शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी.., जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले

By अविनाश कोळी | Updated: September 14, 2024 17:21 IST

'''ती' चूक आता भाजपवाले करणार नाहीत''

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी त्यांच्या डोईवर ‘ती’ टांगती तलवार अजून कायम आहे. त्यामुळे त्यांना महायुतीतून लढण्याशिवाय पर्याय नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.सांगलीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अजित पवार आता कोणतीही वेगळी भूमिका घेऊ शकत नाहीत. जी टांगती तलवार त्यांच्या डोईवर लटकत असल्यामुळे त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला ती तलवार अजून हटलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कोणताही वेगळा निर्णय घेऊ शकत नाहीत. विधानसभेच्या तोंडावर पुन्हा सीबीआय, ईडीच्या धाकाने नव्या राजकीय खेळ्या करण्याची चूक आता भाजपवाले करणार नाहीत. अशा यंत्रणांचा कशासाठी वापर होतोय, हे लोकांना कळाले आहे. त्यामुळे अगोदरच लोकांच्या मनातून उतरल्यानंतर आता अशा कारवाईच्या माध्यमातून ते आणखी खाली उतरतील, असे मला वाटत नाही.लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीसाठीच काढली आहे. ‘अति तिथे माती’ या म्हणीप्रमाणे सरकारची अवस्था होईल. पैसे वाटपाच्या योजनेतून राज्याला आणखी आर्थिक संकटात टाकले जात आहे. विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावली आहे. भविष्यात एक रुपयासुद्धा विकासकामांना मिळणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा किंवा धोरण ठरलेले नाही. योग्यवेळी धोरण ठरेल.

न्यायव्यवस्थेबद्दल साशंकताजयंत पाटील म्हणाले, देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आरतीला येतात, यातून न्यायव्यवस्थेबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. न्यायव्यवस्थेचे कोणतेही संकेत पाळले जात नसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय इतके महिने तुरुंगात टाकले जात असेल तर न्यायाची अपेक्षा कशी करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सीसीटीव्ही गायब होणे गंभीर‘हीट ॲण्ड रन’ प्रकरणात बावनकुळे यांच्या मुलाचा समावेश आहे की नाही, याची मला माहिती नाही. मात्र, या प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज गायब होणे, ही बाब गंभीर आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारBJPभाजपा