शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-कोल्हापूर रस्त्याला मुहूर्त कधी?, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:57 IST

आणखी किती बळी घेणार?

सांगली : सांगली ते कोल्हापूर या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे सापळे तयार झाले आहेत. या रस्त्यावरून सुरक्षितरीत्या प्रवास करणे, म्हणजे मोठी लढाई जिंकण्यासारखी स्थिती आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदारांच्या लेखी हा रस्ता पूर्णत: दुर्लक्षित आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणानेही त्याकडे दुर्लक्षाचेच धोरण अवलंबल्याचे दिसत आहे.सांगली-कोल्हापूरदरम्यान दररोज हजारो वाहने धावतात. हे पाहता त्याचा दर्जा किमान राज्य महामार्गासारखा असायला हवा. पण, प्रत्यक्षात चित्र उलटे आहे. सांगलीपासून अतिग्रेपर्यंत सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर फुटभर खोलीचे आहेत. दोन्ही बाजूंच्या बाजूपट्ट्या खचल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे. चौंडेश्वरी सुतगिरणीजवळ तर सर्वत्र खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने धुळीचे लोट उठतात.अंकली ते जयसिंगपूरदरम्यानही शोचनीय अवस्था आहे. उदगावमध्ये बंद पथकर नाक्याजवळ रस्त्यावर थोडेही डांबर उरलेले नाही. जयसिंगपूर ते इचलकरंजी फाटा यादरम्यान मध्येच येणारा भलामोठा खड्डा एखाद्या दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कधीही कारणीभूत होऊ शकतो. ते भरण्याची तसदी महामार्ग प्राधिकरण घेताना दिसत नाही. दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा तितकाच महत्त्वाचा रस्ता दुरुस्त का केला जात नाही? असा खडा सवाल प्राधिकरणाला विचारण्याचे धाडस सांगली, कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी करत नाहीत, हे प्रवाशांचे दुर्दैव आहे.

जबाबदारी सांगलीच्या की कोल्हापूरच्या नेत्यांची?मागण्यांच्या पूर्ततेसाठी दणकेबाज आंदोलनांची मर्दुमकी दाखविणाऱ्या कोल्हापूरच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगली रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का?, असा प्रश्न आहे. तर, सांगलीचे नेते महागड्या आरामदायी गाड्यांमधून प्रवास करत असल्याने त्यांना खड्ड्यांचा जाच होत नसावा, अशी शंका निर्माण होत आहे.

रस्ता करायचा नव्हता, तर महामार्गने घेतला कशासाठी?सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतला, तेव्हापासून या रस्त्याचे रडगाणे सुरू झाले आहे. तत्पूर्वी सांगलीपर्यंतचा भाग सांगलीचा सार्वजनिक बांधकाम तंदुरुस्त ठेवायचा. कोल्हापूरच्या भागावर तेथील सार्वजनिक बांधकामचे लक्ष होते. प्राधिकरणाने तो ताब्यात घेतल्यापासून त्याचे रडगाणे सुरू झाले आहे.

आणखी किती बळींची प्रतीक्षा?नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अंकली पुलावरून चारचाकी पात्रात कोसळून सांगलीतील तिघांचा बळी गेला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग येऊन पुलावर बॅरिकेड्स बसविले गेले. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरही अशाच बळींची प्राधिकरणाला प्रतीक्षा आहे का?, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग