शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

या कारणांमुळे तरुण-तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे करतात पसंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 1:06 PM

अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.  

गेल्या काही वर्षांमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपचं फॅड भारतात चांगलंच वाढलं आहे. याची कारणेही वेगवेगळी असू शकतात. एकतर लग्नातील वेगवेगळ्या अडचणींमुळे तरुणांचा लग्नाबाबत नकारात्मक दृष्टीकोनही बघायला मिळतो. आजकालचे काही किंवा एका क्लासमधील तरूण असा विचार करतात की, लग्न करणे हा त्यांचा खाजगी निर्णय आहे. त्यात घरच्यांनी हस्तक्षेप करु नये. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे, याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.  

1) एकमेकांना जाणून घेणं

लग्न करण्याआधी एकमेकांना चांगल्याप्रकारे जाणून घेणे हे एक या नात्याचं मुख्य कारण असू शकतं. सोबत राहिल्याने दोघांनाही एकमेकांच्या स्वभावांची, सवयींची माहिती मिळते. त्यानुसार ते ठरवू शकतात की, ते एकमेकांसोबत आयुष्यभर राहू शकतील कि नाही. 

2) प्रेम वाढतं?

बरेच दिवस एकत्र राहिल्याने एकमेकांमधील प्रेम वाढतं असं मानलं जातं. काही प्रमाणात हे बरोबरही असावं. लग्नाआधी दोघांमधील नातं आणखी घट्ट व्हावं हे सुद्धा या नात्यात अडकण्याचं कारण असू शकतं. प्रेम वाढलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही वाढलं तर तेही कळेलच.

3) आर्थिक स्थैर्य

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहताना तरुण-तरुणी दोघेही आपापल्या नोकरीवर निर्भर असतात. एकमेकांवर अवलंबून राहत नसतात. घरातील खर्च वाटला गेला असतो. त्यामुळेही या नात्यात अनेकांना इंटरेस्ट असतो. कारण कोणतही आर्थिक दडपण त्यांच्यावर नसतं. 

4) स्वातंत्र्य

आजकालचे तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे असतात. मुलगा असो वा मुलगी दोघांनाही त्यांचं स्वातंत्र हवं असतं. काही लोकांना लग्न करुन स्वत:ला एका साच्यात बांधून घ्यायचं नसतं. त्यामुळेही काही लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात. 

5) जबाबदाऱ्यापासून दूर पळणे

आजच्या पिढीतील सर्वांनाच नाही पण काहींना जबाबदाऱ्यांची भीती वाटते. लग्न केल्यास पती-पत्नीवर एकमेकांची जबाबदारी असते. पण लिव्ह-इनमध्ये असं काही नसतं. त्यामुळेही काही तरुण हे नातं स्विकारतात. 

6) घटस्फोटाची गरज नाही

लिव्ह-इनमध्ये पार्टनरसोबत कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही विचार करुन त्याला सोडू शकता. त्यांना जर वाटत असेल की, त्यांचं नातं पुढे जाऊ शकत नाही तेव्हा ते सहज वेगळे होऊ शकतात. 

7) परिवाराचं टेन्शन नाही

अनेकदा काही मुलींना किंवा काही मुलांना पार्टनरच्या फॅमिलीसोबत जुळवून घेण्यास अडचण असते. लग्न झाल्यावर दोन परिवारांची जबाबदारी आपसूक येते. अशात काहींना ही जबाबदारी नको असते. त्यामुळेही काही लोक हे लिव्ह-इनचा मार्ग धरतात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट