शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: February 1, 2015 00:51 IST

पोलिसांकडून फिर्याद : दोन महिलांच्या मृतदेहाची हेळसांड केल्याचे प्रकरण

सांगली : पलूस येथील रेश्मा शेख व जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील रुपाली पवार या मृत महिलांच्या मृतदेहांची हेळसांड केल्याप्रकरणी सांगली शहर व विश्रामबाग पोलिसांनी आज, शनिवार २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दलित महासंघ व रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलीस स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. रेश्मा शेख यांचा बुधवारी सकाळी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृतदेह विच्छेदन तपासणी करुन न घेता नातेवाईकांनी ताब्यात घेतला होता. मृतदेह दफन करण्यास नेल्यानंतर तिच्या माहेरकडील व दलित महासंघाचे कार्यकर्ते गेले होते. त्यांनी शवविच्छेदन तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. दलित महासंघाने, पलूस पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुन पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यावर तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करुन सांगलीत मृतदेहासह मोर्चा काढला होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्याचा प्रयत्न केला होता. दलित महासंघाने तब्बल दोन दिवस मृतदेहाची हेळसांड केली. मोर्चा काढून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ठेवून पोलिसांनी सतीश मोहिते, अजित भोरे, बंडू कुरणे, बालाजी कांबळे, सागर जगदणे व अन्य अनोळखी अशा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुपाली पवार यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतावस्थेत त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पतीच्या संमतीने रुग्णालयात रुपाली यांचे नेत्रदान करुन घेतले होते. माहेरकडील लोकांना ही बाब खटकली. त्यांनी आमची का परवानगी घेतली नाही, अशी विचारणा करुन गोंधळ घातला होता. रुग्णालय चौकात स्वत:ची वाहने आडवी उभी करुन रास्ता रोको केला होता. या सर्व घडामोडीत मृतदेह तब्बल दहा ते बारा तास शवागृहात पडून होता. त्यांच्या या कृत्याने मृतदेहाची हेळसांड झाली. यामुळे सुरेश दुधगावकर, रत्नाकर नांगरे यांच्यासह पाच ते सहा अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.कायदा व सुव्यवस्थेला आव्हानपलूसच्या रेश्मा शेख यांचा मृत्यू होऊन मृतदेह दफन करण्यास नेला होता. असे असताना संशयितांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो दोन दिवस फिरवत ठेवला. सांगलीत मृतदेहासह मोर्चा काढला. रुपाली पवार यांच्या पतीचे संमतीपत्र असूनही माहेरच्या लोकांचे संमतीपत्र का घेतले नाही, असा जाब विचारुन यंत्रणेला चार ते पाच तास वेठीस धरले. या दोन्ही प्रकरणात संशयितांनी कायदा व सुव्यस्थेला एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्याने शांततेता भंग झाला. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीसच फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशी कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.