शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान चालीसा आणि भोंग्यावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:25 IST

त्यांचा या मागील हेतू काय? हे सुज्ञ जनतेने ओळखले असून त्यांचा हा डाव राज्यातील जनताच उधळून लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

इस्लामपूर : हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा उद्योग काही मंडळी करीत आहेत असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नामोल्लेख टाळून मनसे आणि भाजपला लगावला. मात्र त्यांचा या मागील हेतू काय? हे सुज्ञ जनतेने ओळखले असून त्यांचा हा डाव राज्यातील जनताच उधळून लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.येथील ख्वाजा गरीब नवाज सोशल ट्रस्टच्यावतीने मोमीन मोहल्ला येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस ऍड. चिमण डांगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, ओबीसी सेलचे राष्ट्रीय सहसचिव अबीद मोमीन, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी,  माजी नगरसेवक पिरअली पुणेकर आदी. उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, आपण वर्तमान पत्र व टी.व्ही.चॅनेलवरून राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण वाचत असाल, पहात असाल. काही मंडळी हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करीत आहेत. या मंडळींचा हेतू शुद्ध नाही. त्यांना यातून समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची आहे हे स्पष्ट आहे. मात्र राज्यातील सुज्ञ जनता या मंडळींचा हा डाव हाणून पडतील. ज्यांची केंद्रात सत्ता आहे, आणि जे राज्यात सत्ता घेण्यासाठी अस्वस्थ आहेत, ती मंडळी राज्यास बदनाम करून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. यावेळी त्यांनी येणाऱ्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाMNSमनसे