शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांची एकी लय भारी; सांगली जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायती बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:24 IST

कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे.

सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये बुधवारी अर्ज माघारीच्या दिवशी २८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तसेच कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. यामुळे ४१९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.आमदार अनिल बाबर यांच्या गार्डी ग्रामपंचायतीसह ढवळेश्वर, माधळमुठी, घोटी खुर्द, वासुंबे, धोंडेवाडी, धोंडगेवाडी, गोरेवाडी या आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. रेवणगाव ग्रामपंचायतीचे सर्व ७ सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले असले तरी सरपंच पदासाठी या गावात तिरंगी लढत होत आहे.कडेगाव : तालुक्यात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी येवलेवाडी, विहापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. उपाळावी (मायणी), शाळगाव ग्रामपंचायतींमधील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.तासगाव :  तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी आरवडे, चिंचणी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आले आहे. मिरज तालुक्यातील सावळवाडी, जत तालुक्यातील देवनाळ, शिंगणापूर, पलूस तालुक्यातील हजारवाडी, पुणदीवाडी आदी ग्रामंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे.शिराळा : तालुक्यातील वाकाईवाडी, खुंदलापूर, चिखली, शिंदेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

सरपंच बिनविरोध, सदस्यांसाठी निवडणूकजिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु, सदस्य पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज राहिल्यामुळे तेथील निवडणूक लागली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य बिनविरोध निवडून आले असून, सरपंच पदासाठी निवडणूक लागली आहे. निवडणुकीचे वेगवेगळे रंग सर्वत्र पहायला मिळत आहेत.एकनाथ शिंदे गटाच्या पाच ग्रामपंचायती बिनविरोधमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाने खानापूर तालुक्यातील एकूण आठ ग्रामपंचायती बिनविरोध काबीज केल्या आहेत. यापैकी गार्डी, ढवळेश्वर, माधळमुठी, वासुंबे, धोंडेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविराेध करून खाते खोलले आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायती विराेधकांच्या ताब्यात गेल्या आहेत.प्रचाराची तयारीअर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आता प्रचार रंगणार असून त्याची तयारी उमेदवारांनी अगोदरच केली आहे.प्रशासनाचा रात्री उशिरापर्यंत गोंधळग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची होती. पण, प्रशासनाकडून अर्ज माघारीची संख्या आणि बिनविरोध ग्रामपंचायती यांचा ताळमेळ घालण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालूच होते.वाळवा : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी येलूर, कोळे, गौंडवाडी, धोत्रेवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडी या सात ग्रामपंचायती बिनविरोध करून गावांनी एकसंधपणा दाखविला आहे.कामेरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोन्ही गटांना अपयश आले. चार अर्ज राहिल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. सरपंच पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी प्रणीत भैरवनाथ पॅनेलकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत जगदीश पाटील यांना विरोधी छगनबापू पाटील पॅनेलने पाठिंबा दिला आहे. त्यांच्याशिवाय विक्रम हिंदूराव पाटील, रघुनाथ हळदे - पाटील व हंबीरराव पाटील या तिघांचे सरपंच पदासाठी अर्ज राहिले आहेत.वाळवा ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदासाठी हुतात्मा गटातील संदेश कांबळे विरुद्ध राष्ट्रवादीचे विद्याजीतराजे धनवडे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे.बोरगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीतून दोन अपक्षांनी सरपंच पदासाठीचे अर्ज माघारी घेतल्याने सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक