शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मार्ग शक्तिपीठाचा, हानी पर्यावरणाची: रस्ते देखणे, पण निर्जीव आणि श्वास कोंडणारे

By संतोष भिसे | Updated: April 28, 2025 19:07 IST

झाडांची कत्तल, पण नव्याने वृक्षारोपण नाही

संतोष भिसेसांगली : गेली अनेक वर्षे पुणे-बंगळुरु या एकमेव महामार्गाचा अभिमान बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यात आता महामार्गांचे जाळे होऊ घातले आहे. महामार्ग देखणे आणि वेगवान होत आहेत, मात्र त्यासाठी बेफाम वृक्षतोड केली जात असल्याने त्यांचा प्राण हरवत आहे. झाडे तोडल्यानंतर त्याऐवजी नव्याने लागवड व संगोपन केले जात नसल्याचा अनुभव आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्याहून अधिक कमी झाला आहे. सांगलीतून सोलापूरला मोटारीने अवघ्या दोन-अडीच तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. हा संपूर्ण महामार्ग अत्यंत देखणा, सुरक्षित झाला आहे, पण दुतर्फा वृक्षराजी नसल्याने त्याचे आरोग्य हरवले आहे. हा प्रवास कंटाळवाणा आणि थकवणारा ठरतो. जुन्या मिरज-पंढरपूर मार्गावरील झाडे महामार्गासाठी तोडली गेली. त्याच्या बदल्यात नव्याने झाडे लावण्याची अट महामार्ग प्राधीकरणाने घातली. त्यानुसार ठेकेदाराने झाडे लावली देखील. पण सध्या त्यांचे अस्तित्व कोठेही दिसत नाही.रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी मिरज ते अंकलीदरम्यान मोठ्या प्रमाणात झाडे तोडली आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्यांचे पुनर्रोपण करुन त्यांना जीवदान दिले. मिरज-भोसे दरम्यानही शेतकऱ्यांनी झाडे वाचविण्याचा खटाटोप स्वखर्चाने केला पण या कामात महामार्ग प्राधिकरण किंवा ठेकेदारांची अनास्थाच आहे. या पार्श्वभूमीवर आता नव्याने शक्तिपीठ महामार्ग आणखी काही भागाचे वाळवंट करण्याच्या मार्गावर आहे.

सांगली-मिरज रस्त्यासाठी ८५ वटवृक्ष तोडलेसांगली ते मिरज रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८५ डेरेदार आणि जुनी वडाची झाडे तोडली गेली. त्याच्या बदल्यात नव्याने झाडे लावण्यात आली. पण त्यापैकी एकही झाड जगू शकले नाही. तोडलेल्या वटवृक्षांच्या पुनर्रोपणासाठी पर्यावरणप्रेमींनी आग्रह धरला. त्याची दखल घेत मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात २२ वटवृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले पण त्याला नियमित पाणीपुरवठा आणि देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. परिणामी २२ पैकी एकही झाड नव्याने फुटले नाही.

नदीकाठ उजाड बनण्याचा धोकासांगलीजवळ कर्नाळ, सांगलीवाडी परिसरातून शक्तिपीठ महामार्गाचा प्रवास होणार आहे. सध्या तेथे खूपच मोठ्या प्रमाणात गर्द वृक्षराजी आहे. असंख्य प्रजातींचे पक्षी बारमाही मुक्कामाला असतात. शक्तिपीठमुळे या रम्य निसर्गाला नख लागणार आहे. थंडगार हिरवाई संपून सिमेंटच्या रस्त्याचा रखरखाट वाट्याला येणार आहे. १२ महिने २४ तास वाहनांच्या वर्दळीमुळे नदीकाठची शांतता व चैतन्य हरवणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गenvironmentपर्यावरण