शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल ४१ जणांचा अपघातांमध्ये मृत्यू, ८० हून अधिक जखमी 

By घनशाम नवाथे | Updated: December 6, 2024 17:15 IST

विविध मार्गांवर अपघाताची मालिका

घनश्याम नवाथेसांगली : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर ऑक्टोबर महिन्यात अपघातांची मालिकाच पहायला मिळाली. नोव्हेंबर महिन्यात तब्बल ४१ जणांचा अपघातीमृत्यू झाल्याची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात झाली. तर ८० हून अधिक जखमी झाले.जिल्ह्यात गेली अनेक वर्षे अपघात होणारी ठिकाणे म्हणजेच ‘ब्लॅक स्पॉट’ कायम होती. वर्षानुवर्षे अरुंद मार्ग, धोकादायक वळण, चढ-उतार असा मजकूर लिहिलेले फलक आढळत होते. परंतु ‘ब्लॅक स्पॉट’ हटवण्याबाबत उपाययोजना गेल्या काही वर्षात करण्यात आल्या. त्यामुळे जवळपास ६० ते ६५ अपघाताची ठिकाणी हटवण्यात आली. त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या. आता फक्त बोटांवर मोजण्याइतपतच अपघाताची ठिकाणी शिल्लक आहेत. ती देखील हटवली जाणार आहेत.

पूर्वी धोकादायक रस्ता, वळण, चढ-उतार, अरुंद पूल आदी कारणांमुळे अपघात होत होते. परंतु ही अपघाताची ठिकाणे नामशेष केल्यानंतरही अपघातांची मालिका सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गावर देखील अपघात होऊ लागले आहेत. अलिकडच्या काळात वाहनधारकांच्या बेदरकारपणामुळे अपघात वाढत आहेत. दारूच्या नशेत वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, वेगावर नियंत्रण नसणे, झोप आली असताना वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे यामुळे अपघात होत आहेत.अपघाताच्या प्रमुख कारणांचा अभ्यास केल्यानंतर अलिकडच्या काळात बहुतांश अपघात वाहन चालकाच्या बेदरकारपणामुळे होतात, असे दिसून येते. खराब रस्ता, खड्डे, गतिरोधक आदी कारणांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी आहे. वाढते अपघात ही एक शोकांतिकाच म्हणावी लागत आहे. एखाद्या युद्धातही बळी जात नाहीत इतके लोक अपघातात ठार होतात.

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा महामार्ग आदी ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात झाल्याचे चित्र दिसून आले. नोव्हेंबर महिन्यात तब्बल ४१ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर ८० हून अधिक जणांना अपंगत्व आले. हे वाढते अपघाताचे प्रमाण चिंताजनक म्हणावे लागते.

कुटुंबावर आघातदररोज घडणाऱ्या अपघातामध्ये कोणाच्या घरातील कर्ता पुरुष, कोणाचा वारसदार, कोणाची पत्नी, आई, वडील, मुलगी, मुलगा गमावण्याची वेळ येते. अपघातानंतर भलेही पोलिसात गुन्हा दाखल होऊन पुढे न्यायालयात भरपाई मिळत असेल. परंतु, अपघातात प्रिय व्यक्ती गमावल्यानंतर कुटुंबाचे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे असते.

अपंगत्व आल्यास फरपटअपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्तीला त्याच्या जवळच्या नातेवाइकांना आयुष्यभर साथ द्यावी लागते. अपंगत्वामुळे दैनंदिन जीवन जगताना संबंधित व्यक्तीची फरपट होत राहते.

नियमांचे पालन हवेवाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास संभाव्य अपघात निश्चित टाळू शकता येतात. रस्त्यावरील दोषामुळे होणारे अपघात कमी होत असताना, मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू