शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

ग्रामपंचायतींमध्ये ७५ कोटींवर अपहार रमेश सहस्रबुध्दे : पाच तालुक्यांमध्ये कपात करूनही कर्मचाºयांचा फंड भरलाच नाही; सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:35 IST

सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील फंडाची रक्कम ७५ कोटींहून जास्त आहे, असा आरोप आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्रबुध्दे आणि जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी ...

ठळक मुद्दे कर्मचाºयांच्या मागण्या... सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांची सेवा पुस्तके अद्ययावत भरुन द्या कामगारांना ओळखपत्रे द्या, कामगारांचे थकीत पगार त्वरित द्यावेतकिमान वेतन, राहणीमान भत्ता फरकासह मिळावाग्रामपंचायत कामगारांना वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्या९० टक्के वसुलीची जाचक अट नष्ट करानळपाणी पुरवठा कामगारांना कामाची वेळ ठरवून द्या, त्यांना नियमाप्रमाणे रजा, सुट्या द्या

सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील फंडाची रक्कम ७५ कोटींहून जास्त आहे, असा आरोप आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्रबुध्दे आणि जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कॉ. अ‍ॅड. आर. एन. जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या पगारातून ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतर ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयात भरण्याची गरज आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीनेही त्यांच्या हिश्श्याची ८.३३ टक्के रक्कम लगेच भविष्यनिर्वाह निधी विभागाच्या कार्यालयाकडे तात्काळ भरण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींकडे चौकशी केली असता, पाच तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कर्मचाºयांची कपात केलेली रक्कम शासनाकडे जमा केली आहे. परंतु, काही ग्रामपंचायतींनी स्वत:चा हिस्सा कर्मचाºयांच्या फंडाच्या खात्यात जमा केला नाही. हा घोटाळा वेगळाच आहे. याचा आम्ही शोध घेत आहोत.

शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी कर्मचाºयांच्या पगारातून कपात केली आहे. प्रत्यक्षात कर्मचाºयांनी चौकशी केली असता, ती भविष्य निर्वाह निधी विभागाच्या कार्यालयाकडे जमाच नाही. या रकमेवर संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि काही अधिकाºयांनीही डल्ला मारला आहे. अपहाराची रक्कम ७५ कोटींहून अधिक होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. फौजदारी संहिता कलम १९७ या कायद्यानुसार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांवर फौजदारी कारवाईची परवानगी द्यावी, अशीही मागणी केली आहे. अद्याप त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या प्रश्नासह जिल्हा परिषद वर्ग तीन, चारच्या कर्मचाºयांच्या भरतीत ग्रामपंचायत कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार ५० टक्के नेमणुका द्या, चतुर्थश्रेणी कर्मचाºयाप्रमाणे वेतन, भत्ते, रजा, सुट्या आदी सेवा लागू करण्यांसह विविध मागण्यांसाठी दि. २२ जानेवारीरोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा सहस्रबुध्दे व अ‍ॅड. जाधव यांनी दिला.

या मोर्चात कॉ. रमेश सहस्रबुध्दे, अध्यक्ष कॉ. दादासाहेब झुरे, अ‍ॅड्. आर. एन. जाधव, कॉ. नवनाथ मोहिते, कॉ. यल्लाप्पा कोळी, कॉ. अनिल पाटील, कॉ. बलराम सावंत, कॉ. विठ्ठल काळे, कॉ. संतोष मुळीक, कॉ. माणिक देसाई, कॉ. पांडुरंग पाटील, कॉ. गजानन शेरीकर, कॉ. सय्यद नदाफ, कॉ. सुनील जंगम आदी सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणzpजिल्हा परिषद