँग्रेसमधल्या वसंतदादा गटाला जाऊ नये, यासाठी मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आला. ‘स्वाभिमानी’कडं उमेदवार नव्हता. त्यामुळं २००९ मध्ये काँग्रेसकडून, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीकडून लढलेल्या बाळासाहेब होनमोरेंच्याच गळ्यात ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारीची माळ पडली. ते तसे वसंतदादा गटाचे. पण, राष्ट्रवादीनं त्यांना आपल्याकडं घेऊन जिल्हा बँकेत संचालक केलेलं. विधानसभेला त्यांना दादा गटानंही हात दिला. त्यांनी तब्बल ६५,९७१ मतांपर्यंत मजल मारली. स्वत:चं ‘पॉकेट’ कायम राखणाऱ्या खाडेंना ९६,३६९ मतं मिळाली.

ऐनवेळी दिलेला उमेदवार, त्यात पक्षाचं चिन्ह नाही, तरीही खाडेंना घाम फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आलं. आताचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तेव्हाच भविष्यातली समीकरणं ओळखली आणि खेळी रचली. २०१९ मध्ये ‘स्वाभिमानी’ला तिकीट देऊन वसंतदादा गटाला शह देतानाच २०२४ मधील काँग्रेसच्या उमेदवारीचा दावा कमकुवत करून ठेवला. त्यानंतर, मिरज पूर्वभागातली मदनभाऊ-वसंतदादा गटातली नेतेमंडळी आपल्याकडं वळवली. आता म्हैसाळ योजनेचं पाणी वंचित गावांना दिलंय.

विकासकामांचा धुरळा उडवलाय. होनमोरेंसोबत नवे चेहरे मतदारसंघात फिरवायला सुरुवात केलीय. मिरज शहरातल्या भाजपच्या नगरसेवकांत कळ लावलीय. काहींना चुचकारलंय. ते कधीही पलटी मारतील, अशी फूस लावलीय. महापालिकेतल्या महाआघाडीच्या प्रयोगाचा अनुभव त्यांना आहेच. शिवाय आता राज्यात आणि महापालिकेत सत्ताही आहे...

...आणि काँग्रेस मात्र नेहमीसारखी चाचपडतेय.

जाता-जाता : महाविकास आघाडीतल्या काँग्रेस-शिवसेनेकडं खाडेंना टक्कर देणारा उमेदवार सध्यातरी नाही. त्यातच सुरेश खाडेंनी पुढच्यावेळी हातकणंगले राखीव मतदारसंघातून लढण्याच्या हालचाली सुरू केल्याची कुजबुज मोहीम सुरू झालीय. मिरजेत म्हणे भाजपची उमेदवारी महिलेला दिली जाईल. कोण असेल या मोहिमेमागं?

आधी जिल्हा परिषद, आता पंचायत समिती

राष्ट्रवादीची तयारी विधानसभेची असली, तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत. मिरज तालुका एकेकाळचा काँग्रेसचा गड. या गडाला कधीच सुरुंग लागलाय. जिल्हा परिषदेच्या इथल्या जागा भाजपनं बळकावल्यात. पंचायत समितीवर कब्जा केलाय. पण, भाजपमध्ये कुरबुरी आहेत. लोकसभेला खासदार संजयकाका पाटील यांना, तर विधानसभेला खाडेविरोधकांना उचलून घेण्याचा पायंडा पडलाय. त्यामुळं आधी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नंतर विधानसभा, हे राष्ट्रवादीचं लक्ष्य नसेल तरच नवल!

शंभर कोटींच्या रस्त्याचं काय झालं?

मिरजेतल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचं घोंगडं पाच वर्षे भिजत पडलंय. हा शहरातला मुख्य रस्ता. तो महामार्गाला जोडण्यासाठी आणि अंतर्गत रस्त्यांसाठी १०० कोटी आणल्याचे दावे दहावेळा करून झाले. खुद्द खाडेंनी या रस्त्याच्या कामाबाबत घोषणांचा पाऊस पाडला, दोन वर्षांत बैठकाच बैठका घेतल्या. पण, रस्त्याचं काम पुढं सरकेना! स्वत:च्या केंद्रीय मंत्र्यांकडून निधी मिळूनही, महापालिकेत सत्ता असतानाही (आणि आता नसतानाही) भाजपला म्हणजे आमदार खाडेंना काम मार्गी लावता आलेलं नाही.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस