शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

Murder लॉकडाऊनमधील शिथिलतेनंतर , एकवीस दिवसांत आठ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:00 PM

वर्दळ वाढली असून त्याचा परिणाम म्हणून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून गेल्या २१ दिवसात आठ खून झाले आहेत, तर अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात तीन खुनाच्या घटना घडल्या होत्या.

ठळक मुद्देअपघातांत १४ जणांचा मृत्यू । लॉकडाऊनमधील शिथिलतेनंतर गुन्ह्यांमध्ये वाढ

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे संपूर्ण जिल्ह्यात शांतता होती. अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांव्यतिरिक्त गर्दीही नसल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. मात्र, लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर वर्दळ वाढली असून त्याचा परिणाम म्हणून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून गेल्या २१ दिवसात आठ खून झाले आहेत, तर अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात तीन खुनाच्या घटना घडल्या होत्या.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांनुसार संचारबंदी आदेश लागू होता. त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण खूपच घटले होते. त्यात रस्त्यावर वर्दळ नसल्याने अपघातही कमी होते. याच कालावधित पोलीसही बंदोबस्तावर असल्याने गुन्ह्यांचे घटलेले प्रमाण पथ्यावर पडले होते. पण शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मात्र, गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: मारामारी, वादावादीसह अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. एप्रिल महिन्यात लॉकडाऊनची स्थिती असतानाही विविध प्रकारच्या २३४ घटना घडल्या आहेत.

मे महिन्यात आत्महत्येच्या घटनाही वाढत असून या पंधरवड्यात नऊ जणांनी जीवन संपविले आहे. यात सावकारीच्या जाचाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याशिवाय मारामारीसह दुखापतीच्या ७१ घटना घडल्या आहेत.

तुंग, वाळवा येथील घटना गंभीरएप्रिल महिन्यात खुनाच्या तीन घटना घडल्या होत्या, तर चार खुनाचे प्रयत्न, १६ ठिकाणी घरफोडी, २९ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. मे महिन्यात मात्र शिथिलता मिळाल्यानंतर जिल्ह्यात नागज, सांगलीवाडी, सूर्यगाव, वाळवा, कुमठे, कुपवाड, नागाव कवठे व तुंग येथे खुनाच्या घटना घडल्या आहेत. यात तुंग येथे एका सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला, तर वाळवा येथे सावत्र आई व वडिलाने मुलीचा खून केला होता. 

लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर नागरिक बाहेर पडत असल्याने काही घटना घडत आहेत. घटना वाढत असल्या तरी त्यावर जरब बसविण्यासाठी प्रशासन ठाम आहे. तुंगची घटना गंभीर असून, कोणत्याही गुन्ह्यातील गुन्हेगार असो, यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे.- मनीषा दुबुले, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली

 

 

एप्रिलमधीलगुन्ह्यांची आकडेवारी03खून04खुनाचे प्रयत्न09बलात्कार16घरफोड्या29चोरी81दुखापत

टॅग्स :SangliसांगलीMurderखूनCrime Newsगुन्हेगारी