शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

लग्नापूर्वी का बघितले जातात गुण, 36 गुण म्हणजे काय? मिळाले नाही तर...; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:27 IST

लग्नापूर्वी 36 गुणांची जुळवाजुळव कशी होते आणि कुंडली जुळवताना आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, हे सोप्या शब्दात समजून घेऊया.

आपण लग्न ठरताना अथवा ठरवताना गुण मेलनासंदर्भात किंवा 36 गुणांसंदर्भात नक्कीच ऐकले असेल. खरे तर, हिंदू धर्मात लग्नाच्या वेळी वधू आणि वराची कुंडली जुळवून बघितली जाते. यात वधू आणि वराचे गुण जुळतात, की नाही, त्या आधारे विवाह निश्चित केला जातो. तर, या 36 गुणांची जुळवाजुळव कशी होते आणि कुंडली जुळवताना आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, हे सोप्या शब्दात समजून घेऊया.

हिंदू धर्मात कुंडली जुळवून बघणे आवश्यक - मुलगा आणि मुलगी दोघांचेहे वैवाहिक जीवन सुखी आणि शांततामय रहावे यासाठी कुंडली जुळवून बघितली जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये (Astrology) विवाह जुळण्यासाठी एकूण 36 गुणांवर भाष्य करण्यात आले आहे. लग्नासाठी यांपैकी किमान 18 गुण जुळणे आवश्यक असते. तरच विवाह होऊ शकतो, अन्यथा विवाह अयोग्य असतो.

36 गुण कोणकोणते असतात -विवाहादरम्यान कुंडली मेलन करताना अष्टकूट गुण बघितले जातात. यात नाडीसाठी 8 गुण, भकूटचे 7 गुण, गण मैत्रीचे 6 गुण, ग्रह मैत्रीचे 5 गुण, योनी मैत्रीचे 4 गुण, ताराबलचे 3 गुण, वश्यचे 2 गुण आणि वर्णाचा 1 गुण जुळवून पाहिला जातो. अशा प्रकारे एकूण 36 गुण असतात. विवाहानंतर वर आणि वधू एकमेकांना अनुकूल असावेत, संतती सुख, धन संपत्तीत वृद्धी, दीर्घायुष्य असावे, यामुळेच दोन्ही पक्षाचे 36 गुण जुळवले जातात. मुहूर्तचिंतामणी ग्रंथामध्ये अष्टकुटात वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट आणि नाडीचा समावेश करण्यात आला आहे.

एवढे गूण जुळणे आवश्यक - लग्नासाठी वधू-वरांचे किमान 18 गुण जुळणे योग्य मानले जाते. एकूण 36 गुणांपैकी 18 ते 21 गुण जुळल्यास ही जुळणी मध्यम मानली जाते. तसेच अधिक गुण जुळल्यास त्याला शुभ विवाह मिलन म्हटले जाते. कुठल्याही वधू-वराच्या बाबतीत 36 गुण मिळणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार केवळ भगवान श्री राम आणि सीतेचेच 36 गुण जुळले होते. जर आपल्या कुंडलीचे मिलान 18 गुणांपेक्षा कमी म्हणजेच 17 गुण असेल तर लग्न करू नये. असे मानले जाते की, असा विवाह करणे टाळायला हवे. कारण असा विवाह सुखमय होऊ शकत नाही.

कुंडली जुळवताना 'ही' गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे - जर कुणाच्या कुंटलीत मांगलीक दोष असेल, तर त्याचा विवाह मांगलिक कुंडली असलेल्या व्यक्तीसोबतच करायला हवा. सामान्य व्यक्तीसोबत त्याचा विवाह करू नये. जर असा विवाह झालाच तर तो त्यांच्या वैवाहीक जीवनासाठी योग्य मानला जात नाही. 

(टीप : वरील माहिती आणि सूचना या सर्व सामान्य मान्यतांवर आधारलेल्या आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्नHinduismहिंदुइझमHinduहिंदू