शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

ग्रामपंचायतींमध्ये ७५ कोटींवर अपहार रमेश सहस्रबुध्दे : पाच तालुक्यांमध्ये कपात करूनही कर्मचाºयांचा फंड भरलाच नाही; सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:35 IST

सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील फंडाची रक्कम ७५ कोटींहून जास्त आहे, असा आरोप आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्रबुध्दे आणि जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी ...

ठळक मुद्दे कर्मचाºयांच्या मागण्या... सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांची सेवा पुस्तके अद्ययावत भरुन द्या कामगारांना ओळखपत्रे द्या, कामगारांचे थकीत पगार त्वरित द्यावेतकिमान वेतन, राहणीमान भत्ता फरकासह मिळावाग्रामपंचायत कामगारांना वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्या९० टक्के वसुलीची जाचक अट नष्ट करानळपाणी पुरवठा कामगारांना कामाची वेळ ठरवून द्या, त्यांना नियमाप्रमाणे रजा, सुट्या द्या

सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील फंडाची रक्कम ७५ कोटींहून जास्त आहे, असा आरोप आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. रमेश सहस्रबुध्दे आणि जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कॉ. अ‍ॅड. आर. एन. जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या पगारातून ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतर ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयात भरण्याची गरज आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीनेही त्यांच्या हिश्श्याची ८.३३ टक्के रक्कम लगेच भविष्यनिर्वाह निधी विभागाच्या कार्यालयाकडे तात्काळ भरण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींकडे चौकशी केली असता, पाच तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कर्मचाºयांची कपात केलेली रक्कम शासनाकडे जमा केली आहे. परंतु, काही ग्रामपंचायतींनी स्वत:चा हिस्सा कर्मचाºयांच्या फंडाच्या खात्यात जमा केला नाही. हा घोटाळा वेगळाच आहे. याचा आम्ही शोध घेत आहोत.

शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी कर्मचाºयांच्या पगारातून कपात केली आहे. प्रत्यक्षात कर्मचाºयांनी चौकशी केली असता, ती भविष्य निर्वाह निधी विभागाच्या कार्यालयाकडे जमाच नाही. या रकमेवर संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि काही अधिकाºयांनीही डल्ला मारला आहे. अपहाराची रक्कम ७५ कोटींहून अधिक होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. फौजदारी संहिता कलम १९७ या कायद्यानुसार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांवर फौजदारी कारवाईची परवानगी द्यावी, अशीही मागणी केली आहे. अद्याप त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या प्रश्नासह जिल्हा परिषद वर्ग तीन, चारच्या कर्मचाºयांच्या भरतीत ग्रामपंचायत कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार ५० टक्के नेमणुका द्या, चतुर्थश्रेणी कर्मचाºयाप्रमाणे वेतन, भत्ते, रजा, सुट्या आदी सेवा लागू करण्यांसह विविध मागण्यांसाठी दि. २२ जानेवारीरोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा सहस्रबुध्दे व अ‍ॅड. जाधव यांनी दिला.

या मोर्चात कॉ. रमेश सहस्रबुध्दे, अध्यक्ष कॉ. दादासाहेब झुरे, अ‍ॅड्. आर. एन. जाधव, कॉ. नवनाथ मोहिते, कॉ. यल्लाप्पा कोळी, कॉ. अनिल पाटील, कॉ. बलराम सावंत, कॉ. विठ्ठल काळे, कॉ. संतोष मुळीक, कॉ. माणिक देसाई, कॉ. पांडुरंग पाटील, कॉ. गजानन शेरीकर, कॉ. सय्यद नदाफ, कॉ. सुनील जंगम आदी सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणzpजिल्हा परिषद