शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
5
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
7
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
8
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
9
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
10
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
11
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
12
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
13
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
14
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ८८० कोटींची तरतूद, जलसंपदा विभागाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:34 IST

'शंभुराजे देसाई यांच्या भूमिकेबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार'

सांगली : साखर कारखाने, दूध संघ, मळीमिश्रित, केमिकल मिश्रित आणि साडपाण्यामुळे कृष्णा नदीलाप्रदूषणाचा विळखा पडला आहे. कृष्णा नदीच्याप्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून निधी मंजूर झाला आहे. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर प्रदूषणमुक्तीसाठी काम सुरू होईल. राज्यासाठी सुमारे ८८० कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिली.गेल्या दहा वर्षांत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचे प्रमाण खूपच वाढले आहे. साखर कारखाने, दूध संघ, तेल उद्योग, केमिकल फॅक्टरी यांनी आपल्या प्रदूषित पाण्याची विल्हेवाट लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते विषारी पाणी कृष्णा नदीत सोडण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीरच आहे. नदीला विषारी विळखा पडतो आणि कधीतरी त्याला भिडावेच लागणार आहे. मी त्यासाठी आग्रही भूमिका घेईल, असे खासदार संजय पाटील यांनी सांगितले.यावेळी कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर म्हणाल्या, केंद्र शासनाने महाराष्ट्रातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी जवळपास तीन हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कृष्णा नदीचे कऱ्हाड ते राजारापूर बंधाऱ्यापर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी ८८० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधीतून नदीतील गाळ काढण्यासह सांडपाणी व्यवस्थापनावर काम केले जाणार आहे.

शंभुराजे देसाई यांच्या भूमिकेबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार : संजय पाटीलकोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत अजूनही काहींची लोकांना नागविण्याची भूमिका घेतली जात आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्यांनी पाणी सोडण्यात अडचण असता कामा नये, असे स्पष्ट केले आहे. तरीही, काही घोळ सुरू आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आहे. आता अधिक टोकाला जाण्याची वेळ येऊ नये, असा इशारादेखील खासदार संजय पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांचे नाव न घेता दिला.

कृष्णा नदीचे प्रदूषण गंभीरखासदार संजय पाटील म्हणाले, कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीरच आहे. नदीला विषारी विळखा पडतो आणि कधीतरी त्याला भिडावेच लागणार आहे. मी त्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहे. या प्रश्नाबाबत ‘‘जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्याशी मी बोललो आहे. त्यांचा या विषयातील अभ्यास प्रचंड आहे. त्यांच्याशी चर्चा करून नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण