शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

आटपाडीचा पाऊस सरासरी ३0 दिवसांचा --दुष्काळाचे दुष्टचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:08 AM

या पावसाचा कसलाच उपयोग नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे कोरड्या पावसाळ्यांना या भागाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे कोरडेपणाच : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कधीही घेतले नाही पूर्ण क्षमतेने उत्पादन

अविनाश बाड ।आटपाडी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशात चार ऋतू मानले आहेत. उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा आणि हिवाळा. यापैकी पावसाळा आणि परतीचा मान्सून हे दोन ऋतू एकत्र करून आटपाडी तालुक्यातील पर्जन्यवृष्टी मोजली जाते. गेल्या ६६ वर्षात या दोन ऋतूत सरासरी फक्त ३० दिवस पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमान ३५५ मि.मी. म्हणजे तालुक्यात पडणाºया पावसाच्या दिवशीही सरासरी ११ ते १२ मि.मी. पाऊस पडतो. या पावसाचा कसलाच उपयोग नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे कोरड्या पावसाळ्यांना या भागाला सामोरे जावे लागत आहे.

आटपाडी तालुक्यात जून ते आॅक्टोबर असा दोन्ही ऋतूंचा एकत्रित पाऊस मोजला जातो आणि त्याची सरासरी ३५५ मि.मी. एवढी आहे. दि. १५ जून ते १५ जुलै हा खरीप हंगामाचा पेरणीचा काळ आहे. पण गेल्या ६६ वर्षात जून आणि जुलै महिन्यात सरासरी फक्त ११ ते १२ दिवसच पावसाने हजेरी लावली आहे. वर्ष-वर्ष पाण्यासाठी तहानलेच्या जमिनीची तहान या तुरळक पावसाने कधीही भागत नाही. मोठ्या पावसाचे प्रमाण नेहमी कमी असते. त्यामुळे ओढे, नाले न वाहिल्याने आणि पेरणी करण्याएवढी सुद्धा ओल न झाल्याने वर्षानुवर्षे खरीप हंगाम इथे यशस्वी झालेला नाही. ज्यावर्षी पेरणी झाली, त्यानंतर पावसात मोठा खंड पडल्याने उगवलेली पिके वाळून गेली. त्यामुळे इथला शेतकरी कधीही खरीप हंगामाचे पूर्ण क्षमतेने उत्पादन घेऊ शकला नाही.

१९५३ पासून २०१८ पर्यंत जून ते आॅक्टोबर या महिन्यात २००६ दिवस तालुक्याला पावसाने तोंड दाखविले आहे. म्हणजे सरासरी ३० ते ३१ दिवस पावसाने दरवर्षी या पाच महिन्यात हजेरी लावली. वाईट म्हणजे यामध्ये एक मि.मी. ते ५ मि.मी. पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत. या पावसाचा तापमान कमी करण्याशिवाय काहीच उपयोग होत नाही. या पावसाचा ना शेतीला, ना भूजल पातळी वाढण्याला कसलाही उपयोग होत नाही.३७ वर्षात मोठा पाऊस नाही!१९८१ मध्ये आटपाडीत ८२२ मि.मी. पाऊस झाला. त्यावर्षी दि. २२ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १६६ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर सलग ५ वर्षे दुष्काळ पडला. गेल्या ३७ वर्षात एका दिवशी तर नाहीच, पण एका वर्षातही एवढा सरासरी पाऊस झाला नाही. १९८१ पूर्वी १९६८ मध्ये ९२४, तर १९६२ मध्ये ८९६ मि.मी. पावसाची नोंद आहे. गेल्या ६६ वर्षात फक्त तीन वर्षे विक्रमी पाऊस झाला. उर्वरित पावसाळे कोरडेच.आटपाडी की जैसलमेर?देशात सर्वात कमी पाऊस राजस्थानातील जैसलमेर येथे वार्षिक सरासरी १२० मि.मी. एवढा पडतो. आटपाडी तालुक्याने अनेकवेळा जैसलमेरएवढा पाऊस अनुभवला आहे. १९७२ मध्ये तालुक्यात फक्त १० दिवस पाऊस आला. त्यावर्षी १६३ मि.मी. पावसाची नोंद झाली. २००२ मध्ये २७ दिवस पाऊस येऊनही खरसुंडीत ११७ मि.मी., तर तालुक्यात १७१ मि.मी., २००३ मध्ये खरसुंडीत १११ मि.मी., तर तालुक्यात १२३ मि.मी. आणि २०१८ मध्ये आटपाडीत १२५ मि.मी. पाऊस झाला.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीFarmerशेतकरी