शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Highway: अंकलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, खासदार विशाल पाटलांनी दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:22 IST

शासनाविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुटुंबीयासह नागपूर-रत्नागिरी महामार्ग मंगळवारी सकाळी अंकली (ता. मिरज) येथे रोखला. तासभर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. शासनाविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.खासदार विशाल पाटील, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी, महिला, मुलांसह आंदोलनात उतरले होते. भर पावसात महिलांसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला होता. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही आहे हे रास्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला. रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे एक रुग्णवाहिका आल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला."शेती आमच्या हक्काची नाही, नाही कुणाच्या बापाची", "या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय" अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली फाटा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, लता कांबळे, बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी आदी उपस्थित होते.

महेश खराडेसह आठ जणांना अटकआंदोलनामधील प्रमुख महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले, शांतीनाथ लिंबेकाई आदी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या आंदोलकांना पोलिसांनी सोडून दिले.

टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट : विशाल पाटीलआम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र, या महामार्गांवर अनेक ठिकाणी मोठे पूल होत आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. किती भराव टाकला जाणार असून, महापूर काळात किती पाणी येईल, त्याचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे. या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. तो रद्दच झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द करण्यासाठी प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला.

आमदार, खासदारांना जगवण्यासाठीच 'शक्तिपीठ' : महेश खराडेस्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे म्हणाले, कृषी दिनादिवशीच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. वर्धा ते गोवा येथील शेतकऱ्यांची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही. या महामार्गासाठी शासन २० हजार कोटीचे कर्ज काढणार आहे. त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही तो डावलून पोलिसी बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरू आहे. हा अट्टाहास कशासाठी सुरू आहे. ठेकेदार, आमदार, खासदार जगविण्यासाठी सुरू आहे हे स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला.