शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे

By अशोक डोंबाळे | Updated: July 31, 2024 19:13 IST

जिल्ह्यामध्ये ५१ टक्क्यांवर पाणीसाठा : जत, आटपाडी तालुक्यात ५१ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा

अशोक डोंबाळेसांगली : मान्सूनच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला असून, दुसऱ्या बाजूला दुष्काळी जत, आटपाडी तालुक्यातील १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. या ठिकाणच्या एक लाख २५ हजार लोकसंख्येला ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात असे विदारक चित्र असतानाच ८३ पाझर तलावांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ३० टक्क्यांनी जास्त आहे.पाटबंधारे विभागाच्या २९ जुलै २०२४च्या अहवालानुसार, जिल्ह्यात मध्यम आणि लघु ८३ प्रकल्पांची नऊ हजार ४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्या क्षमता आहे. यापैकी सद्या पाच हजार १८६.०८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. ८३ पाझर तलावांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात दोड्डानाला, संख, बसाप्पावाडी, मोरणा आणि सिद्धेवाडी असे मोठे पाच पाझर तलाव आहेत. या तलावांमध्ये ४५ टक्के पाणीसाठा आहे. या तलावांमध्ये गतवर्षी ३४ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के पाणीसाठा जास्त आहे.तसेच ७८ लघु प्रकल्पामध्ये ५३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या लघु प्रकल्पांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत ३७ टक्के पाणीसाठा जास्त आहे. पण, जत, आटपाडी तालुक्यात पाऊस कमी असल्यामुळे तेथील खरीप हंगामातील पीक अडचणीत आहेत. या तालुक्यातील ४४ गावे आणि ३६६ वाड्यांमधील एक लाख २६ हजार २०४ लोकसंख्येला ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच २८ हजार ३०५ पशुधनलाही टँकरनेच पाणीपुरवठा होत आहे.

कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्यामुळे वाळवा, पलूस, मिरज आणि शिराळा तालुक्यातील १०४ गावांतील ४८२ कुटुंबातील दोन हजार ४१ नागरिकांना स्थलांतर व्हावे लागले आहे.

शंभर टक्के भरलेले तलावआटपाडी, घाणंद, शेटफळे (ता. आटपाडी), मोरणा, अंत्री, शिवनी, टाकवे, वाकुर्डे (ता. शिराळा), कडेगाव, आळसुंद, चिंचणी अंबक, कडेगाव, कारंडेवाडी, शाळगाव (ता. कडेगाव), बंडगरवाडी (ता. कवठेमहांकाळ), भाकुचीवाडी (ता. खानापूर), लिंगनूर (ता. मिरज), अंजनी, बलगवडे, लोढे, पुणदी, (ता. तासगाव) आणि रेठरेधरण (ता. वाळवा) येथील तलावामध्ये १०० टक्के पाणीसाठी झाला आहे.

जिल्ह्यातील तलावांची स्थितीतालुका - तलाव -पाणीसाठा (टक्के)             संख्या - २९ जुलै २०२४ - २९ जुलै २०२३तासगाव - ७  - ८६  -  ३खानापूर - ८  - ६८ - १८कडेगाव - ७ - ९६  - ४३शिराळा - ५ - १०० - ९२आटपाडी - १३ - ६४ - २३जत - २७ - १७ - २क.महांकाळ - ११ - २८ - ९मिरज - ३ - ९४ - १३वाळवा - २ - ८१ - ७

येथील तलाव कोरडेजत तालुक्यातील पांडोझरी, सिध्दनाथ, सोरडी, तिकोंडी क्रमांक १, उमराणी, अंकलगी, भिवर्गी, बिळूर, दरीबडची, गुगवाड, जालीहाळ, खोजनवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी, घोरपडी, लंगरपेठ, आटपाडी तालुक्यातील विभुतवाडी हे तलाव कोरडे पडले आहेत. तसेच खानापूर तालुक्यातील एक, जत तालुक्यातील चार आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन तलावांमध्ये मृतपाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षीपेक्षा ३० टक्के जादा पाणीसाठा

जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये गतवर्षी २९ जुलै २०२३ रोजी २१ टक्के पाणीसाठा होता. याच तारखेला यावर्षी ५१ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ३० टक्क्यांनी जास्त आहे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसdroughtदुष्काळWaterपाणी