शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

...अन् नंदिनी शाळेत दाखल झाली शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणण्यात कागल राज्यात अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:57 PM

आर.टी.ई.कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटांतील एकही मूल शाळाबाह्य राहू नये , शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.

रमेश वारके ।बोरवडे : आर.टी.ई.कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटांतील एकही मूल शाळाबाह्य राहू नये , शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत कागल तालुक्यात एका मुलीला शालेय प्रवाहात आणण्यात आले.

नांदेड येथील ज्ञानेश्वर देवकांबळे आपल्या कुटुंबासह सात वर्षांपूर्वी कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आले. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. आपल्या शेजारील मुले शाळेत जात आहेत हे पाहून मोठी मुलगी नंदिनीला शाळेत जावी असे वाटले पण दाखला नाही की कागदपत्रे नाहीत. त्यांनी आपले दु:ख ग्रामपंचायत शिपाई विलास कांबळे यांना बोलून दाखविले. मुख्याध्यापक बाबासाहेब कांबळे यांची त्यांनी भेट घेतली.बालरक्षक सदानंद पाटील , मारुती जाधव , वनिता साबणे यांच्या सहकार्याने शिक्षकांनी पालकांना दिलासा दिला. तिचे प्रतिज्ञाप्रज्ञ लिहून घेऊन रितसर दाखला कार्यवाहीसाठी प्रयत्न करू असे सांगितले आणि नंदिनीला शाळेत हजर केले. नंदिनीचा व तिच्या वडिलांचा हसरा चेहरा पाहून सर्वांचे डोळे आनंदाने भरुन आले.२९० मुले शालेय प्रवाहातप्रत्येक तालुक्यातील काही शिक्षकांना राज्यस्तरीय प्रशिक्षण देऊन त्यांना बालरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सदानंद पाटील, मारुती जाधव, वनिता साबणे यांची तालुक्यात बालरक्षक म्हणून टीम कार्यरत आहे. गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर, मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच चौंडाळ शाळेचे शिक्षक एस. के. पाटील, सुजाता माळवदे यांच्या सहकार्याने बालरक्षक टीमने २९० शाळाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात आणले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा