शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात दिवसाला २ अपघात; १० महिन्यांत सव्वादोनशे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:52 IST

अपघातांची संख्या चिंताजनकच; प्रबोधनाबरोबरच कडक कारवाईही हवी

सांगली : दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवडा हा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचा सप्ताह म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. यानिमित्त उपक्रमही राबवत अपघात टाळण्यासाठी प्रबोधन केले जाते. तरीही रस्त्यांचा वाढलेला दर्जा आणि त्यामुळे अपघातांचीही संख्या वाढतच असल्याने अपघातांची संख्या कमी होईल यावर काम करण्याची गरज आहे. आठवडाभर केवळ प्रबोधन करून अपघात कमी होणार नाहीत तर त्यासाठी ठोस कृतीचीच आवश्यकता आहे.नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात हे उपक्रम होतात. यंदा शुक्रवारपर्यंत हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे, वाहतूक नियमांचे प्रबोधन, प्रचार आणि रस्ता सुरक्षेसाठीच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जाते. याशिवाय अपघात झाल्यानंतर सर्वाधिक आवश्यकता असलेली वैद्यकीय मदत, पोलिसांचे सहकार्य, परिसरातील सामाजिक संघटनांचा पुढाकार व सर्वांना एकत्रित आणत सन्मान करण्यासाठी आठवडाभर कार्यक्रम होतच असतात.

अपघात टाळण्यासाठी उपाय काय?

अपघात होणारच नाहीत अशी आदर्श नियमावली असली तरी त्याचा अवलंब शक्यही नाही. त्यामुळे किमान अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. यात वाहतूक नियमांचे पालन, वाहनांची योग्य स्थिती, पात्र व्यक्तीलाच वाहतूक परवाना देणे, त्या त्या भागातील अपघात क्षेत्र निश्चित करून त्यावर उपाययोजना केल्यास निश्चितच अपघात टाळण्यास मदतच होणार आहे.

केवळ ‘इव्हेंट’ नसावा, प्रामाणिक प्रयत्न हवेतदरवर्षी अपघाताविषयी प्रबोधनासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो. याशिवाय नोव्हेंबरमध्येही अपघातग्रस्तांना मदत, वाहतूक नियमांचे प्रसार, प्रचार आणि प्रबोधनावर भर दिला जातो. तरीही वर्षभर यात सातत्य दिसून येत नाही. त्यामुळेच हा केवळ ‘इव्हेंट’ न होता अपघात टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.

जिल्ह्यात दिवसाला दोन अपघातजिल्ह्यात वर्षभरातील अपघातांचा आढावा घेतला तर सातशेवर अपघातांची नोंद होते. त्यानुसार दिवसाला दोन अपघात होतातच. यात मृतांची संख्याही २७५ ते ३०० च्या दरम्यान असते. गेल्या तीन वर्षांपासून यातील संख्या वाढतच चालल्याने अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यताच दिसून आली नाही.

गेल्या दहा महिन्यांतील अपघातांची संख्या

  • एकूण अपघात ५०५
  • अपघातात मृत्यू २२५
  • अपघातात गंभीर जखमी ४१३
  • अपघातात किरकोळ जखमी ३६
टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू