शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमध्ये ७५ कोटींवर अपहार रमेश सहस्रबुध्दे : पाच तालुक्यांमध्ये कपात करूनही कर्मचाºयांचा फंड भरलाच नाही; सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:35 IST

सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील फंडाची रक्कम ७५ कोटींहून जास्त आहे, असा आरोप आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्रबुध्दे आणि जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी ...

ठळक मुद्दे कर्मचाºयांच्या मागण्या... सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांची सेवा पुस्तके अद्ययावत भरुन द्या कामगारांना ओळखपत्रे द्या, कामगारांचे थकीत पगार त्वरित द्यावेतकिमान वेतन, राहणीमान भत्ता फरकासह मिळावाग्रामपंचायत कामगारांना वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्या९० टक्के वसुलीची जाचक अट नष्ट करानळपाणी पुरवठा कामगारांना कामाची वेळ ठरवून द्या, त्यांना नियमाप्रमाणे रजा, सुट्या द्या

सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील फंडाची रक्कम ७५ कोटींहून जास्त आहे, असा आरोप आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्रबुध्दे आणि जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कॉ. अ‍ॅड. आर. एन. जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या पगारातून ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतर ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयात भरण्याची गरज आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीनेही त्यांच्या हिश्श्याची ८.३३ टक्के रक्कम लगेच भविष्यनिर्वाह निधी विभागाच्या कार्यालयाकडे तात्काळ भरण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींकडे चौकशी केली असता, पाच तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कर्मचाºयांची कपात केलेली रक्कम शासनाकडे जमा केली आहे. परंतु, काही ग्रामपंचायतींनी स्वत:चा हिस्सा कर्मचाºयांच्या फंडाच्या खात्यात जमा केला नाही. हा घोटाळा वेगळाच आहे. याचा आम्ही शोध घेत आहोत.

शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी कर्मचाºयांच्या पगारातून कपात केली आहे. प्रत्यक्षात कर्मचाºयांनी चौकशी केली असता, ती भविष्य निर्वाह निधी विभागाच्या कार्यालयाकडे जमाच नाही. या रकमेवर संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि काही अधिकाºयांनीही डल्ला मारला आहे. अपहाराची रक्कम ७५ कोटींहून अधिक होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. फौजदारी संहिता कलम १९७ या कायद्यानुसार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांवर फौजदारी कारवाईची परवानगी द्यावी, अशीही मागणी केली आहे. अद्याप त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या प्रश्नासह जिल्हा परिषद वर्ग तीन, चारच्या कर्मचाºयांच्या भरतीत ग्रामपंचायत कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार ५० टक्के नेमणुका द्या, चतुर्थश्रेणी कर्मचाºयाप्रमाणे वेतन, भत्ते, रजा, सुट्या आदी सेवा लागू करण्यांसह विविध मागण्यांसाठी दि. २२ जानेवारीरोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा सहस्रबुध्दे व अ‍ॅड. जाधव यांनी दिला.

या मोर्चात कॉ. रमेश सहस्रबुध्दे, अध्यक्ष कॉ. दादासाहेब झुरे, अ‍ॅड्. आर. एन. जाधव, कॉ. नवनाथ मोहिते, कॉ. यल्लाप्पा कोळी, कॉ. अनिल पाटील, कॉ. बलराम सावंत, कॉ. विठ्ठल काळे, कॉ. संतोष मुळीक, कॉ. माणिक देसाई, कॉ. पांडुरंग पाटील, कॉ. गजानन शेरीकर, कॉ. सय्यद नदाफ, कॉ. सुनील जंगम आदी सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणzpजिल्हा परिषद