शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

म्हैसाळ योजनेची ६२ कोटीची थकबाकी ;योजना पाच महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 7:30 PM

मिरज : चांगल्या पावसामुळे पाण्याला मागणी नसल्याने यावर्षी म्हैसाळ योजना जुलैपासून बंद आहे. म्हैसाळ योजना बंद असल्याने योजनेच्या आरग, ...

ठळक मुद्दे कालव्यांची गळती काढण्याचे काम सुरू

मिरज : चांगल्या पावसामुळे पाण्याला मागणी नसल्याने यावर्षी म्हैसाळ योजना जुलैपासून बंद आहे. म्हैसाळ योजना बंद असल्याने योजनेच्या आरग, सलगरे, बेडग व कवठेमहांकाळ परिसरात कालव्याची गळती काढण्याचे व अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. म्हैसाळच्या आवर्तनाचे वीज बिल व पाणी बिलाची थकबाकी सुमारे ६२ कोटीवर पोहोचली आहे.

गतवर्षी आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू असताना योजनेच्या सहा टप्प्यातील तब्बल ९५ पंप सुरू करून जतपर्यंत पाणी सोडण्यात आले. एप्रिलपासून पुन्हा ७ जुलैपर्यंत म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी १५४ दिवसात सुमारे ७ टीएमसी पाण्याचा उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला होता. यावर्षीच्या आवर्तन कालावधित आगळगाव, जाखापूर व टप्पा क्रमांक सहाचे तीन पंप सुरू करून चाचणी घेण्यात आली. जुलै महिन्यात आवर्तन बंद झाल्यानंतर सलग तीन महिने जोरदार पाऊस झाल्याने, यावर्षी तीनही तालुक्यात पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ओढे, नाले अद्याप वाहत आहेत.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात येते. मात्र यावर्षी तिन्ही तालुक्यातून अद्याप पाण्याची मागणी नसून, फेब्रुवारीपर्यंत तरी म्हैसाळच्या पाण्याची गरज भासणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी म्हैसाळ योजनेतून पूर्ण क्षमतेने मोठ्याप्रमाणात पाणी उपसा करण्यात आल्याने पंपांची देखभाल, दुरुस्ती, तसेच आरग, बेडग व सलगरे मुख्य कालव्याची गळती बंद करण्यासाठी अस्तरीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. अस्तरीकरण खराब झाल्याने व काही ठिकाणी पाण्यासाठी कालवे फोडल्याने गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाहून जाते. आरगजवळ असलेल्या कालव्याच्या मोठ्या गळतीमुळे पाणी कर्नाटकात वाहून जाते. गळतीमुळे वाहून जाणाºया पाण्यामुळे म्हैसाळच्या पाण्याची व विजेची बिले आकारताना वाद निर्माण होत आहे.

गेल्या अनेक वर्षात म्हैसाळच्या कालव्याची दुरूस्ती करण्यात आली नसल्याने, म्हैसाळ योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाने सुमारे एक कोटीपेक्षा जास्त खर्चाची निविदा काढून कालव्याची गळती काढण्याचे काम ठेकेदाराकडे सोपविले आहे. कालव्यांची गळती काढल्याने वाहून जाणाºया पाण्याची बचत होऊन, कालव्यालगतच्या शेतकऱ्यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.

शेतकऱ्यांकडून वसुलीम्हैसाळ योजनेच्या यावर्षीच्या आवर्तनाचे थकीत वीजबिल सुमारे ३२ कोटी रुपये असून, पाणी बिलाची थकबाकी सुमारे ३० कोटी रुपये आहे. ६२ कोटी रुपये थकबाकीचा डोंगर असल्याने पुढील वर्षात आवर्तन सुरू करण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून वसुली करावी लागणार आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजनाwater transportजलवाहतूक