शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

सांगलीतील साखराळेचा सुपुत्र बनला नीती आयोगाचा कृषी सल्लागार, पंतप्रधान मोदींसमवेत काम करण्याचा मिळाला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:46 IST

नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था

युनूस शेखइस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील कृषी धोरण शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. शशांक कुलकर्णी यांची भारत सरकारच्या कृषी व संलग्न विषयाचे सल्लागार म्हणून निवड झाली आहे. नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.डॉ. कुलकर्णी हे कृषी धोरण अभ्यासक आहेत. सध्या ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून काम पाहतात. नवी दिल्ली येथील भारतीय ॲग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटरच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे वरिष्ठ संशोधक सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील रिपब्लिक ऑफ पनामा या देशातील प्रख्यात स्वाहिली विद्यापीठाने त्यांचा डी.लिट. पदवी देऊन गौरव केला आहे. त्यांनी लिहिलेल्या स्वामीनाथन कमिशन : ए फाउंडेशन ऑफ फार्म्स पॉलिसिज इन इंडिया या त्यांच्या पुस्तकाला भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रो. एम.एस. स्वामीनाथन यांची प्रस्तावना लाभली आहे.स्वामीनाथन आयोगावर लिहिलेले जगातील पहिले व एकमेव पुस्तक म्हणून नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. कुलकर्णी यांच्या समन्वयातून समग्रतेकडे या पुस्तिकेची निवड शासकीय निवडक ग्रंथ सूचित केली आहे. त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी १९ आंतरराष्ट्रीय व १२ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सर्वोच्च धोरण संस्थेचा भाग बनल्याने कौतूककाही काळ त्यांनी जम्मू-काश्मीर विद्यापीठात वरिष्ठ संशोधक म्हणूनही काम केले आहे. शेती व शेतकरी धोरणांच्या संशोधन क्षेत्रात कुलकर्णी यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्यामुळे फॉक्सक्लूज या संस्थेने बनवलेल्या भारतातील सर्वोच्च १०० प्राध्यापक, संशोधक व शिक्षकांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे. देशातील सर्वोच्च धोरण संस्थेत झालेल्या या नियुक्तीमुळे डॉ. शशांक कुलकर्णी यांचे अभिनंदन होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीNIti Ayogनिती आयोगAgriculture Sectorशेती क्षेत्र