शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

सांगलीतील घरात ऐश्वर्य पाहिले, विश्वासघातही सोसला; बालपणीच्या वेदना मनात खोलवर रुजल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 08:08 IST

मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

अविनाश कोळी - सांगली : नाट्यसंवाद, नाट्यगीतांचा बहर, शास्त्रीय संगीताच्या मैफिलींच्या सुवर्णकाळातून बरसलेली सधनता अनुभवत दीदींचे सांगलीत बालपण बहरले. पण या वाटेवर वेदनांच्या काटेरी प्रवासाने घायाळ होण्याचा अनुभवही याच सांगलीत आला. हेच अनुभव त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले ते कायमचेच.एस.टी. स्टँडजवळ कोटणीस महाराजांच्या मठासमोर मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी प्रशस्त घर घेतले होते.  मंगेशकर कुटुंबीय वरच्या मजल्यावर आणि तळमजल्यावर त्यांचे गणूमामा म्हणजे मास्टर अविनाश ऊर्फ गणपतराव मोहिते राहायचे. इथे प्रतिष्ठित, विद्वान व गुणवंत मंडळींची कलाकारांची ऊठबस असे. याच घरात लतादीदींसह आशा, उषा, मीना, हृदयनाथ या भावंडांचे बालपण गेले. दीदींचा जन्म इंदूर येथे झाला असला तरी नंतर मंगेशकर कुटुंबीय सांगलीत आले व स्थिरावले. याच ठिकाणी लता मंगेशकरांवर संगीत व नाट्यसंस्कार झाले. याच ठिकाणी घरात त्यांनी अनेक नाटकांचे खेळ म्हणून सराव केले आणि परिणामी त्यांना नाटकात अभिनयाची संधीही मिळाली.

वैभवसंपन्न कुटुंबाची फरफट - मास्टर दीनानाथांची मुले म्हणून सांगलीत भावंडांना मानसन्मान मिळाला. १९३५ ते १९४० हा त्यांचा सांगलीतील काळ संमिश्र अनुभवांचा राहिला. ज्या सांगलीत त्यांनी आनंद, समृद्धी, मैत्री, नात्यांचा गोडवा, व्यावसायिक यश अनुभवले, त्याच सांगलीत त्यांना यातनादायी अनुभवही आले. मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

या कंपनीलाही अपयश आले आणि आर्थिक डोलारा कोसळला. राहत्या घरासह गाव सोडून पुण्याला स्थलांतरित होण्याची वेळ मंगेशकर कुटुंबीयांवर आली. सांगलीतील शेवटचे हलाखीचे दिवस लता मंगेशकर यांना सर्वांत वेदना देणारे होते. शेवटपर्यंत त्यांना या घटना सतावत राहिल्या. प्रचंड उलथापालथ अनुभवत, अगदी लहान वयातच लता मंगेशकरांना सांगलीचा निरोप घ्यावा लागला होता.

जवळच्यांकडून घात -नातलग, स्नेही अशा सर्वांनी मास्टर दीनानाथ यांचा विश्वासघात केला. पडत्या काळात त्यांची साथ सोडली. ‘कृष्णार्जुनयुद्ध’ या सिनेमाच्या व्यवहारामध्ये एक खोटी केस दीनानाथ यांच्यावर झाली. एका मित्राने मदतीच्या बहाण्याने घरातील सर्व दागिने काढून घेतले. नंतरच्या सुवर्णकाळातही लता मंगेशकर कधीही या घटना विसरू शकल्या नाहीत.

पन्हाळ्यावरील बंगलास्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातून सुटल्यानंतर त्यांना निवांत राहण्यासाठी भालजी पेंढारकर यांनी मूळ बंगला पन्हाळ्यावर बांधला. त्यावेळी त्यांनी तो पूर्ण चुन्यात बांधून घेतला होता. नंतर जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला आणि त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी स्टुडिओ, पन्हाळ्याचा बंगला लताबाईंना विकला. नंतर लताबाईंनी बंगला पूर्ण पाडण्याच्या सूचना केल्या व तिथे पुन्हा नवीन बंगला बांधला. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरSangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रcinemaसिनेमा