शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

Sangli Flood: अतिवृष्टी, पुरामुळे ४,१३१ हेक्टर बाधित, शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:49 IST

प्रशासनाकडून पंचनामे सुरू

सांगली : मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील आठ हजार ५४४ शेतकऱ्यांचे चार हजार १३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये फळपिक, ऊस, सोयाबीन, भुईमुग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचा शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका बसला आहे.कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सलग अतिवृष्टी सुरूच राहिल्याने धरणातून पाणी सोडले. कृष्णा आणि वारणा काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील चार हजार १३१ हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. शेतीमधील ऊस, केळी, हळद, सोयाबीन आदी पिकांत पावसाचे पाणी साचून राहिले आहे. याचा शेतकरी वर्गाला फार मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकविलेल्या पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. वारणा नदीकाठच्या शिराळा तालुक्यातील सर्वाधिक पिके पाण्याखाली गेली आहेत. तीस गावातील पाच हजार ३७८ शेतकऱ्यांचे दोन हजार ९१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा नजरअंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. वाळवा तालुक्यातील एक हजार ६०६ हेक्टर आणि मिरज तालुक्यातील कृष्णा आणि वारणा काठावरील एक हजार ५६० हेक्टरवरील शेतीपिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा ऊस, केळी, हळद आदी पिकांना बसला आहे. यंदा शेतकऱ्यांनी आडसाली उसाची लावण मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र संततधार पावसाचा मोठा फटका या कोवळ्या आडसाली उसाला बसला आहे. अनेक ठिकाणी पुन्हा उसाची लागण करावी लागणार आहे. उसाप्रमाणेच हळदीच्या पिकालाही फटका बसला आहे. नदीकाठी हळद पावसाच्या पाण्यात बुडाली आहे. भाजीपाला, टोमॅटो, काढता येत नसल्याने लाखो रुपयांची पीक शेतातच कुजली आहेत. नुकसानीची पाहणी करून त्याचे पंचनामे त्वरित करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तीन तालुक्यांना सर्वाधिक फटकातालुका - बाधित शेतकरी - गाव - क्षेत्र (हेक्टर)मिरज - १५६० - २१ - ६६७वाळवा - १६०६ - २८ - ५४६शिराळा - ५३७८ - ३० - २९१८एकूण - ८५४४ - ७९ - ४१३१.०५

प्रशासनाकडून पंचनामे सुरूराज्य शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकासह घरांची पडझडाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

या पिकांचे सर्वाधिक नुकसानमिरज, वाळवा, शिराळा तालुक्यातील सोयाबीन, भाजीपाला, भूईमूग, ऊस, भात, मका, हळद, पपई, केळी, पेरू या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरFarmerशेतकरी