शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar : नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याची दखल, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 18:09 IST

Ajit Pawar : "सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.

सांगली - राज्यातील पूर परिस्थितीमुळे अनेक भागांत मोठं नुकसान झालं आहे. चिपळूण दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी मोठा संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर तक्रारींचा पाढ वाचला. त्यानंतर नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून फैलावर घेतलं. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी नाव न घेता केंद्रीयमंत्र्यांच्या दौऱ्यात असे संबोधत नारायण राणेंना वक्तव्याची दखल घेतल्याचं दिसून आलं. 

"सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा," असं म्हणत नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. "मला कोणीही सीईओ भेटले नाहीत. मी इथेच बाजारपेठेत उभा आहे. कोण सीईओ आहेत आणि कुठे आहेत हे मला दाखवा," असंही राणे म्हणाले. राणेंच्या या संतापाची दखल घेत, आता नोडल ऑफिसर नेमण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. 

अजित पवार यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या पूरग्रस्त भागात पाहणी दौरे सुरू आहेत, यापुढेही ते सुरूच राहतील. केंद्रीयमंत्री आले होते, विरोध पक्षाचे नेते आले होते. विरोधी पक्ष त्यांच्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करेलच. तर, सरकारच्याबाजूचे लोकं मदतीसाठी प्रयत्न करतील. पण, यापुढे जिल्हाधिकारी यांना वेळ मिळावा म्हणून नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहेत. या पाहणी दौऱ्यातील मंत्र्यांसोबत, नेत्यांसोबत नोडल ऑफिसर फिरेल. बाकीचे सर्व सनदी अधिकारी आपल्या कार्यालयातून कामकाज पाहतील, असे अजित पवार यांनी सांगितले. महापालिका आयुक्त, सीईओ, एसपी हे सर्व अधिकारी आपलं काम पाहतील, असेही पवार म्हणाले. 

नायतर प्रत्येकजण इथं येऊन, तू कशाला इकडे गेला, तू कशाला तिकडे गेला... अरे कशाला गेला.. कशाला गेला... म्हणजे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याचा तो प्रोटोकॉल आहे, त्यानुसार त्यांना तेथे जावंच लागतं. उद्यापासून अजून दौरे वाढतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही या निर्णयाला सहमती दर्शवल्याचे अजित पवारांनी सांगितलं. 

भाजप नेत्यांकडून पाहणीकेंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूण येथे जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "मुख्यमंत्री आले त्यांनी पाहणीही केली. ते त्यांच्या पद्धतीने आढावा घेतीलच. मात्र, आपणही पंतप्रधानांना रिपोर्ट देणार आहोत. येथील नागरिकांना कशा प्रकारे दिलासा देता येईल आणि पुन्हा आपल्या पायावर उभे करता येईल यावर विचार करू. हे सर्व लोक आमचे आहेत यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ," असं राणे पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले होते. 

मुख्यमंत्र्यांवर टीका"राज्यावर सातत्याने येणाऱ्या संकटांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगूणच कारणीभूत आहे,. ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात वादळं काय, पाऊस काय, कारोना काय, सर्व सुरूच आहे. एवढेच नाही, तर कोरोना ही त्यांची देन आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का?," अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarayan Raneनारायण राणे chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाSangliसांगलीfloodपूर