शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

'शक्तिपीठ'ने लोकसभेला नेत्यांची जिरवली शक्ती; महामार्ग रद्दच्या हालचाली?

By संतोष भिसे | Updated: June 18, 2024 12:07 IST

आजी-माजी मुख्यमंत्रीही महामार्गाविरोधात

संतोष भिसेसांगली : राज्यभरातील बारा जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर नांगर फिरविणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात आता शासकीय पातळीवरही विरोधात भूमिका व्यक्त होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: शक्तिपीठ शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचे वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही महामार्गाविरोधात भूमिका घेतल्याने तो रद्द होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत शक्तिपीठ महामार्गामुळे महायुतीला फटका बसल्याचे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनीही शक्तिपीठाविरोधात भूमिका व्यक्त करायला सुरुवात केली आहे. हा महामार्ग रद्दच करावा लागणार असल्याची बाब आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन बनविणारा हा महामार्ग रद्द होण्यासाठी प्रसंगी सर्वपक्षीय व्यापक जनआंदोलनाची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना शक्तिपीठ महामार्ग हे एक कारण असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी सांगितले. त्यामुळे महामार्गाविरोधात सरकारमध्येच वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांनीही मुंबईत झालेल्या शिंदेसेनेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महामार्गाविषयी शेतकऱ्यांचा संताप मांडला आहे.

शक्तिपीठचे काम थांबावे : अशोक चव्हाणदरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या नांदेडमधील शेतकऱ्यांनीही शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. जिल्ह्यातील बागायती शेती असलेल्या अर्धापूर आणि हदगाव तालुक्यांतील शेती महामार्गात जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशोक चव्हाण यांनीही शक्तिपीठ महामार्गाचे काम थांबले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. विनाकारण शेतकऱ्यांची जमीन संपादित करू नये. लोकांचा विरोध आहे. मीपण त्यांच्याशी सहमत आहे. शक्तिपीठाचे काम थांबावे यासाठी शासनाशी बोलणार असल्याचे चव्हाण यांनी नांदेडमध्ये सांगितले.

विधानसभेला रिस्क नकोलोकसभा निवडणुकीत पराभवासाठी शक्तिपीठ महामार्ग हेदेखील महत्त्वाचे कारण ठरल्याचे सत्ताधारी नेत्यांचे निरीक्षण आहे. दोन-तीन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुकांचे रणांगणही तापणार आहे. त्यामुळे शक्तिपीठाची रिस्क पुन्हा घेण्याचे नेत्यांची तयारी नाही. या स्थितीत महामार्गाविरोधी शेतकऱ्यांना एकजुटीने ताकद लावल्यास महामार्गाची अधिसूचना मागे घेतली जाण्याची आशा आहे.

मुख्यमंत्र्यांची सूचनामहायुतीच्या नेत्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे शक्तिपीठ महामार्गाविरोधात भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी सहमती दर्शविली. महामार्ग रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिल्याची माहिती नेत्यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग