शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

या 8 गोष्टी जाणून घेतल्याशिवाय करु नका लग्नाचा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 2:21 PM

खरंतर ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार असाल त्याच्या/तिच्याबाबत तुम्हाला माहिती असणारच. पण त्यासोबतच आणखीही काही गोष्टी अशा असतात ज्यांचा विचार करणं तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे.

लग्न हा कुणाच्याही आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय असतो. लग्न करण्याआधी आपण अनेक गोष्टी बघतो आणि समजून घेतो. त्यानंतरच आपण कुणासोबत संपूर्ण आयुष्य जगण्याचा निर्णय घेतो. खरंतर ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार असाल त्याच्या/तिच्याबाबत तुम्हाला माहिती असणारच. पण त्यासोबतच आणखीही काही गोष्टी अशा असतात ज्यांचा विचार करणं तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी...

1) आर्थिक स्थिती -

तुम्हाला कितीही चांगली सॅलरी मिळत असेल तरीही तुमच्या नव्या आयुष्यात पैशांबाबत काय अपेक्षा आहेत? याबाबत पार्टनरसोबत बोला. कोणत्याही नात्यात पैशांबाबत बोलणे जरा विचित्र वाटेल पण यावर बोलणे फार गरजेचे आहे. दोघांनी बोलून व्यवस्थित प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. 

2) फॅमिली प्लॅनिंग -

मुल झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. त्यामुळे दोघांनी याविषयावर बोलून निर्णय घेणे गरजेचे आहे. लग्नाआधीच यावर बोलल्यास अधिक चांगले कारण लग्नानंतर याबाबत अनेक मतभेद होऊ शकतात. अशावेळी कमीत कमी एकमेकांची याबाबतची मते जाणून घ्या. 

3) दोघांपैकी एकच कमावत असेल तर -

घर चालवण्यासाठी तुम्ही दोघांनीही नोकरी करणे योग्य होईल की, एकाच्या पगारात भागणार आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. तिला हाऊसवाईफ व्हायला आवडेल की, तिला काम करायचंय? या गोष्टीही बोलायला हव्यात. 

4) पर्सनल स्पेस -

पर्सनल स्पेसबाबत आधीच दोघांनी बोललेलं अधिक बरं. पर्सनल स्पेसबाबत तुमच्या पार्टनरचा काय विचार आहे? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. उगाच नंतर अडचणी निर्माण होण्यापेक्षा आधीच ही गोष्ट क्लिअर केलेली बरी. 

5) घरातील कामकाजात दोघांची भूमिका -

काय ती पारंपारिक पद्धतीने घर चालवण्यात सहज आहे किंवा घरातील जबाबदारी दोघांमध्ये बरोबरीत वाटली जावी? यावरही संवाद व्हायला हवा. दोघेही नोकरी करणारे असाल तर यावरुन वाद होण्याची शक्यता जास्त आहे.

7) दोघेही नोकरी करणार तर घर कोण सांभाळणार?

जर तुम्ही दोघांनीही लग्नानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला असेल तर मग मुलं झाल्यावर त्यांची जबाबदारी कोण घेणार? याचाही विचार करा. नाहीतर मुलांचं संगोपन नीट करता येणार नाही. यावरुन दोघांमध्ये वाद पेटतील. 

8) भांडणं झाल्यावर काय?

प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्याच्या जीवनात भांडणासारख्या गोष्टी असू नये. पण संसार म्हटला की, काही गोष्टींमुळे भांडणं होत असतात. अशावेळी काय भूमिका घ्यावी, परिस्थिती कशी हाताळावी याचाही विचार होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न