शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

घाटात बस चढत नसल्याने निम्मे प्रवासी उतरले अन् गाडीने घेतला पेट; कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील घटना

By श्रीनिवास नागे | Updated: June 1, 2023 13:47 IST

उर्वरित प्रवासीही लगेच उतरल्याने अनर्थ टळला

कोकरुड : घाटात बस चढत नसल्याने आरामबसमधील निम्मे प्रवासी खाली उतरले आणि शंभर मीटरवर जाऊन गाडीने पेट घेतला. उर्वरित प्रवासीही लगेच उतरल्याने अनर्थ टळला. यात प्रवाशांच्या लाखोंच्या रोकडसह आरामबसचे अंदाजे पन्नास लाखाचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील मांगिरी खिंडीत घडली.  रत्नागिरी येथे चायनीज पदार्थांचे गाडे, हॉटेलवरील कामगार, वेटर, स्वयंपाकी, बागायतीतील मजूर, गुरखा, कपडे विक्री, तबेला कामगार यासह विविध कामांसाठी आलेले ५९ नेपाळी महिला-पुरुष हातखंबा (जि. रत्नागिरी) येथून खासगी आरामबसने (एमपी ४१ एमएम २७२७) पुण्याच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास आरामबस शिराळा तालुक्यातील कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील मांगिरी खिंडीत आली असता ती पुढे चढत नसल्याने बसमधील निम्मे प्रवासी खाली उतरले. शंभर मीटर पुढे घाट चढून गेल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. बसमधील उर्वरित लोक आग लागल्याने खाली उतरून आरडाओरडा करू लागले. आग आटोक्यात आणण्यासाठी काहीच साधने नव्हती. त्यामुळे बसमधील प्रवाशांच्या रोख रकमेसह सर्व साहित्य, कपडे, आंबे जळून खाक झाले. कऱ्हाड नगरपालिकेस कळविल्यानंतर पहाटे सव्वापाच वाजता अग्निशमक दलाची गाडी आली, मात्र तत्पूर्वी बसमधील सर्व साहित्य आणि रोख रकमा जळून खाक झाल्या होत्या.  

मोठ्या रकमा जळून खाकरत्नागिरीहून सुटलेल्या आरामबसला आग लागल्याचे समजताच नेपाळी कामगारांचे रत्नागिरी येथील मालक घटनास्थळी हजर झाले. मात्र प्रसारमाध्यमांना बातमी देऊ नका. प्रत्येकाच्या मोठ्या रकमा जळून खाक झाल्याने भरपाई मिळणार नाही, असे सांगत होते. बसमधील लोकांना कोणासोबत बोलण्यास मनाई करत होते. 

भाऊच्या ढाब्याचा आधारघाट संपल्यानंतर सावंतवाडी (ता. शिराळा) येथील वसंत सावंत यांचा ‘भाऊचा ढाबा’ नावाचा ढाबा आहे. जळीत बसशेजारी थांबलेल्या सर्व प्रवाशांसाठी त्यांनी चहा-पाणी, नाष्ट्याची सोय करत आधार दिला.

टॅग्स :Sangliसांगलीfireआगhighwayमहामार्ग