शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
2
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
3
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
4
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
5
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
6
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
7
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
8
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
9
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
10
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
11
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
12
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
13
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
14
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
15
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
16
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
17
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
18
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
19
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
20
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ६७५० शेतकरी नैसर्गिक शेतीचे मळे फुलविणार, पावणेदोन कोटींचा निधी मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:46 IST

कृषी सखींना मानधन, शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता

सांगली : रासायनिक खते, कीटकनाशकांमुळे शेती आणि माणसांचे आरोग्य बिघडत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने नैसर्गिक शेतीचे मळे फुलविणाऱ्या कृषी सखींना मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील ६ हजार ७५० शेतकऱ्यांची निवड केली आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत गटांतील (क्लस्टर) शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता व कृषी सखींच्या मानधनासाठी जिल्ह्याला १ कोटी ८८ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन भत्ता व मानधन जमा होणार आहे.निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणालीला प्रोत्साहन देणे, शेतावर तयार केलेल्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर करणे, बाहेरून निविष्ठा खरेदीवरील अवलंबित्व कमी करणे व त्यावरील खर्च कमी करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे, गो पशुधन एकात्मिक कृषी पद्धतीचा अवलंब करणे, नैसर्गिक शेतीतील अनुभवाच्या आधारे नैसर्गिक शेतीच्या स्थानिक पद्धती विकसित करणे, रसायनमुक्त शेतमालासाठी एक राष्ट्रीय ब्रँड तयार करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.जिल्ह्यात स्थापन झालेल्या गटांतील शेतकऱ्यांना प्रतिएकर प्रत्येकी चार हजारांचा प्रोत्साहन भत्ता तर प्रतिगट दोन कृषी सखींना दरमहा प्रत्येकी पाच हजारांचे मानधन दिले जाणार आहे. या योजनेस एप्रिलमध्ये राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली. शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व कृषी सखींना मानधनापोटी जिल्ह्याला १ कोटी ८८ लाख ९२ हजारांचा निधी मिळाला आहे. त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.राष्ट्रीय नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण कृषी सखींना दिले आहे. या शेतकऱ्यांना कांचनपूर येथील कृषी विज्ञान केंद्र, कसबे डिग्रज येथे एका दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच गटातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठीचे कृषी सखी प्रशिक्षण देणार आहेत. या गटांची नोंदणी सुरु झाली आहे.

तालुकानिहाय शेतकरी संख्या

  • मिरज- ७५०
  • वाळवा- ७५०
  • शिराळा- ३७५
  • पलूस- ५००
  • कडेगाव- ७५०
  • तासगाव- ६२५
  • विटा- ७५०
  • आटपाडी- ७५०
  • कवठेमहांकाळ- ७५०
  • जत- ७५०
  • एकूण- ६७५०

योजनेच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीवर दृष्टिक्षेप

  • गटांची संख्या : ५४
  • प्रतिगट शेतकरी संख्या : १२५
  • एकूण शेतकऱ्यांची संख्या : ६७५०
  • प्रतिशेतकरी प्रोत्साहन भत्ता : ४०००
  • एकूण कृषी सखी : १०८
  • कृषी सखींना मानधन : ५०००
  • जिल्ह्यासाठी निधी : १९७९८०००

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात स्थापन झालेल्या गटांतील शेतकन्यांना प्रोत्साहन भत्ता व कृषी सखींना मानधन देण्यासाठी जिल्ह्याला एक कोटी ९७ लाख ९८ हजारांचा निधी प्रास झाला आहे. गट व कृषी यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन भत्ता व मानधन जमा करण्यात येईल. शेतकऱ्यांनी गट नैसर्गिक शेतीसाठी याचा काटेकोर वापर करावा - अभयकुमार चव्हाण, प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान आत्मा.