शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
4
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
5
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
6
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
7
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
8
Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
9
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
10
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
11
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
12
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
13
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
14
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
16
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
17
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
18
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
19
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
20
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल ४१ जणांचा अपघातांमध्ये मृत्यू, ८० हून अधिक जखमी 

By घनशाम नवाथे | Updated: December 6, 2024 17:15 IST

विविध मार्गांवर अपघाताची मालिका

घनश्याम नवाथेसांगली : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर ऑक्टोबर महिन्यात अपघातांची मालिकाच पहायला मिळाली. नोव्हेंबर महिन्यात तब्बल ४१ जणांचा अपघातीमृत्यू झाल्याची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात झाली. तर ८० हून अधिक जखमी झाले.जिल्ह्यात गेली अनेक वर्षे अपघात होणारी ठिकाणे म्हणजेच ‘ब्लॅक स्पॉट’ कायम होती. वर्षानुवर्षे अरुंद मार्ग, धोकादायक वळण, चढ-उतार असा मजकूर लिहिलेले फलक आढळत होते. परंतु ‘ब्लॅक स्पॉट’ हटवण्याबाबत उपाययोजना गेल्या काही वर्षात करण्यात आल्या. त्यामुळे जवळपास ६० ते ६५ अपघाताची ठिकाणी हटवण्यात आली. त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या. आता फक्त बोटांवर मोजण्याइतपतच अपघाताची ठिकाणी शिल्लक आहेत. ती देखील हटवली जाणार आहेत.

पूर्वी धोकादायक रस्ता, वळण, चढ-उतार, अरुंद पूल आदी कारणांमुळे अपघात होत होते. परंतु ही अपघाताची ठिकाणे नामशेष केल्यानंतरही अपघातांची मालिका सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गावर देखील अपघात होऊ लागले आहेत. अलिकडच्या काळात वाहनधारकांच्या बेदरकारपणामुळे अपघात वाढत आहेत. दारूच्या नशेत वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, वेगावर नियंत्रण नसणे, झोप आली असताना वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे यामुळे अपघात होत आहेत.अपघाताच्या प्रमुख कारणांचा अभ्यास केल्यानंतर अलिकडच्या काळात बहुतांश अपघात वाहन चालकाच्या बेदरकारपणामुळे होतात, असे दिसून येते. खराब रस्ता, खड्डे, गतिरोधक आदी कारणांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी आहे. वाढते अपघात ही एक शोकांतिकाच म्हणावी लागत आहे. एखाद्या युद्धातही बळी जात नाहीत इतके लोक अपघातात ठार होतात.

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा महामार्ग आदी ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात झाल्याचे चित्र दिसून आले. नोव्हेंबर महिन्यात तब्बल ४१ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर ८० हून अधिक जणांना अपंगत्व आले. हे वाढते अपघाताचे प्रमाण चिंताजनक म्हणावे लागते.

कुटुंबावर आघातदररोज घडणाऱ्या अपघातामध्ये कोणाच्या घरातील कर्ता पुरुष, कोणाचा वारसदार, कोणाची पत्नी, आई, वडील, मुलगी, मुलगा गमावण्याची वेळ येते. अपघातानंतर भलेही पोलिसात गुन्हा दाखल होऊन पुढे न्यायालयात भरपाई मिळत असेल. परंतु, अपघातात प्रिय व्यक्ती गमावल्यानंतर कुटुंबाचे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे असते.

अपंगत्व आल्यास फरपटअपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्तीला त्याच्या जवळच्या नातेवाइकांना आयुष्यभर साथ द्यावी लागते. अपंगत्वामुळे दैनंदिन जीवन जगताना संबंधित व्यक्तीची फरपट होत राहते.

नियमांचे पालन हवेवाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास संभाव्य अपघात निश्चित टाळू शकता येतात. रस्त्यावरील दोषामुळे होणारे अपघात कमी होत असताना, मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू