शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

तुमच्या नात्यात आता आधीसारखं काही राहिलं नाही? मग हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 2:29 PM

तुम्हालाही कधी असं वाटतं का की, तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहिलं नाहीये? काय जुन्या गोष्टी आठवून आठवून तुम्ही त्रास करुन घेता?

तुम्हालाही कधी असं वाटतं का की, तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहिलं नाहीये? काय जुन्या गोष्टी आठवून आठवून तुम्ही त्रास करुन घेता? या सर्व गोष्टींमुळे तुमचं कामात लक्ष लागत नाही? अशा स्थितीत काय करावं याबाबत एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे. अशा स्थितीत सर्वातआधी विचार करण्याची पद्धत बदलण्याची गरज असल्याचं या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे. 

या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या पार्टनरबाबत पॉझिटीव्ह असतो, तेव्हा त्याला या हताशपणातून बाहेर येण्यास फार मदत मिळते. असे लोक आपलं नातं फारच सहजपणे सांभाळतात. सकारात्मक विचार पार्टनरच्या जवळ घेऊन जाण्यास मदत करतो आणि यामुळे दोघांचाही एकमेकांप्रति विश्वास वाढतो. नकारात्मक विचार नेमका याच्या उलट प्रभाव करतो. 

तज्ज्ञांनुसार, सकारात्मक विचार पार्टनरबाबत प्रेम आणि जवळीकता वाढवण्यास फायदेशीर ठरतो. कारण सकारात्मक विचाराने दोघेही एकमेकांमधील चांगल्या गोष्टी जाणू घेऊ शकतात. तेच जर त्यांनी नकारात्मक विचार केला तर ते केवळ एकमेकांमधील वाईट गोष्टीच शोधत राहतात. 

या रिसर्चसाठी अभ्यासकांनी ४० लोकांना यात सहभागी करुन घेतले होते. त्यांना त्यांच्या सद्याच्या जोडीदाराचे आणि एक्सचे फोटो दाखवण्यात आले. त्यांना सांगण्यात आलं की, या फोटोंकडे सकारात्मक विचाराने बघा. तसेच त्यांच्या नात्याला आणि भविष्यालाही वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्यास सांगण्यात आलं.

त्यानंतर त्यांना हेच फोटो नकारात्मक विचाराने बघायला सांगण्यात आलं. त्यानंतर या रिसर्चमधून हे आढळलं की, सकारात्मक विचार करतेवेळी त्यांचे मेंदू मजबूत होते आणि नकारात्मक विचार करताना कमजोर होते.

हे असं असलं तरी  PLOS नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी याच्या उलट करण्यास सांगण्यात आलं आहे. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी नकारात्मक गोष्टींवर फोकस करायला हवं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट