शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणीने सांगलीकर शोकाकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:13 IST

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीकर शोकाकुल झाले. अटलजींनी सांगलीला चार ते पाच वेळा भेट दिली होती. जनसंघाचे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेता आदी महत्त्वाच्या पदांवर काम करताना ते सांगलीत आले. कधी मित्राचा सन्मान करण्यासाठी, तर कधी जनसंघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने! त्यांच्या तेव्हाच्या भाषणांची ...

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीकर शोकाकुल झाले. अटलजींनी सांगलीला चार ते पाच वेळा भेट दिली होती. जनसंघाचे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेता आदी महत्त्वाच्या पदांवर काम करताना ते सांगलीत आले. कधी मित्राचा सन्मान करण्यासाठी, तर कधी जनसंघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने! त्यांच्या तेव्हाच्या भाषणांची आठवण आजही सांगलीकरांच्या स्मृतीत आहेत.१९६७ चे वर्ष... अटलजी पहिल्यांदा सांगलीत आले. तेव्हा ते जनसंघाचे नेते होते. जनसंघाच्या सांगली शाखेच्यावतीने ५१ हजार रुपयांची देणगी देण्याचा कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमासाठी ते सांगलीत आले. राजवाडा चौकातील जनसंघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.१९७८ मध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री होते. सांगलीच्या नगरवाचनालयाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आजीव सदस्यत्व दिले होते. त्या कार्यक्रमासाठी अटलजी सांगलीत आले. नगरवाचनालयातील कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. जनसंघातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर १९८५-८६ मध्ये ते मिरजेत एका सभेसाठी आल्याची आठवण प्रकाश बिरजे यांनी सांगितली.१९९५ मध्ये विरोधी पक्षनेता असताना ते सांगलीत आले. निमित्त होते... ५२ वर्षे मैत्रीचे बंध जुळलेल्या कृषी तज्ज्ञ प्र. शं. ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाचे. ठाकूर व अटलजी १९४२-४३ मध्ये ग्वाल्हेरला भेटले. तेथून त्यांची मैत्री सुरू झाली. ठाकूर नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले, सांगलीत स्थायिक झाले. पण त्यांच्या मैत्रीचा बंध अतूटच राहिला. यावेळी अटलजींच्याहस्ते ‘भूमिपुत्राचा सांगाती’ या ठाकूर यांच्यावरील गौरव अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘सांगलीत कित्येक वर्षे कृष्णामाई वाहते आहे. कृष्णामाई तीच आहे. आता तीही बदलते आहे. सरकार हे येईल, ते येईल, पक्ष हा असेल, तो असेल, पण भारतमातेची सेवा, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे’, असा त्यांच्या भाषणाचा गोषवारा होता.त्यानंतर त्यांनी शांतिनिकेतनला आवर्जून भेट दिली. शांतिनिकेतनच्या परिसरामध्ये हुतात्म्यांच्या स्मृती तेवत ठेवणाऱ्या स्मृती स्तंभाला त्यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.शांतिनिकेतनची गुरु-शिष्य परंपरा त्यांनी समजून घेतलीच, पण त्यासोबत शिक्षण व्यवस्थेत काही अमूलाग्र बदल करता येतील का, याबाबतही चर्चा केली. ग्रामीण विकास, स्वयंपूर्ण खेडी, पंचायत राज, सत्तेचे विकेंद्रीकरण या महत्त्वपूर्ण विषयांवर दोघांनी अनेक महत्त्वाच्या पर्यायांवर चर्चा केली होती.