शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणीने सांगलीकर शोकाकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:13 IST

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीकर शोकाकुल झाले. अटलजींनी सांगलीला चार ते पाच वेळा भेट दिली होती. जनसंघाचे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेता आदी महत्त्वाच्या पदांवर काम करताना ते सांगलीत आले. कधी मित्राचा सन्मान करण्यासाठी, तर कधी जनसंघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने! त्यांच्या तेव्हाच्या भाषणांची ...

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीकर शोकाकुल झाले. अटलजींनी सांगलीला चार ते पाच वेळा भेट दिली होती. जनसंघाचे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेता आदी महत्त्वाच्या पदांवर काम करताना ते सांगलीत आले. कधी मित्राचा सन्मान करण्यासाठी, तर कधी जनसंघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने! त्यांच्या तेव्हाच्या भाषणांची आठवण आजही सांगलीकरांच्या स्मृतीत आहेत.१९६७ चे वर्ष... अटलजी पहिल्यांदा सांगलीत आले. तेव्हा ते जनसंघाचे नेते होते. जनसंघाच्या सांगली शाखेच्यावतीने ५१ हजार रुपयांची देणगी देण्याचा कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमासाठी ते सांगलीत आले. राजवाडा चौकातील जनसंघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.१९७८ मध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री होते. सांगलीच्या नगरवाचनालयाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आजीव सदस्यत्व दिले होते. त्या कार्यक्रमासाठी अटलजी सांगलीत आले. नगरवाचनालयातील कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. जनसंघातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर १९८५-८६ मध्ये ते मिरजेत एका सभेसाठी आल्याची आठवण प्रकाश बिरजे यांनी सांगितली.१९९५ मध्ये विरोधी पक्षनेता असताना ते सांगलीत आले. निमित्त होते... ५२ वर्षे मैत्रीचे बंध जुळलेल्या कृषी तज्ज्ञ प्र. शं. ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाचे. ठाकूर व अटलजी १९४२-४३ मध्ये ग्वाल्हेरला भेटले. तेथून त्यांची मैत्री सुरू झाली. ठाकूर नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले, सांगलीत स्थायिक झाले. पण त्यांच्या मैत्रीचा बंध अतूटच राहिला. यावेळी अटलजींच्याहस्ते ‘भूमिपुत्राचा सांगाती’ या ठाकूर यांच्यावरील गौरव अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘सांगलीत कित्येक वर्षे कृष्णामाई वाहते आहे. कृष्णामाई तीच आहे. आता तीही बदलते आहे. सरकार हे येईल, ते येईल, पक्ष हा असेल, तो असेल, पण भारतमातेची सेवा, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे’, असा त्यांच्या भाषणाचा गोषवारा होता.त्यानंतर त्यांनी शांतिनिकेतनला आवर्जून भेट दिली. शांतिनिकेतनच्या परिसरामध्ये हुतात्म्यांच्या स्मृती तेवत ठेवणाऱ्या स्मृती स्तंभाला त्यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.शांतिनिकेतनची गुरु-शिष्य परंपरा त्यांनी समजून घेतलीच, पण त्यासोबत शिक्षण व्यवस्थेत काही अमूलाग्र बदल करता येतील का, याबाबतही चर्चा केली. ग्रामीण विकास, स्वयंपूर्ण खेडी, पंचायत राज, सत्तेचे विकेंद्रीकरण या महत्त्वपूर्ण विषयांवर दोघांनी अनेक महत्त्वाच्या पर्यायांवर चर्चा केली होती.