शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील घरात ऐश्वर्य पाहिले, विश्वासघातही सोसला; बालपणीच्या वेदना मनात खोलवर रुजल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 08:08 IST

मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

अविनाश कोळी - सांगली : नाट्यसंवाद, नाट्यगीतांचा बहर, शास्त्रीय संगीताच्या मैफिलींच्या सुवर्णकाळातून बरसलेली सधनता अनुभवत दीदींचे सांगलीत बालपण बहरले. पण या वाटेवर वेदनांच्या काटेरी प्रवासाने घायाळ होण्याचा अनुभवही याच सांगलीत आला. हेच अनुभव त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले ते कायमचेच.एस.टी. स्टँडजवळ कोटणीस महाराजांच्या मठासमोर मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी प्रशस्त घर घेतले होते.  मंगेशकर कुटुंबीय वरच्या मजल्यावर आणि तळमजल्यावर त्यांचे गणूमामा म्हणजे मास्टर अविनाश ऊर्फ गणपतराव मोहिते राहायचे. इथे प्रतिष्ठित, विद्वान व गुणवंत मंडळींची कलाकारांची ऊठबस असे. याच घरात लतादीदींसह आशा, उषा, मीना, हृदयनाथ या भावंडांचे बालपण गेले. दीदींचा जन्म इंदूर येथे झाला असला तरी नंतर मंगेशकर कुटुंबीय सांगलीत आले व स्थिरावले. याच ठिकाणी लता मंगेशकरांवर संगीत व नाट्यसंस्कार झाले. याच ठिकाणी घरात त्यांनी अनेक नाटकांचे खेळ म्हणून सराव केले आणि परिणामी त्यांना नाटकात अभिनयाची संधीही मिळाली.

वैभवसंपन्न कुटुंबाची फरफट - मास्टर दीनानाथांची मुले म्हणून सांगलीत भावंडांना मानसन्मान मिळाला. १९३५ ते १९४० हा त्यांचा सांगलीतील काळ संमिश्र अनुभवांचा राहिला. ज्या सांगलीत त्यांनी आनंद, समृद्धी, मैत्री, नात्यांचा गोडवा, व्यावसायिक यश अनुभवले, त्याच सांगलीत त्यांना यातनादायी अनुभवही आले. मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

या कंपनीलाही अपयश आले आणि आर्थिक डोलारा कोसळला. राहत्या घरासह गाव सोडून पुण्याला स्थलांतरित होण्याची वेळ मंगेशकर कुटुंबीयांवर आली. सांगलीतील शेवटचे हलाखीचे दिवस लता मंगेशकर यांना सर्वांत वेदना देणारे होते. शेवटपर्यंत त्यांना या घटना सतावत राहिल्या. प्रचंड उलथापालथ अनुभवत, अगदी लहान वयातच लता मंगेशकरांना सांगलीचा निरोप घ्यावा लागला होता.

जवळच्यांकडून घात -नातलग, स्नेही अशा सर्वांनी मास्टर दीनानाथ यांचा विश्वासघात केला. पडत्या काळात त्यांची साथ सोडली. ‘कृष्णार्जुनयुद्ध’ या सिनेमाच्या व्यवहारामध्ये एक खोटी केस दीनानाथ यांच्यावर झाली. एका मित्राने मदतीच्या बहाण्याने घरातील सर्व दागिने काढून घेतले. नंतरच्या सुवर्णकाळातही लता मंगेशकर कधीही या घटना विसरू शकल्या नाहीत.

पन्हाळ्यावरील बंगलास्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातून सुटल्यानंतर त्यांना निवांत राहण्यासाठी भालजी पेंढारकर यांनी मूळ बंगला पन्हाळ्यावर बांधला. त्यावेळी त्यांनी तो पूर्ण चुन्यात बांधून घेतला होता. नंतर जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला आणि त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी स्टुडिओ, पन्हाळ्याचा बंगला लताबाईंना विकला. नंतर लताबाईंनी बंगला पूर्ण पाडण्याच्या सूचना केल्या व तिथे पुन्हा नवीन बंगला बांधला. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरSangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रcinemaसिनेमा