शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणीने सांगलीकर शोकाकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:13 IST

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीकर शोकाकुल झाले. अटलजींनी सांगलीला चार ते पाच वेळा भेट दिली होती. जनसंघाचे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेता आदी महत्त्वाच्या पदांवर काम करताना ते सांगलीत आले. कधी मित्राचा सन्मान करण्यासाठी, तर कधी जनसंघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने! त्यांच्या तेव्हाच्या भाषणांची ...

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीकर शोकाकुल झाले. अटलजींनी सांगलीला चार ते पाच वेळा भेट दिली होती. जनसंघाचे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेता आदी महत्त्वाच्या पदांवर काम करताना ते सांगलीत आले. कधी मित्राचा सन्मान करण्यासाठी, तर कधी जनसंघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने! त्यांच्या तेव्हाच्या भाषणांची आठवण आजही सांगलीकरांच्या स्मृतीत आहेत.१९६७ चे वर्ष... अटलजी पहिल्यांदा सांगलीत आले. तेव्हा ते जनसंघाचे नेते होते. जनसंघाच्या सांगली शाखेच्यावतीने ५१ हजार रुपयांची देणगी देण्याचा कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमासाठी ते सांगलीत आले. राजवाडा चौकातील जनसंघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.१९७८ मध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री होते. सांगलीच्या नगरवाचनालयाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आजीव सदस्यत्व दिले होते. त्या कार्यक्रमासाठी अटलजी सांगलीत आले. नगरवाचनालयातील कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. जनसंघातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर १९८५-८६ मध्ये ते मिरजेत एका सभेसाठी आल्याची आठवण प्रकाश बिरजे यांनी सांगितली.१९९५ मध्ये विरोधी पक्षनेता असताना ते सांगलीत आले. निमित्त होते... ५२ वर्षे मैत्रीचे बंध जुळलेल्या कृषी तज्ज्ञ प्र. शं. ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाचे. ठाकूर व अटलजी १९४२-४३ मध्ये ग्वाल्हेरला भेटले. तेथून त्यांची मैत्री सुरू झाली. ठाकूर नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले, सांगलीत स्थायिक झाले. पण त्यांच्या मैत्रीचा बंध अतूटच राहिला. यावेळी अटलजींच्याहस्ते ‘भूमिपुत्राचा सांगाती’ या ठाकूर यांच्यावरील गौरव अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘सांगलीत कित्येक वर्षे कृष्णामाई वाहते आहे. कृष्णामाई तीच आहे. आता तीही बदलते आहे. सरकार हे येईल, ते येईल, पक्ष हा असेल, तो असेल, पण भारतमातेची सेवा, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे’, असा त्यांच्या भाषणाचा गोषवारा होता.त्यानंतर त्यांनी शांतिनिकेतनला आवर्जून भेट दिली. शांतिनिकेतनच्या परिसरामध्ये हुतात्म्यांच्या स्मृती तेवत ठेवणाऱ्या स्मृती स्तंभाला त्यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.शांतिनिकेतनची गुरु-शिष्य परंपरा त्यांनी समजून घेतलीच, पण त्यासोबत शिक्षण व्यवस्थेत काही अमूलाग्र बदल करता येतील का, याबाबतही चर्चा केली. ग्रामीण विकास, स्वयंपूर्ण खेडी, पंचायत राज, सत्तेचे विकेंद्रीकरण या महत्त्वपूर्ण विषयांवर दोघांनी अनेक महत्त्वाच्या पर्यायांवर चर्चा केली होती.