शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मार्ग शक्तिपीठाचा, हानी पर्यावरणाची: रस्ते देखणे, पण निर्जीव आणि श्वास कोंडणारे

By संतोष भिसे | Updated: April 28, 2025 19:07 IST

झाडांची कत्तल, पण नव्याने वृक्षारोपण नाही

संतोष भिसेसांगली : गेली अनेक वर्षे पुणे-बंगळुरु या एकमेव महामार्गाचा अभिमान बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यात आता महामार्गांचे जाळे होऊ घातले आहे. महामार्ग देखणे आणि वेगवान होत आहेत, मात्र त्यासाठी बेफाम वृक्षतोड केली जात असल्याने त्यांचा प्राण हरवत आहे. झाडे तोडल्यानंतर त्याऐवजी नव्याने लागवड व संगोपन केले जात नसल्याचा अनुभव आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्याहून अधिक कमी झाला आहे. सांगलीतून सोलापूरला मोटारीने अवघ्या दोन-अडीच तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. हा संपूर्ण महामार्ग अत्यंत देखणा, सुरक्षित झाला आहे, पण दुतर्फा वृक्षराजी नसल्याने त्याचे आरोग्य हरवले आहे. हा प्रवास कंटाळवाणा आणि थकवणारा ठरतो. जुन्या मिरज-पंढरपूर मार्गावरील झाडे महामार्गासाठी तोडली गेली. त्याच्या बदल्यात नव्याने झाडे लावण्याची अट महामार्ग प्राधीकरणाने घातली. त्यानुसार ठेकेदाराने झाडे लावली देखील. पण सध्या त्यांचे अस्तित्व कोठेही दिसत नाही.रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी मिरज ते अंकलीदरम्यान मोठ्या प्रमाणात झाडे तोडली आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्यांचे पुनर्रोपण करुन त्यांना जीवदान दिले. मिरज-भोसे दरम्यानही शेतकऱ्यांनी झाडे वाचविण्याचा खटाटोप स्वखर्चाने केला पण या कामात महामार्ग प्राधिकरण किंवा ठेकेदारांची अनास्थाच आहे. या पार्श्वभूमीवर आता नव्याने शक्तिपीठ महामार्ग आणखी काही भागाचे वाळवंट करण्याच्या मार्गावर आहे.

सांगली-मिरज रस्त्यासाठी ८५ वटवृक्ष तोडलेसांगली ते मिरज रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८५ डेरेदार आणि जुनी वडाची झाडे तोडली गेली. त्याच्या बदल्यात नव्याने झाडे लावण्यात आली. पण त्यापैकी एकही झाड जगू शकले नाही. तोडलेल्या वटवृक्षांच्या पुनर्रोपणासाठी पर्यावरणप्रेमींनी आग्रह धरला. त्याची दखल घेत मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात २२ वटवृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले पण त्याला नियमित पाणीपुरवठा आणि देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. परिणामी २२ पैकी एकही झाड नव्याने फुटले नाही.

नदीकाठ उजाड बनण्याचा धोकासांगलीजवळ कर्नाळ, सांगलीवाडी परिसरातून शक्तिपीठ महामार्गाचा प्रवास होणार आहे. सध्या तेथे खूपच मोठ्या प्रमाणात गर्द वृक्षराजी आहे. असंख्य प्रजातींचे पक्षी बारमाही मुक्कामाला असतात. शक्तिपीठमुळे या रम्य निसर्गाला नख लागणार आहे. थंडगार हिरवाई संपून सिमेंटच्या रस्त्याचा रखरखाट वाट्याला येणार आहे. १२ महिने २४ तास वाहनांच्या वर्दळीमुळे नदीकाठची शांतता व चैतन्य हरवणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गenvironmentपर्यावरण