शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

सांगली जिल्ह्यात दिवसाला २ अपघात; १० महिन्यांत सव्वादोनशे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:52 IST

अपघातांची संख्या चिंताजनकच; प्रबोधनाबरोबरच कडक कारवाईही हवी

सांगली : दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवडा हा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचा सप्ताह म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. यानिमित्त उपक्रमही राबवत अपघात टाळण्यासाठी प्रबोधन केले जाते. तरीही रस्त्यांचा वाढलेला दर्जा आणि त्यामुळे अपघातांचीही संख्या वाढतच असल्याने अपघातांची संख्या कमी होईल यावर काम करण्याची गरज आहे. आठवडाभर केवळ प्रबोधन करून अपघात कमी होणार नाहीत तर त्यासाठी ठोस कृतीचीच आवश्यकता आहे.नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात हे उपक्रम होतात. यंदा शुक्रवारपर्यंत हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे, वाहतूक नियमांचे प्रबोधन, प्रचार आणि रस्ता सुरक्षेसाठीच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जाते. याशिवाय अपघात झाल्यानंतर सर्वाधिक आवश्यकता असलेली वैद्यकीय मदत, पोलिसांचे सहकार्य, परिसरातील सामाजिक संघटनांचा पुढाकार व सर्वांना एकत्रित आणत सन्मान करण्यासाठी आठवडाभर कार्यक्रम होतच असतात.

अपघात टाळण्यासाठी उपाय काय?

अपघात होणारच नाहीत अशी आदर्श नियमावली असली तरी त्याचा अवलंब शक्यही नाही. त्यामुळे किमान अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. यात वाहतूक नियमांचे पालन, वाहनांची योग्य स्थिती, पात्र व्यक्तीलाच वाहतूक परवाना देणे, त्या त्या भागातील अपघात क्षेत्र निश्चित करून त्यावर उपाययोजना केल्यास निश्चितच अपघात टाळण्यास मदतच होणार आहे.

केवळ ‘इव्हेंट’ नसावा, प्रामाणिक प्रयत्न हवेतदरवर्षी अपघाताविषयी प्रबोधनासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो. याशिवाय नोव्हेंबरमध्येही अपघातग्रस्तांना मदत, वाहतूक नियमांचे प्रसार, प्रचार आणि प्रबोधनावर भर दिला जातो. तरीही वर्षभर यात सातत्य दिसून येत नाही. त्यामुळेच हा केवळ ‘इव्हेंट’ न होता अपघात टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.

जिल्ह्यात दिवसाला दोन अपघातजिल्ह्यात वर्षभरातील अपघातांचा आढावा घेतला तर सातशेवर अपघातांची नोंद होते. त्यानुसार दिवसाला दोन अपघात होतातच. यात मृतांची संख्याही २७५ ते ३०० च्या दरम्यान असते. गेल्या तीन वर्षांपासून यातील संख्या वाढतच चालल्याने अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यताच दिसून आली नाही.

गेल्या दहा महिन्यांतील अपघातांची संख्या

  • एकूण अपघात ५०५
  • अपघातात मृत्यू २२५
  • अपघातात गंभीर जखमी ४१३
  • अपघातात किरकोळ जखमी ३६
टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू