शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे

By अशोक डोंबाळे | Updated: July 31, 2024 19:13 IST

जिल्ह्यामध्ये ५१ टक्क्यांवर पाणीसाठा : जत, आटपाडी तालुक्यात ५१ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा

अशोक डोंबाळेसांगली : मान्सूनच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला असून, दुसऱ्या बाजूला दुष्काळी जत, आटपाडी तालुक्यातील १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. या ठिकाणच्या एक लाख २५ हजार लोकसंख्येला ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात असे विदारक चित्र असतानाच ८३ पाझर तलावांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ३० टक्क्यांनी जास्त आहे.पाटबंधारे विभागाच्या २९ जुलै २०२४च्या अहवालानुसार, जिल्ह्यात मध्यम आणि लघु ८३ प्रकल्पांची नऊ हजार ४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्या क्षमता आहे. यापैकी सद्या पाच हजार १८६.०८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. ८३ पाझर तलावांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात दोड्डानाला, संख, बसाप्पावाडी, मोरणा आणि सिद्धेवाडी असे मोठे पाच पाझर तलाव आहेत. या तलावांमध्ये ४५ टक्के पाणीसाठा आहे. या तलावांमध्ये गतवर्षी ३४ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के पाणीसाठा जास्त आहे.तसेच ७८ लघु प्रकल्पामध्ये ५३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या लघु प्रकल्पांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत ३७ टक्के पाणीसाठा जास्त आहे. पण, जत, आटपाडी तालुक्यात पाऊस कमी असल्यामुळे तेथील खरीप हंगामातील पीक अडचणीत आहेत. या तालुक्यातील ४४ गावे आणि ३६६ वाड्यांमधील एक लाख २६ हजार २०४ लोकसंख्येला ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच २८ हजार ३०५ पशुधनलाही टँकरनेच पाणीपुरवठा होत आहे.

कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्यामुळे वाळवा, पलूस, मिरज आणि शिराळा तालुक्यातील १०४ गावांतील ४८२ कुटुंबातील दोन हजार ४१ नागरिकांना स्थलांतर व्हावे लागले आहे.

शंभर टक्के भरलेले तलावआटपाडी, घाणंद, शेटफळे (ता. आटपाडी), मोरणा, अंत्री, शिवनी, टाकवे, वाकुर्डे (ता. शिराळा), कडेगाव, आळसुंद, चिंचणी अंबक, कडेगाव, कारंडेवाडी, शाळगाव (ता. कडेगाव), बंडगरवाडी (ता. कवठेमहांकाळ), भाकुचीवाडी (ता. खानापूर), लिंगनूर (ता. मिरज), अंजनी, बलगवडे, लोढे, पुणदी, (ता. तासगाव) आणि रेठरेधरण (ता. वाळवा) येथील तलावामध्ये १०० टक्के पाणीसाठी झाला आहे.

जिल्ह्यातील तलावांची स्थितीतालुका - तलाव -पाणीसाठा (टक्के)             संख्या - २९ जुलै २०२४ - २९ जुलै २०२३तासगाव - ७  - ८६  -  ३खानापूर - ८  - ६८ - १८कडेगाव - ७ - ९६  - ४३शिराळा - ५ - १०० - ९२आटपाडी - १३ - ६४ - २३जत - २७ - १७ - २क.महांकाळ - ११ - २८ - ९मिरज - ३ - ९४ - १३वाळवा - २ - ८१ - ७

येथील तलाव कोरडेजत तालुक्यातील पांडोझरी, सिध्दनाथ, सोरडी, तिकोंडी क्रमांक १, उमराणी, अंकलगी, भिवर्गी, बिळूर, दरीबडची, गुगवाड, जालीहाळ, खोजनवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी, घोरपडी, लंगरपेठ, आटपाडी तालुक्यातील विभुतवाडी हे तलाव कोरडे पडले आहेत. तसेच खानापूर तालुक्यातील एक, जत तालुक्यातील चार आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन तलावांमध्ये मृतपाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षीपेक्षा ३० टक्के जादा पाणीसाठा

जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये गतवर्षी २९ जुलै २०२३ रोजी २१ टक्के पाणीसाठा होता. याच तारखेला यावर्षी ५१ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ३० टक्क्यांनी जास्त आहे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसdroughtदुष्काळWaterपाणी