शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

सांगली-कोल्हापूर रस्त्याला मुहूर्त कधी?, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:57 IST

आणखी किती बळी घेणार?

सांगली : सांगली ते कोल्हापूर या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे सापळे तयार झाले आहेत. या रस्त्यावरून सुरक्षितरीत्या प्रवास करणे, म्हणजे मोठी लढाई जिंकण्यासारखी स्थिती आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदारांच्या लेखी हा रस्ता पूर्णत: दुर्लक्षित आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणानेही त्याकडे दुर्लक्षाचेच धोरण अवलंबल्याचे दिसत आहे.सांगली-कोल्हापूरदरम्यान दररोज हजारो वाहने धावतात. हे पाहता त्याचा दर्जा किमान राज्य महामार्गासारखा असायला हवा. पण, प्रत्यक्षात चित्र उलटे आहे. सांगलीपासून अतिग्रेपर्यंत सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर फुटभर खोलीचे आहेत. दोन्ही बाजूंच्या बाजूपट्ट्या खचल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे. चौंडेश्वरी सुतगिरणीजवळ तर सर्वत्र खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने धुळीचे लोट उठतात.अंकली ते जयसिंगपूरदरम्यानही शोचनीय अवस्था आहे. उदगावमध्ये बंद पथकर नाक्याजवळ रस्त्यावर थोडेही डांबर उरलेले नाही. जयसिंगपूर ते इचलकरंजी फाटा यादरम्यान मध्येच येणारा भलामोठा खड्डा एखाद्या दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कधीही कारणीभूत होऊ शकतो. ते भरण्याची तसदी महामार्ग प्राधिकरण घेताना दिसत नाही. दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा तितकाच महत्त्वाचा रस्ता दुरुस्त का केला जात नाही? असा खडा सवाल प्राधिकरणाला विचारण्याचे धाडस सांगली, कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी करत नाहीत, हे प्रवाशांचे दुर्दैव आहे.

जबाबदारी सांगलीच्या की कोल्हापूरच्या नेत्यांची?मागण्यांच्या पूर्ततेसाठी दणकेबाज आंदोलनांची मर्दुमकी दाखविणाऱ्या कोल्हापूरच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगली रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का?, असा प्रश्न आहे. तर, सांगलीचे नेते महागड्या आरामदायी गाड्यांमधून प्रवास करत असल्याने त्यांना खड्ड्यांचा जाच होत नसावा, अशी शंका निर्माण होत आहे.

रस्ता करायचा नव्हता, तर महामार्गने घेतला कशासाठी?सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतला, तेव्हापासून या रस्त्याचे रडगाणे सुरू झाले आहे. तत्पूर्वी सांगलीपर्यंतचा भाग सांगलीचा सार्वजनिक बांधकाम तंदुरुस्त ठेवायचा. कोल्हापूरच्या भागावर तेथील सार्वजनिक बांधकामचे लक्ष होते. प्राधिकरणाने तो ताब्यात घेतल्यापासून त्याचे रडगाणे सुरू झाले आहे.

आणखी किती बळींची प्रतीक्षा?नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अंकली पुलावरून चारचाकी पात्रात कोसळून सांगलीतील तिघांचा बळी गेला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग येऊन पुलावर बॅरिकेड्स बसविले गेले. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरही अशाच बळींची प्राधिकरणाला प्रतीक्षा आहे का?, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग