शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

गावकऱ्यांची एकी लय भारी; सांगली जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायती बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:24 IST

कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे.

सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये बुधवारी अर्ज माघारीच्या दिवशी २८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तसेच कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. यामुळे ४१९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.आमदार अनिल बाबर यांच्या गार्डी ग्रामपंचायतीसह ढवळेश्वर, माधळमुठी, घोटी खुर्द, वासुंबे, धोंडेवाडी, धोंडगेवाडी, गोरेवाडी या आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. रेवणगाव ग्रामपंचायतीचे सर्व ७ सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले असले तरी सरपंच पदासाठी या गावात तिरंगी लढत होत आहे.कडेगाव : तालुक्यात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी येवलेवाडी, विहापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. उपाळावी (मायणी), शाळगाव ग्रामपंचायतींमधील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.तासगाव :  तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी आरवडे, चिंचणी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आले आहे. मिरज तालुक्यातील सावळवाडी, जत तालुक्यातील देवनाळ, शिंगणापूर, पलूस तालुक्यातील हजारवाडी, पुणदीवाडी आदी ग्रामंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे.शिराळा : तालुक्यातील वाकाईवाडी, खुंदलापूर, चिखली, शिंदेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

सरपंच बिनविरोध, सदस्यांसाठी निवडणूकजिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु, सदस्य पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज राहिल्यामुळे तेथील निवडणूक लागली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य बिनविरोध निवडून आले असून, सरपंच पदासाठी निवडणूक लागली आहे. निवडणुकीचे वेगवेगळे रंग सर्वत्र पहायला मिळत आहेत.एकनाथ शिंदे गटाच्या पाच ग्रामपंचायती बिनविरोधमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाने खानापूर तालुक्यातील एकूण आठ ग्रामपंचायती बिनविरोध काबीज केल्या आहेत. यापैकी गार्डी, ढवळेश्वर, माधळमुठी, वासुंबे, धोंडेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविराेध करून खाते खोलले आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायती विराेधकांच्या ताब्यात गेल्या आहेत.प्रचाराची तयारीअर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आता प्रचार रंगणार असून त्याची तयारी उमेदवारांनी अगोदरच केली आहे.प्रशासनाचा रात्री उशिरापर्यंत गोंधळग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची होती. पण, प्रशासनाकडून अर्ज माघारीची संख्या आणि बिनविरोध ग्रामपंचायती यांचा ताळमेळ घालण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालूच होते.वाळवा : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी येलूर, कोळे, गौंडवाडी, धोत्रेवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडी या सात ग्रामपंचायती बिनविरोध करून गावांनी एकसंधपणा दाखविला आहे.कामेरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोन्ही गटांना अपयश आले. चार अर्ज राहिल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. सरपंच पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी प्रणीत भैरवनाथ पॅनेलकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत जगदीश पाटील यांना विरोधी छगनबापू पाटील पॅनेलने पाठिंबा दिला आहे. त्यांच्याशिवाय विक्रम हिंदूराव पाटील, रघुनाथ हळदे - पाटील व हंबीरराव पाटील या तिघांचे सरपंच पदासाठी अर्ज राहिले आहेत.वाळवा ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदासाठी हुतात्मा गटातील संदेश कांबळे विरुद्ध राष्ट्रवादीचे विद्याजीतराजे धनवडे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे.बोरगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीतून दोन अपक्षांनी सरपंच पदासाठीचे अर्ज माघारी घेतल्याने सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक